शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

संकट डोंगराएवढे; मदत मात्र तुटपुंजी, पालघरच्या भूकंपवासीयांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:25 IST

गेल्या तीन महिन्यांपासून सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पालघर जिल्हा पुरताच हादरून गेला आहे.

- नारायण जाधव ठाणे : गेल्या तीन महिन्यांपासून सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पालघर जिल्हा पुरताच हादरून गेला आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात तेथे एक हजाराहून अधिक धक्के जाणवल्याची नोंद नॅशनल जिआॅग्राफिकल इन्स्टिट्यूट या संस्थेनेकडे आहे. शाळांसह घरांना तडे गेले असून, रहिवासी भयभीत झाले आहेत. मात्र, राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने केवळ १५ लाखांचा मदत निधी वितरित करण्यास गुरुवारी मान्यता दिल्याने, हे भूकंपग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना पालघर जिल्हावासीयांनी व्यक्त केली आहे.ही मदत ग्रामस्थांना तंबू बांधण्यासाठी, ताडपत्री उपलब्ध होण्यासाठी असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता, गेल्या तीन महिन्यांपासून पालघर, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा हे तालुके भूकंपाच्या धक्क्यांनी पुरते भयभीत झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भूकंपाचा धक्का बसल्यानंतर झालेल्या धावपळीत एका बालकाचा मृत्यू झाला होता. अनेक भागांतील रहिवासी आजही घरात राहायला तयार नाहीत. शाळांमध्ये जायला विद्यार्थी धजावत नाहीत. त्यामुळे केवळ १५ लाखांचा निधी वितरित करून शासनाने थट्टा मांडली आहे काय? असा सवाल येथील लोकप्रतिनिधींनी केला आहे.>नुकसान झालेल्या आदिवासींची नोंद नाहीभूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यात असून, आतापर्यंत २.४ ते ४.३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले आहेत. यामुळे अनेक शाळांसह दीड हजारांवर घरांना तडे गेले आहेत. दुर्गम भागातील आदिवासीपाड्यांतील घरांची नोंद अद्यापही सुरू आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे, परंतु आतापर्यंत कुणालाही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. विद्यार्थी शाळेत जायला तयार होत नसल्याने, त्यांचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान होत आहे, परंतु मदत व पुनर्वसन विभागाने यासाठी भरीव मदत करण्याऐवजी केवळ १५ लाख रुपयांची मदत २८ फेबु्रवारीला वितरित केली. त्यातून तंबूसाठी ताडपत्र्या घ्याव्यात, असे स्पष्ट केले आहे. मग यामुळे घरांचे नुकसान झालेल्या रहिवाशांसह शाळांचे नुकसान कसे भरून काढावे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.

टॅग्स :palgharपालघर