शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

शहापूर तालुक्यातील शेतकऱ्याने घेतले काकडीचे उत्पादन; ३०० किलो विक्रीसाठी जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:12 IST

बाळू लोखंडे यांनी चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे

भातसानगर : शहापूर तालुक्यातील परटोली गावांमध्‍ये एका शेतकऱ्याने एक एकर जागेमध्ये काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या काकडी उत्पादनातून भरून येईल अशी त्यांना आशा आहे.

परटोली गावातील शेतकरी बाळू वेखंडे व रामचंद्र ढमके यांनी काकडीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली असून, जवळजवळ दिवसाआड त्यांची ३०० किलो काकडी ही बाजारात विक्रीसाठी जात आहे. मागील महिन्यात शेतकरी हताश झाला होता. उन्हाळ्यामध्ये काकडी, भेंडी यासारखे उत्पादन सध्या तालुक्यामधील शेतकरी घेत आहेत.

बाळू लोखंडे यांनी चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता त्यांचा कल हा पावसाळी शेतीच्या ऐवजी उन्हाळी आणि हिवाळी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने घेण्याकडे वळला आहे. आपण अशा प्रकारची शेती करत आहोत याचा तरुणांनी बोध घ्यावा अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला आहे. आज काकडी १६ रुपये किलो जात असून उद्या तिचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या काकडीमधून आपल्याला हजारो रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

६०-७० तोड्यातून हजारोंचा नफा होण्याची शक्यतासध्या काकडीला भाव १६ रुपये किलो इतका असल्याने त्यांनी यासाठी आतापर्यंत २५ हजार इतका खर्च केला असून जवळजवळ ६० ते ७० तोडे या काकडीचे होतील असे या शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे जवळजवळ दररोज पाच हजार रुपयांची काकडी बाजारात जात असून त्यांना यासाठी कमीत कमी ७० ते ८० हजार रुपये नफा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी