शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

राजस्थानच्या औषधांची बाजारात खुल्याने विक्री केल्याप्रकरणी 12 वितरकांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:05 IST

राजस्थान सरकारच्या रुग्णालयांसाठी खरेदी केलेल्या महागड्या औषधाची चक्क मीरा-भार्इंदरसह मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याप्रकरणी भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात १२ औषध वितरकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

- धीरज परबमीरा रोड - राजस्थान सरकारच्या रुग्णालयांसाठी खरेदी केलेल्या महागड्या औषधाची चक्क मीरा-भार्इंदरसह मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याप्रकरणी भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात १२ औषध वितरकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु राजस्थान सरकारशी संबंधित हा प्रकार असताना व काही राज्यांमध्ये औषधांची विक्री केल्याचे उघड झाले असताना नवी मुंबईच्या अन्न व औषध प्रशासनाने भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.राजस्थान सरकारच्या रुग्णालयांमध्ये व्हायरल इन्फेक्शन झालेल्या गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महाग असलेले इम्युनो आरईएल हे औषध नवी मुंबईतील रबाळे येथे असलेल्या रिलायन्स लाईफ सायन्सकडून घेतले जाते. सदर औषधावर राजस्थान सरकार व विक्रीसाठी नाही असा शिक्का असतो. परंतु राजस्थान सरकारसाठी पुरवण्यात आलेल्या या महागड्या औषधांवरील शिक्क्यावर किरकोळ विक्री किमतीचे लेबल लाऊन ते खुल्या बाजारात विकले जात असल्याची माहिती रिलायन्स कंपनीला समजल्यावर त्यांनी नवी मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनाकडे याची तक्रार केली होती.अन्न व औषध प्रशासनाने सदर तक्रारप्रकरणी चौकशी केली असता सदर औषध विक्रेत्यांना पुरवणारे भार्इंदर येथील मेडिकॉन लाईफ केअर सह मीरारोड येथील आणखी श्रीगुरुफार्मा एका वितरकाचे नाव समोर आले. दरम्यान भार्इंदरच्या वितरकाकडून औषधाच्या ४५ वायल सापडल्या. या शिवाय परळ, सुरत, कोलकत्ता, ग्वाल्हेर, इंदूर, गुजरात आदी भागातील वितरकांकडून सुद्धा काही प्रमाणात सदर औषधं सापडली आहेत.नवी मुंबईच्या निरीक्षक सपना घुनिकर यांच्या फिर्यादीनंतर शुक्रवारी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भार्इंदरच्या वितरकाने सदर औषध इंदूर येथील वितरकाकडून आणल्याचे व तशी पक्की बिलं त्याने पोलिसांना सादर केली आहेत. अन्य वितरकांनी देखील रितसर औषधं खरेदी केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.मुळात राजस्थान सरकारला पुरवठा केलेली सदर औषधं काळ्या बाजारात विक्री केली जात असताना त्याची पाळंमुळं राजस्थानमधूनच फोफावली असल्याची शक्यता आहे. नेमकी कुठून व किती प्रमाणात सरकारी औषधं काळ्या बाजारात विकली गेली याचा सखोल तपास करण्यासाठी राजस्थान सरकार वा महाराष्ट्र सरकारला कळवून विशेष पथकं तयार करणं गरजेचं होतं. परंतु तसं काही न करता घाईगडबडीत अन्न व औषध प्रशासनाने नवघर पोलिसात केलेल्या फिर्यादीनंतर आता नवघर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे, असं जाणकारांचं मत आहे.उपनिरीक्षक विजय टक्के यांच्याकडे तपास सोपवण्यात आला असून, अद्याप कोणाला अटक केलेली नाही. या प्रकरणी मीरा-भार्इंदर सह अन्य राज्यात जाऊन नवघर पोलिसांना हा तपास करावा लागणार आहे. पण इतक्या गंभीर व अन्य राज्यात याचे धागेदोरे असणा-या या गुन्ह्याप्रकरणी एकूणच सखोल चौकशीची आवश्यकता असताना अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे.