शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

टंचाईवरून रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:58 IST

महापापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत पाणीटंचाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

उल्हासनगर : महापापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत पाणीटंचाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवडयातून २ ते ३ दिवस पाणी पुरवठा होतो. मग १६० एमएलडी पाणी जाते कुठे? असा प्रश्न नगरसेवकांनी केला. अखेर महापौर मीना आयलानी यांनी प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील पाणी समस्या सोडवण्याचे आदेश कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांना दिले.शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने एका हंडयासाठी महिलांवर वणवण भटकण्याची वेळ आली, असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. शहराला एमआयडीसीकडून एकूण किती एमएलडी पाणीपुरवठा होतो. याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा एमआयडीसीकडून होत असेल तर, पाणी जाते कुठे? असा प्रश्नही आयुक्तांना विचारला.शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, अरूण अशांत, सुनील सुर्वे, धनंजय बोडारे, भाजपाचे प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, डॉ. प्रकाश नाथानी, जमनुदास पुरस्वानी, विजय पाटील, साई पक्षाचे टोणी सिरवानी, काँगे्रस पक्षाच्या अंजली साळवे, राष्ट्रवादीच्या सतरामदास जेसवानी आदींनी पाणीप्रश्नी कार्यकारी अभियंता सेलवण व युवराज भदाणे यांना धारेवर धरले.माणशी १३५ लिटर तर शहराच्या लोकसंख्येला ११० एमएलडी पाणी पुरसे आहे, असे सेलवण यांनी सांगितले. मात्र जुनी-नवी जलवाहिनी, पाणी गळतीमुळे शहराला दरदिवशी १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा होतो.४० ते ५० एमएलडी जादा पुरवठा होऊनही टंचाई निर्माण झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तर जेसवानी यांनी शहराला पाणीपुरवठाकरणाºया मुख्य जलवाहिनीला मीटर नसल्याने शहराला किती एमएलडी पाणी पुरवठा होतो याबाबत अनिश्चिता आहे.महापालिका पाण्याचे जादा बिल देत असल्याचा आरोपही जेसवानी केला.महासभेत पाणीटंचाईवरून एकच गोंधळ झाल्याने, ज्या नगरसेवकांच्या प्रभागात पाणी नाही त्यांना उभे राहण्यास सांगितले. सर्वच नगरसेवक उभे राहिल्याने, महापौरही अवाक झाल्या. अखेर प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील पाणी समस्या सोडविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले.