शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

अंबरनाथ, बदलापूर शहरांत गुन्ह्यांचे ‘अनलाॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यांत काही महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन लागल्यानंतर ...

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यांत काही महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन लागल्यानंतर गुन्ह्यांचा आकडा खाली घसरला होता. आता लॉकडाऊन शिथिल होताच पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात गुन्हे वाढले असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कडकडीत लॉकडाऊन असल्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पोलीस ठाण्यात दिवसाला एखाद दुसराच गुन्हा दाखल होत होता. त्यातही कौटुंबिक वादाचे गुन्हे सर्वाधिक होते. हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामारी, चोरी, चेन स्नॅचिंग आणि घरफोडी अशा गुन्ह्यांच्या प्रमाणात ९० टक्के घट झाली होती. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण घरी असल्यामुळे आणि बाहेर पडण्यास बंदी असल्यामुळे गुन्ह्यांवर आळा बसला होता. त्यातच शहरात सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असल्याने चोर सावध झाले होते. लॉकडाऊन संपताच आता चोरट्यांनी पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली आहे, तर गंभीर गुन्ह्यांपैकी हाणामारी आणि हत्येच्या घटनांतही वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर गुन्ह्यांचा वेग वाढल्याने पोलीसही चिंतेत आहेत.

वर्षभराचा विचार केला असता अंबरनाथ पाेलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांतील ८० टक्के गुन्हे हे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दाखल झाले आहेत. तर लॉकडाऊनच्या काळात अवघे २० टक्केच गुन्हे दाखल झाले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हे चारपटीने वाढले आहेत. या गुन्ह्यांत हाणामारी, घरफोडी, चेन स्नॅचिंग यांचे सर्वाधिक प्रमाण आहे, तर लाॅकडाऊनच्या काळात कौटुंबिक वाद आणि परिसरातील नागरिकांत झालेली आपापसातील हाणामारी यांचे प्रमाण सर्वाधिक होते. या सर्व गुन्ह्यांसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे.