शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

लॉकडाऊनच्या भीतीने ठाण्याच्या मार्केटमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:39 IST

ठाणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवार रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे घरातील सामान घेण्यासाठी ...

ठाणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवार रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे घरातील सामान घेण्यासाठी संध्याकाळी ठाण्यातील मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. ठाणे नगर पोलिसांच्या वतीने नियम पाळा असे आवाहन करीत होते. परंतु, तरीही नागरिक दुकानांसह मार्केटमध्ये गर्दी करतच होते.

राज्यात आता पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. केवळ अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्याच्या मार्केटमध्ये किराणामालाच्या दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसत होते. भाजीची खरेदी, किराणा सामान भरण्यासाठी नागरिकांनी मार्केटमध्ये गर्दी केली होती. त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना कुठेही दिसत नव्हते. तसेच काहींच्या तोंडाला मास्कदेखील नीटसा लावला गेला नसल्याचे दिसत होते. त्यामुळे वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी ठाणे नगर पोलिसांच्या वतीने गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, तोंडाला मास्क वापरा असे आवाहन करण्यात येत होते. परंतु, नागरिक मात्र रात्री ८च्या आत घरी जाण्यासाठी दुकानांमधून सामान घेण्यासाठी घाई करताना दिसत होते. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस दुकानदारांना दुकान जाऊन समजविण्याचादेखील प्रयत्न करीत होते.

पुढील १५ दिवस अत्यावश्यक सेवेतील किराणा मालाची दुकाने, मेडिकल व इतर अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना सुरू राहणार आहेत. असे असेल तरीदेखील बंदोबस्तावर असलेले पोलीस जाऊ देतील का नाही? याबाबत नागरिकांच्या मनात धास्ती असल्याने त्यांनी मार्केटमध्ये गर्दी केल्याचे दिसत होते.