शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बोगस पटसंख्या नोंदवणाऱ्या शाळांवर फौजदारी , शिक्षक-मुख्याध्यापक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:25 IST

सात वर्षांपूर्वी झालेल्या शाळांच्या पटपडताळणीमध्ये जिल्ह्यात बोगस विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आढळले होते. ही बोगस पटसंख्या नोंदवणा-या शाळांचे संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसह संबंधित कर्मचाºयांवर फौजदारी कारवाईचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : सात वर्षांपूर्वी झालेल्या शाळांच्या पटपडताळणीमध्ये जिल्ह्यात बोगस विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आढळले होते. ही बोगस पटसंख्या नोंदवणा-या शाळांचे संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसह संबंधित कर्मचाºयांवर फौजदारी कारवाईचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित शाळांचे धाबे दणाणले आहेत.जिल्ह्यातील सातहजार शाळांची शालेय पटपडताळणीची सत्यता सात वर्षांपूर्वी सलग तीन दिवस तपासण्यात आली होती. त्यासाठी महसूल विभागाची मदत घेण्यात आली होती. यामध्ये पाच हजार ७१८ प्राथमिक शाळा आहे. बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवलेल्या शैक्षणिक संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आदींवर आता फौजदारी कारवाई करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी शिक्षण संचालकांनी परिपत्रक जारी केल्यामुळे संबंधित शाळांवर आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांची दैनंदिन पटपडताळणी ठाणे जिल्ह्यात झाली. यामध्ये १५ तालुके, सात महानगरपालिका आणि पाच नगरपालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची पडताळणी जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणातील महसूल विभागाने केली. तीन दिवसांच्या या पडताळणीमध्ये वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांच्या बोटांना तीन हजार ६०० बॉटलमधील शाई लावण्यात आली. मतदानासाठी वापरण्यात येणारी ही शाई खास म्हैसूर येथून मागण्यात आली होती. या विद्यार्थी पटनोंदणीमध्ये सुमारे एक कोटी २५ लाख रुपये खर्च झाले. एक हजार ५५५ अधिकाºयांच्या ३० पथकांद्वारे ही पडताळणी करण्यात आली. राज्याच्या शिक्षण विभागाने या तपासणीसाठी गठीत केलेल्या पथकांमध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार आदी जबाबदार अधिकाºयांचा समावेश होता. पटनोंदणी पडताळणीसाठी जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरून विद्यार्थी वाहतुकीवरदेखील अंकुश लावण्यात आला होता. त्यामुळे शाळांमध्ये बोगस विद्यार्थ्यांची उपस्थिती रोखण्यास मदत झाली. बोगस पटनोंदणीतून शासनाची फसवणूक करणाºया शाळांवर आता कोणत्याही क्षणी फौजदारी कारवाई होण्याचे संकेत आहेत.सलग तीन दिवस तपासणीठाणे जिल्ह्यातील सात हजार ३१९ शाळांमधील सुमारे २० लाख १० हजार ५४५ विद्यार्थ्यांची शालेय पटपडताळणीची सत्यता सात वर्षांपूर्वी सलग तीन दिवस तपासण्यात आली होती. त्यासाठी महसूल विभागाची मदत घेण्यात आली होती. यामध्ये पाच हजार ७१८ प्राथमिक शाळा आहेतयातील तीन हजार ५७९ शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या आहेत. याशिवाय, एक हजार ५८२ माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि आश्रमशाळांचाही समावेश आहे. त्यापैकी ५७६ शाळा अनुदानित आहेत. उर्वरित शाळा विनाअनुदानित असून तेथील विद्यार्थी पटसंख्याही बोगस आहे.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे