शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Gudi Padwa 2018 : पाडव्याच्या खरेदीसाठी गर्दी ; फुले, तोरणे, श्रीखंड खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 06:26 IST

चैत्रापासून सुरू होणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत वेगवेगळ््या खरेदीची पूर्वतयारी करण्यासाठी ठाणे, डोंबिवली, कल्याणसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या.

ठाणे : चैत्रापासून सुरू होणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत वेगवेगळ््या खरेदीची पूर्वतयारी करण्यासाठी ठाणे, डोंबिवली, कल्याणसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. पाडव्यानिमित्त सोने-खास करून वळे, नाणी खरेदीचे काऊंटर उघडणे, सोन्याच्या वस्तुंचे आदल्या दिवशी बुकिंग करणे यासाठी सराफी पेढ्यांत लगबग होती.सर्वाधिक गर्दी होती, ती फुले, तोरणे खरेदीसाठी. त्यामुळे झेंडुचा भाव संध्याकाळनंतर वधारला. शिवाय कडुलिंबाची पाने, पावडर, त्याचा रसही खरेदी केला गेला. मिठाईच्या पदार्थांतही सर्वात जास्त भाव खाल्ला तो श्रीखंडाने. त्याच्या वेगवेगळ््या स्वादांनी. घरोघरी केल्या जाणाºया श्रीखंडासाठी चक्का खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर आमरस, बासुंदी, रबडी, गुलाबजाम, जिलेबी यांना मागणी होती.उन्हाचा तडाखा सुरू असल्याने दुपारपर्यंत बाजारपेठेत फार गर्दी नव्हती. अपेक्षेप्रमाणे खरेदी होत नव्हती. पण संध्याकाळी उन्हे कलताच बाजारातील गर्दी वाढली. उत्साहही वाढला.ठाण्याची मुख्य बाजारपेठ म्हणजे जांभळी मार्केट, डोंबिवलीची मुख्य बाजारपेठे-स्टेशन परिसर, कल्याणला लक्ष्मी मार्केटचा परिसर येथे आंब्याचे डहाळे, साखरेच्या माळा, गजरे, झेंडूची फुले, चाफ्याची माळ, कडुलिंबाची पाने अशा नानाविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. काही आदिवासी महिलाही फुले, तोरणे विक्रीसाठी घेऊन आल्या होत्या. आंब्याचे डहाळे, कडुलिंंबाची पाने आणि चाफ्याची माळ १० रुपयांना एक याप्रमाणे मिळत होती. तर साखरेच्या माळा आकारानुसार २० ते ३० रुपयांना एक या दराने मिळत होत्या. फुले शुक्रवारपासूनच बाजारात आली असून केशरी व पिवळा झेंडू १०० रुपये किलोने मिळत असल्याचे वसंत पटहार या फुलविक्रेत्याने सांगितले. यंदा ठरावीक फुलांचेच गजरे विक्रीसाठी आहेत. जुई, चमेली, सायलीचे गजरे सिझनमुळे नसल्याचे दक्षा नालबन यांनी सांगितले. मोगरा, अबोली, चाफ्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुपप्ट झाले होते.मुहूर्ताच्याआंबा खरेदीचा उत्साहआंबा नुकताच बाजारात तोंड दाखवू लागल्याने त्यांचा भाव ८०० ते हजार रूपये डझन आहे. पण जय कुटुंबांत पाडव्याला पुजेसाठी किंवा नववर्षाच्या पहिल्या दिवशी आमरस खाण्याची पद्धत आहे, त्यांनी तेवढ्यापुरते आंबे खरेदी केले. त्याची खरेदी जास्त झाली नसली, तिचा मुहूर्त साधला गेला.

टॅग्स :Gudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८thaneठाणे