शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिकदृष्ट्या हे तर महा-राष्ट्र, दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:17 IST

महाराष्ट्र हा साहित्य, संस्कृती, कला, नाटक आणि नृत्य या सर्वच दृष्टीने मोठा आहे. महाराष्ट्राचे केवळ नाव महाराष्ट्र नसून खरोखरच हे महा-राष्ट्र आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी शनिवारी काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : महाराष्ट्र हा साहित्य, संस्कृती, कला, नाटक आणि नृत्य या सर्वच दृष्टीने मोठा आहे. महाराष्ट्राचे केवळ नाव महाराष्ट्र नसून खरोखरच हे महा-राष्ट्र आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी शनिवारी काढले.‘आगरी युथ फोरम’च्या वतीने डोंबिवली क्रीडासंकुलात आयोजित पंधराव्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत व दाक्षिणात्य अभिनेत्री शीला माधवन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अभिनेता मधू सर यांच्यासह आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी आदी मान्यवर उपस्थित होते.अदूर गोपालकृष्णन म्हणाले की, केरळ आणि महाराष्ट्र यांच्या संस्कृतीचे दर्शन या आगरी महोत्सवातून होत आहे. अशा प्रकारचे उत्सव सातत्याने आयोजित केले जावे. त्यातून मराठी व मल्याळी यांचा स्नेह वाढीस लागेल. आंतरभारतीय संस्कृतीची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे होईल. महाराष्ट्रात केरळी मोठ्या प्रमाणात राहतात. महाराष्ट्र व मुंबईच्या जडणघडणीत त्यांचाही सहभाग आहे, याकडे गोपालकृष्णन यांनी लक्ष वेधले.अभिनेत्री शीला माधवन म्हणाल्या की, आगरी महोत्सवाने महाराष्ट्रीयन व केरळी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा विचार प्रत्यक्षात आणला. महाराष्ट्राचे मन खूप मोठे आहे. त्याचा आम्हाला हेवा वाटतो.या वेळी आगरी युथ फोरमच्या वतीने वझे यांच्या हस्ते दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन व अभिनेत्री शीला माधवन यांना प्रत्येकी एक लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी म्हणाले की, आगरी महोत्सवाचा लौकिक सातासमुद्रापार नेण्याचे काम वझे यांनी केले आहे. त्यामागे त्यांची मेहनत आहे. दोन भिन्न संस्कृतींचे दर्शन व एकोपा याचा सात दिवस उत्सव सुरू राहणार आहे. त्याचा आनंद नागरिकांनी घ्यावा.प्रारंभी फोरमचे अध्यक्ष वझे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आगरी व केरळी संस्कृतीचे दर्शन घडवण्यावर आमच्या समाजातील काही मंडळीनी टीका केली असली तरी त्याला आम्ही चोख उत्तर दिले आहे. आगरी संस्कृती व अन्य संस्कृती यांचा मेळ घालण्याच्या प्रयत्नात काही मंडळी बाधा आणत असली, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही हे पाऊल उचलले आहे.प्रचारामुळेतावडे, चव्हाण अनुपस्थितमहोत्सवाच्या उद्घाटनास शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार होते. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने तावडे हे प्रचार सभांमध्ये असल्याने हजर राहिले नाही.त्याचबरोबर खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रामीण भागातील निवडणुकांत तळ ठोकला असल्याने तेही अनुपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे