शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अंबरनाथ, बदलापूर शहरांत गुन्ह्यांचे ‘अनलाॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यांत काही महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन लागल्यानंतर ...

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यांत काही महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन लागल्यानंतर गुन्ह्यांचा आकडा खाली घसरला होता. आता लॉकडाऊन शिथिल होताच पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात गुन्हे वाढले असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कडकडीत लॉकडाऊन असल्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पोलीस ठाण्यात दिवसाला एखाद दुसराच गुन्हा दाखल होत होता. त्यातही कौटुंबिक वादाचे गुन्हे सर्वाधिक होते. हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामारी, चोरी, चेन स्नॅचिंग आणि घरफोडी अशा गुन्ह्यांच्या प्रमाणात ९० टक्के घट झाली होती. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण घरी असल्यामुळे आणि बाहेर पडण्यास बंदी असल्यामुळे गुन्ह्यांवर आळा बसला होता. त्यातच शहरात सर्व ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असल्याने चोर सावध झाले होते. लॉकडाऊन संपताच आता चोरट्यांनी पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली आहे, तर गंभीर गुन्ह्यांपैकी हाणामारी आणि हत्येच्या घटनांतही वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर गुन्ह्यांचा वेग वाढल्याने पोलीसही चिंतेत आहेत.

वर्षभराचा विचार केला असता अंबरनाथ पाेलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांतील ८० टक्के गुन्हे हे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दाखल झाले आहेत. तर लॉकडाऊनच्या काळात अवघे २० टक्केच गुन्हे दाखल झाले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर गुन्हे चारपटीने वाढले आहेत. या गुन्ह्यांत हाणामारी, घरफोडी, चेन स्नॅचिंग यांचे सर्वाधिक प्रमाण आहे, तर लाॅकडाऊनच्या काळात कौटुंबिक वाद आणि परिसरातील नागरिकांत झालेली आपापसातील हाणामारी यांचे प्रमाण सर्वाधिक होते. या सर्व गुन्ह्यांसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे.