शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

संकट डोंगराएवढे; मदत मात्र तुटपुंजी, पालघरच्या भूकंपवासीयांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:25 IST

गेल्या तीन महिन्यांपासून सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पालघर जिल्हा पुरताच हादरून गेला आहे.

- नारायण जाधव ठाणे : गेल्या तीन महिन्यांपासून सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पालघर जिल्हा पुरताच हादरून गेला आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात तेथे एक हजाराहून अधिक धक्के जाणवल्याची नोंद नॅशनल जिआॅग्राफिकल इन्स्टिट्यूट या संस्थेनेकडे आहे. शाळांसह घरांना तडे गेले असून, रहिवासी भयभीत झाले आहेत. मात्र, राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने केवळ १५ लाखांचा मदत निधी वितरित करण्यास गुरुवारी मान्यता दिल्याने, हे भूकंपग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना पालघर जिल्हावासीयांनी व्यक्त केली आहे.ही मदत ग्रामस्थांना तंबू बांधण्यासाठी, ताडपत्री उपलब्ध होण्यासाठी असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता, गेल्या तीन महिन्यांपासून पालघर, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा हे तालुके भूकंपाच्या धक्क्यांनी पुरते भयभीत झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भूकंपाचा धक्का बसल्यानंतर झालेल्या धावपळीत एका बालकाचा मृत्यू झाला होता. अनेक भागांतील रहिवासी आजही घरात राहायला तयार नाहीत. शाळांमध्ये जायला विद्यार्थी धजावत नाहीत. त्यामुळे केवळ १५ लाखांचा निधी वितरित करून शासनाने थट्टा मांडली आहे काय? असा सवाल येथील लोकप्रतिनिधींनी केला आहे.>नुकसान झालेल्या आदिवासींची नोंद नाहीभूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यात असून, आतापर्यंत २.४ ते ४.३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले आहेत. यामुळे अनेक शाळांसह दीड हजारांवर घरांना तडे गेले आहेत. दुर्गम भागातील आदिवासीपाड्यांतील घरांची नोंद अद्यापही सुरू आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे, परंतु आतापर्यंत कुणालाही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. विद्यार्थी शाळेत जायला तयार होत नसल्याने, त्यांचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान होत आहे, परंतु मदत व पुनर्वसन विभागाने यासाठी भरीव मदत करण्याऐवजी केवळ १५ लाख रुपयांची मदत २८ फेबु्रवारीला वितरित केली. त्यातून तंबूसाठी ताडपत्र्या घ्याव्यात, असे स्पष्ट केले आहे. मग यामुळे घरांचे नुकसान झालेल्या रहिवाशांसह शाळांचे नुकसान कसे भरून काढावे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.

टॅग्स :palgharपालघर