शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
2
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
3
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
4
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
5
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
6
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
7
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
8
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
9
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
10
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
11
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
12
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
13
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
14
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
15
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
16
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
17
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
18
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
19
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
20
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!

धरणाचे पाणी दूषित करणाऱ्या कारखान्यांविरोधात गुन्हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 06:40 IST

बरनाथमधील अधिकारी कार्यालयातून प्रभागातदेखील येत नाहीत. अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्यानेच शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि चिखलोली धरणाच्या दूषित पाण्याबाबत नियोजन करण्यासाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी काढलेला अंबरनाथ दौरा चांगलाच गाजला. आढावा बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. तर, दुसरीकडे चिखलोली धरणाची पाहणी करण्यासाठी गेलेले मंत्री खोत यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना थेट कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.चिखलोली धरणाच्या पाण्यातील प्रदूषणाचे वाढलेले प्रमाण आणि अंबरनाथ पश्चिम भागात दूषित पाणी पिऊन अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची पाहणी करण्यासाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा योजनेची माहिती घेतली. तसेच चिखलोली धरणाची पाहणी केली. धरणात शेवाळाचे आणि रासायनिक द्रव्यांचे वाढलेले प्रमाण यामुळे या धरणातील पाणी नागरिकांसाठी धोकादायक आहे. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल आल्याने पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे.धरणातील प्रदूषणाबाबत ठोस निर्णय घेताना खोत यांनी अधिकाºयांना लागलीच कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. धरणाच्या पात्रात जे रासायनिक कारखाने आहेत, त्यांच्यावर लगेच गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले. तसेच हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी घेण्याचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आहेत. धरणाचा पाहणी दौरा संपल्यावर खोत यांनी दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्या रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर पाणीसमस्येवर तोडगा काढण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.स्वामी समर्थ सभागृहात झालेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाणीसमस्येवर बोलताना सर्वात आधी काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी शहरातील पाणीसमस्या नेमकी काय आहे, याची जाणीव खोत यांना करून दिली. पाणीसमस्येवर तोडगा काढण्यासाठी मंत्रीमहोदय हे मुंबईहून अंबरनाथला येतात. मात्र, अंबरनाथमधील अधिकारी कार्यालयातून प्रभागातदेखील येत नाहीत. अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्यानेच शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. २०१३ ची वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यालादेखील जीवन प्राधिकरणाचे स्थानिक अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकाºयांनी काही मोजक्या बांधकाम व्यावसायिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचे आणि त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या सर्व बाबींची माहिती घेतल्यावर खोत यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. यानंतर फुलेनगरमधून बबन तांबे, जावसईमधून वसंत पाटील, बुवापाडातून निखिल वाळेकर, मनोज सिंह, सुरेंद्र यादव, शशांक गायकवाड यांनीदेखील या परिसरातील पाणीसमस्येवर आपले मत व्यक्त केले. पूर्व भागातील गढूळ पाण्याबाबत नगरसेवक राजू शिर्के, सुभाष साळुंखे, अनिता भोईर, रागिनी पवार, रोहिणी भोईर यांनीदेखील आपल्या समस्या मांडल्या. समस्यांचा पडलेला पाऊस आणि अधिकाºयांविषयी निर्माण झालेली नाराजी पाहिल्यावर खोत यांनी यासंदर्भात लागलीच मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याचे आश्वासन दिले. तसेच अपूर्ण राहिलेली योजना पूर्ण करण्यासंदर्भात योग्य त्या कार्यवाहीचे आदेश दिले.बदलापुरातील काही बांधकाम व्यावसायिकांनीदेखील नव्या जोडणीबाबत अधिकाºयांना निवेदन दिले. बदलापुरात बांधकाम व्यावसायिकांना नवीन कनेक्शन देताना अडवणूक होत असल्याचा आरोप शंकर भोईर यांनी असून त्यावर मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Damधरण