शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

धरणाचे पाणी दूषित करणाऱ्या कारखान्यांविरोधात गुन्हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 06:40 IST

बरनाथमधील अधिकारी कार्यालयातून प्रभागातदेखील येत नाहीत. अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्यानेच शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि चिखलोली धरणाच्या दूषित पाण्याबाबत नियोजन करण्यासाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी काढलेला अंबरनाथ दौरा चांगलाच गाजला. आढावा बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. तर, दुसरीकडे चिखलोली धरणाची पाहणी करण्यासाठी गेलेले मंत्री खोत यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना थेट कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.चिखलोली धरणाच्या पाण्यातील प्रदूषणाचे वाढलेले प्रमाण आणि अंबरनाथ पश्चिम भागात दूषित पाणी पिऊन अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची पाहणी करण्यासाठी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा योजनेची माहिती घेतली. तसेच चिखलोली धरणाची पाहणी केली. धरणात शेवाळाचे आणि रासायनिक द्रव्यांचे वाढलेले प्रमाण यामुळे या धरणातील पाणी नागरिकांसाठी धोकादायक आहे. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल आल्याने पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे.धरणातील प्रदूषणाबाबत ठोस निर्णय घेताना खोत यांनी अधिकाºयांना लागलीच कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. धरणाच्या पात्रात जे रासायनिक कारखाने आहेत, त्यांच्यावर लगेच गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले. तसेच हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने एमआयडीसीकडून अतिरिक्त पाणी घेण्याचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आहेत. धरणाचा पाहणी दौरा संपल्यावर खोत यांनी दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्या रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर पाणीसमस्येवर तोडगा काढण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.स्वामी समर्थ सभागृहात झालेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाणीसमस्येवर बोलताना सर्वात आधी काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी शहरातील पाणीसमस्या नेमकी काय आहे, याची जाणीव खोत यांना करून दिली. पाणीसमस्येवर तोडगा काढण्यासाठी मंत्रीमहोदय हे मुंबईहून अंबरनाथला येतात. मात्र, अंबरनाथमधील अधिकारी कार्यालयातून प्रभागातदेखील येत नाहीत. अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्यानेच शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. २०१३ ची वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यालादेखील जीवन प्राधिकरणाचे स्थानिक अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकाºयांनी काही मोजक्या बांधकाम व्यावसायिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचे आणि त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या सर्व बाबींची माहिती घेतल्यावर खोत यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. यानंतर फुलेनगरमधून बबन तांबे, जावसईमधून वसंत पाटील, बुवापाडातून निखिल वाळेकर, मनोज सिंह, सुरेंद्र यादव, शशांक गायकवाड यांनीदेखील या परिसरातील पाणीसमस्येवर आपले मत व्यक्त केले. पूर्व भागातील गढूळ पाण्याबाबत नगरसेवक राजू शिर्के, सुभाष साळुंखे, अनिता भोईर, रागिनी पवार, रोहिणी भोईर यांनीदेखील आपल्या समस्या मांडल्या. समस्यांचा पडलेला पाऊस आणि अधिकाºयांविषयी निर्माण झालेली नाराजी पाहिल्यावर खोत यांनी यासंदर्भात लागलीच मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याचे आश्वासन दिले. तसेच अपूर्ण राहिलेली योजना पूर्ण करण्यासंदर्भात योग्य त्या कार्यवाहीचे आदेश दिले.बदलापुरातील काही बांधकाम व्यावसायिकांनीदेखील नव्या जोडणीबाबत अधिकाºयांना निवेदन दिले. बदलापुरात बांधकाम व्यावसायिकांना नवीन कनेक्शन देताना अडवणूक होत असल्याचा आरोप शंकर भोईर यांनी असून त्यावर मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Damधरण