शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संशयितांवर उपचार न केल्यास गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:48 IST

कोणतेही रुग्णालय रूग्णांस उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार देऊ शकत नाही, असे राज्य शासनाचे निर्देश आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील कोविड संशयित रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच संचालकांविरूद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा ठामपा आयुक्त विजय सिंघल यांनी शनिवारी दिला.

कोणतेही रुग्णालय रूग्णांस उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार देऊ शकत नाही, असे राज्य शासनाचे निर्देश आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी कोविड संशयित सिमटोमॅटिक रुग्णांना खासगी नॉनकोविड रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबतचा आदेश नुकताच जारी केला आहे. यानुसार अशा रुग्णालयांनी कोविड संशयित रूग्ण दाखल झाल्यास त्याच्या प्रकृतीस्वास्थ्यानुसार आवश्यकता असल्यास आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करून घ्यावे. नंतर उपचार करून त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर आश्यकता वाटली तर त्याचे स्वॅब कोरोना कोविड तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठववावेत. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास तो रुग्ण ज्या रुग्णालयात दाखल आहे,तेथेच त्याच्यावर उपचार करावेत. तथापि, त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यास पुढील उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करावे, असे स्पष्ट केले आहे.एखाद्या खासगी रुग्णालयाने रुग्णास दाखल करून उपचार करण्यास नकार दिल्यास अथवा रुग्णास इतर रुग्णालयांमध्ये पोहोचण्यास विलंब झाल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास अशा रुग्णालयांविरूद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित करून रुग्णालयांच्या संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.निवृत्तीच्या दिवशी कोरोनाने उपकर निरीक्षकाचा मृत्यूठाणे : ठाणेमहापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या उपकर निरीक्षकाचा कोरोनाशी सुरू असलेला २० दिवसांचा लढा अखेर अपयशी ठरला आहे. शनिवारी या योद्धयाने निवृत्तीच्या दिवशीच अखेरचा श्वास घेतला. महापालिकेच्या निष्काळजीपणाचा तोही बळी ठरल्याचे आता पुन्हा समोर आले आहे.५५ वर्षे वयांवरील व्यक्तींना कोरोनासंबंधित कोणतीही ड्युटी लावू नये, असे असतानाही त्यांना भार्इंदरपाडा येथील क्वॉरंटाइन सेंटरची जबाबदारी दिली होती. परंतु, शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.ते ११ मे रोजी कोरोनामुळे घोडबंदरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु, दुसºयाच दिवशी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने ते पुन्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. त्यातच शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांची पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु, त्यातून ते दोघेही बरे झाले आहेत. असे असले तरी कोरोनाच्या या लढाईत उपकर निरीक्षकाची हार झाली.कल्याणमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यूकल्याण पूर्वेत २४, पश्चिमेत पाच तर डोंबिवली पूर्वेत नऊ रुग्ण आढळले आहेत. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा व कर्पेवाडी परिसर, डोंबिवलीत तुकारामनगर आणि कल्याण पश्चिमेत जोशी बागेत रुग्णांची संख्या मोठी आहे.नव्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील चार वर्षांच्या दोन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराअंती बरे झालेल्यांची संख्या ३३४ आहे. तर, उपचार घेत असलेल्यांची संख्या ६१८ आहे.कोरोनाग्रस्तांना रात्रीच्या जेवणातही दुपारची भाजीअंबरनाथ : नगरपालिकेच्या सिटी रुग्णालयामध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याची तक्रार रुग्ण करीत आहेत. दुसरीकडे, शुक्रवारी दुपारी जेवणात जी भाजी दिली होती, तीच रात्रीच्या जेवणातही दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे. कोरोनासारख्या गंभीर आजार झाल्याने रुग्ण हे मानसिक तणावाखाली असताना. त्यांना उपचारादरम्यान पौष्टिक आहार देणे हे बंधनकारक आहे. मात्र, जेवण पुरविणारा कंत्राटदार हा जेवणाच्या बाबतीत रुग्णांना नाहक त्रास देत आहे. शुक्रवारी कंत्राटदारामार्फत देण्यात आलेल्या जेवणात दुपारच्या वेळेस सोयाबीनची भाजी दिली होती.रात्री तीच भाजी येणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी कंत्राटदार व प्रशासनाची आहे. मात्र, दुपारी आलेली भाजी पुन्हा रात्रीच्या जेवणात देण्यात आली. दुपारची उरलेलीच भाजी पुन्हा रात्रीच्या जेवणात दिल्याचा आरोप येथील रुग्णांनी केला आहे. रात्री देण्यात आलेल्या भाजीत केवळ बटाटा टाकून सोयाबीन बटाटा अशी भाजी देण्यात आली. दरम्यान, रुग्णांना देण्यात येणाºया जेवणाच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असल्याने प्रशासक जगतसिंग गिरासे आणि मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांनी कंत्राटदाराला शेवटची ताकीद दिली असून जेवणात सुधारणा झाली नाही तर त्याचे कंत्राट रद्द केले जाईल असे स्पष्ट केले आहे.