शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

टंचाईवरून रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:58 IST

महापापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत पाणीटंचाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

उल्हासनगर : महापापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत पाणीटंचाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवडयातून २ ते ३ दिवस पाणी पुरवठा होतो. मग १६० एमएलडी पाणी जाते कुठे? असा प्रश्न नगरसेवकांनी केला. अखेर महापौर मीना आयलानी यांनी प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील पाणी समस्या सोडवण्याचे आदेश कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांना दिले.शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने एका हंडयासाठी महिलांवर वणवण भटकण्याची वेळ आली, असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. शहराला एमआयडीसीकडून एकूण किती एमएलडी पाणीपुरवठा होतो. याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा एमआयडीसीकडून होत असेल तर, पाणी जाते कुठे? असा प्रश्नही आयुक्तांना विचारला.शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, अरूण अशांत, सुनील सुर्वे, धनंजय बोडारे, भाजपाचे प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, डॉ. प्रकाश नाथानी, जमनुदास पुरस्वानी, विजय पाटील, साई पक्षाचे टोणी सिरवानी, काँगे्रस पक्षाच्या अंजली साळवे, राष्ट्रवादीच्या सतरामदास जेसवानी आदींनी पाणीप्रश्नी कार्यकारी अभियंता सेलवण व युवराज भदाणे यांना धारेवर धरले.माणशी १३५ लिटर तर शहराच्या लोकसंख्येला ११० एमएलडी पाणी पुरसे आहे, असे सेलवण यांनी सांगितले. मात्र जुनी-नवी जलवाहिनी, पाणी गळतीमुळे शहराला दरदिवशी १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा होतो.४० ते ५० एमएलडी जादा पुरवठा होऊनही टंचाई निर्माण झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तर जेसवानी यांनी शहराला पाणीपुरवठाकरणाºया मुख्य जलवाहिनीला मीटर नसल्याने शहराला किती एमएलडी पाणी पुरवठा होतो याबाबत अनिश्चिता आहे.महापालिका पाण्याचे जादा बिल देत असल्याचा आरोपही जेसवानी केला.महासभेत पाणीटंचाईवरून एकच गोंधळ झाल्याने, ज्या नगरसेवकांच्या प्रभागात पाणी नाही त्यांना उभे राहण्यास सांगितले. सर्वच नगरसेवक उभे राहिल्याने, महापौरही अवाक झाल्या. अखेर प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील पाणी समस्या सोडविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले.