शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

अंबरनाथ, बदलापूर शहरांत गुन्ह्यांचे ‘अनलाॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यांत काही महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन लागल्यानंतर ...

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यांत काही महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन लागल्यानंतर गुन्ह्यांचा आकडा खाली घसरला होता. आता लॉकडाऊन शिथिल होताच पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात गुन्हे वाढले असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कडकडीत लॉकडाऊन असल्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पोलीस ठाण्यात दिवसाला एखाद दुसराच गुन्हा दाखल होत होता. त्यातही कौटुंबिक वादाचे गुन्हे सर्वाधिक होते. हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामारी, चोरी, चेन स्नॅचिंग आणि घरफोडी अशा गुन्ह्यांच्या प्रमाणात ९० टक्के घट झाली होती. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण घरी असल्यामुळे आणि बाहेर पडण्यास बंदी असल्यामुळे गुन्ह्यांवर आळा बसला होता. त्यातच शहरात सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असल्याने चोर सावध झाले होते. लॉकडाऊन संपताच आता चोरट्यांनी पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली आहे, तर गंभीर गुन्ह्यांपैकी हाणामारी आणि हत्येच्या घटनांतही वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर गुन्ह्यांचा वेग वाढल्याने पोलीसही चिंतेत आहेत.

वर्षभराचा विचार केला असता अंबरनाथ पाेलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांतील ८० टक्के गुन्हे हे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दाखल झाले आहेत. तर लॉकडाऊनच्या काळात अवघे २० टक्केच गुन्हे दाखल झाले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हे चारपटीने वाढले आहेत. या गुन्ह्यांत हाणामारी, घरफोडी, चेन स्नॅचिंग यांचे सर्वाधिक प्रमाण आहे, तर लाॅकडाऊनच्या काळात कौटुंबिक वाद आणि परिसरातील नागरिकांत झालेली आपापसातील हाणामारी यांचे प्रमाण सर्वाधिक होते. या सर्व गुन्ह्यांसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे.