शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सांस्कृतिक इतिहास हा रंगभूमीच्या अभ्यासकांनी लिहावा: अभिराम भडकमकर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 26, 2024 14:08 IST

या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या कामाची दखल घेतली.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मनोगत आणि आठवणी असलेली पुस्तके ही समाजाचा खऱ्या अर्थाने सांस्कृतिक इतिहास असतात. हा इतिहास रंगभूमीच्या अभ्यासकांनी लिहावा असे मत लेखक व अभिनेते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले.

कृष्णा प्रकाशनतर्फे मराठी ग्रंथ संग्रहालय येथे सुप्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक कुमार सोहोनी लिखित 'सखे सोबती" या त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन  सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक विजय जोशी आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व अभिनेते अभिराम भडकमकर यांच्या उपस्थितीत झाले. नलावडे म्हणाले की, आमच्या आयुष्याचा इतिहास सोहोनी यांनी त्यांच्या पुस्तकात मांडला आहे. त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या कामाची दखल घेतली.

कुबल म्हणाल्या की, माहेरची साडी आणि इतर चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्दर्शकांना भेटले, त्यांच्यासोबत काम करतात. पण, सोहोनी यांनी जे शिकवलं ती शिदोरी घेऊन पुढे चालते आहे. जोशी म्हणाले की, सोहोनी यांच्या नाटकाच्या तालमीत हसतखेळत वातावरण असतं. राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत ठाणे शहराला त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून दिला.  सुरुवातीला त्यांच्या पुस्तकावर आधारित अभिवाचन सुनील गोडसे, नीना शेटे, सुरभी भावे, श्रद्धा पोखरकर व प्रियांका तेंडोलकर यांनी केले. त्यानंतर प्रकाशक विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक  तर सोहोनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे निवेदन वृंदा दाभोलकर यांनी केले.

टॅग्स :thaneठाणे