शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

भिवंडीत अधिका-यांवर गुन्ह्याची मागणी, नवीवस्तीला अनधिकृतपणाचा शाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:15 IST

भिवंडी : कल्याण रोडच्या नवीवस्तीत शुक्रवारी चार मजली इमारत कोसळल्यानंतर रहिवाशांनी पालिका प्रशासनावर ठपका ठेवला आहे.

भिवंडी : कल्याण रोडच्या नवीवस्तीत शुक्रवारी चार मजली इमारत कोसळल्यानंतर रहिवाशांनी पालिका प्रशासनावर ठपका ठेवला आहे. प्रशासकीय अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे अशा घटना शहरात घडत असल्याने प्रशासनातील अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नागरिकांनी केली. दुर्घटना घडली तेथील गल्ल्या अरूंद असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. अखेर काही बांधकामे तोडून रस्ता मोकळा करण्यात आला.यंत्रमागाचे शहर असल्याने येथे मोठ्या संख्येने कामगारवर्ग आहे. येथे आलेला अशिक्षित कामगार मिळेल तो निवारा शोधत असतो. शहानिशा न करता केवळ करारनाम्यावर भरवसा ठेऊन जागा विकत घेतली जाते. जेथे नवीवस्ती नावाची ही वसाहत आहे, त्या भागातील वज्रेश्वरी संस्थानाच्या जागेत टेकडीवर केवळ हनुमान मंदिर होते. १९८४ साली दंगल झाली तेंव्हा पीडीतांना येथील वनविभागाच्या जागेवर वसविल्याने नवीवस्ती आकाराला आली. त्याच जागेवर उभ्या झालेल्या झोपड्यांचा आधार घेऊन येथील वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण झाले. कामगारांनी निवाºयासाठी घेतलेल्या झोपड्यांचा व्यवहार वाढून टप्प्याटप्प्याने त्या तिसºया पिढीकडे गेल्या आणि त्या जागेवर इमारती उभ्या राहिल्या. तेथे अशाप्रकारे ताहीर रफीक अन्सारी याने प्रथम आरसीसी नंतर वर लोडबेअरिंगने मजले बांधले. परिणामी ही इमारत केवळ पाच वर्षातच कोसळली. ही इमारत अनाधिकृत आहे, याचा दाखला पालिका प्रशासनाने देण्याची आवश्यकताही नाही. कारण परिसरात दंगल पीडितांचे पुनर्वसन सोडून इतर जागाच कोणाच्या मालकीची नाही.इमारतीपुढे तीन व्यावसायिक गाळे असल्याने दुर्घटनेतील जीव वाचविण्यासाठी ते गाळे प्रथम जेसीबीने तोडले आणि विटांचा खच बाजूला करीत इमारतीखाली अडकलेल्यासाठी मदतकार्य सुरू झाले. दुपारी एक वाजला तरी इमारतींचे सर्व स्लॅब उचलले गेले नव्हते. रस्त्यात पडलेले डबर उचलण्यासाठी आलेला डम्पर गल्लीत घुसत नसल्याने रस्त्यात येणारे बांधकाम पालिकेच्या कर्मचाºयांनी तोडले आणि नंतरच मदतकार्य, उत्खनन सुरू झाले. त्यामुळे दुपारनंतर ढिगाºयाखाली असेलेले दोन मृतदेह सापडले. ही दुर्घटना समजल्यावर पालिकेचे सर्व उपायुक्त व अधिकारी, कर्मचारी,अग्निशमन दल,आपत्ती निवारण दल घटनास्थळी आले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे ४० जवान तसेच कल्याण पालिकेचे अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते.<दाट लोकवस्तीतील इमारत कोसळल्यानंतर तेथे पोचून मदतकार्य कसे करायचे हाच प्रश्न यंत्रणेसमोर उभा ठाकला. इमारत कोसळल्यानंतर ढिगाºयाखाली अडकलेल्यांचा आकांत सुरू होता. ज्या गल्लीत इमारत कोसळली होती, तेथे जेसीबीही जाऊ शकत नव्हता.

टॅग्स :bhiwandiभिवंडी