शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

सांस्कृतिकदृष्ट्या हे तर महा-राष्ट्र, दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:17 IST

महाराष्ट्र हा साहित्य, संस्कृती, कला, नाटक आणि नृत्य या सर्वच दृष्टीने मोठा आहे. महाराष्ट्राचे केवळ नाव महाराष्ट्र नसून खरोखरच हे महा-राष्ट्र आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी शनिवारी काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : महाराष्ट्र हा साहित्य, संस्कृती, कला, नाटक आणि नृत्य या सर्वच दृष्टीने मोठा आहे. महाराष्ट्राचे केवळ नाव महाराष्ट्र नसून खरोखरच हे महा-राष्ट्र आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी शनिवारी काढले.‘आगरी युथ फोरम’च्या वतीने डोंबिवली क्रीडासंकुलात आयोजित पंधराव्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत व दाक्षिणात्य अभिनेत्री शीला माधवन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अभिनेता मधू सर यांच्यासह आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी आदी मान्यवर उपस्थित होते.अदूर गोपालकृष्णन म्हणाले की, केरळ आणि महाराष्ट्र यांच्या संस्कृतीचे दर्शन या आगरी महोत्सवातून होत आहे. अशा प्रकारचे उत्सव सातत्याने आयोजित केले जावे. त्यातून मराठी व मल्याळी यांचा स्नेह वाढीस लागेल. आंतरभारतीय संस्कृतीची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे होईल. महाराष्ट्रात केरळी मोठ्या प्रमाणात राहतात. महाराष्ट्र व मुंबईच्या जडणघडणीत त्यांचाही सहभाग आहे, याकडे गोपालकृष्णन यांनी लक्ष वेधले.अभिनेत्री शीला माधवन म्हणाल्या की, आगरी महोत्सवाने महाराष्ट्रीयन व केरळी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा विचार प्रत्यक्षात आणला. महाराष्ट्राचे मन खूप मोठे आहे. त्याचा आम्हाला हेवा वाटतो.या वेळी आगरी युथ फोरमच्या वतीने वझे यांच्या हस्ते दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन व अभिनेत्री शीला माधवन यांना प्रत्येकी एक लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी म्हणाले की, आगरी महोत्सवाचा लौकिक सातासमुद्रापार नेण्याचे काम वझे यांनी केले आहे. त्यामागे त्यांची मेहनत आहे. दोन भिन्न संस्कृतींचे दर्शन व एकोपा याचा सात दिवस उत्सव सुरू राहणार आहे. त्याचा आनंद नागरिकांनी घ्यावा.प्रारंभी फोरमचे अध्यक्ष वझे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आगरी व केरळी संस्कृतीचे दर्शन घडवण्यावर आमच्या समाजातील काही मंडळीनी टीका केली असली तरी त्याला आम्ही चोख उत्तर दिले आहे. आगरी संस्कृती व अन्य संस्कृती यांचा मेळ घालण्याच्या प्रयत्नात काही मंडळी बाधा आणत असली, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही हे पाऊल उचलले आहे.प्रचारामुळेतावडे, चव्हाण अनुपस्थितमहोत्सवाच्या उद्घाटनास शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार होते. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने तावडे हे प्रचार सभांमध्ये असल्याने हजर राहिले नाही.त्याचबरोबर खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रामीण भागातील निवडणुकांत तळ ठोकला असल्याने तेही अनुपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे