शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

दिवा शहर व परिसरातील गावांसाठी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 13:02 IST

मनसे आमदार राजू पाटील यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

कल्याण- दिवा शहर व परिसरातील गावांसाठी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करा अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे.याबाबतचे पत्र सुद्धा गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.

दिवा शहर आणि परिसरातील गावांसाठी वेगळे पोलीस स्टेशन असावे अशी मागणी वारंवार होत आहे.दिवा शहर आणि परिसराची लोकसंख्या पाच लाखापेक्षा जास्त आहे. परंतु दिवा परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन नसून मुंब्रा पोलीस स्टेशनला हा सर्व भाग जोडलेला आहे.मुंब्रा पोलीस स्टेशनवर आधीच भार असताना दिव्यातील पाच लाख पेक्षा अधिक लोकसंख्येच्या परिसराला केवळ २० ते २५ पोलीस कर्मचारी मिळतात.त्यामुळे दिवा शहर परिसरासाठी लोकसंख्येनुसार स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती करावी, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे.दिवा शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच गेल्या काही वर्षात गुन्हेगारी वाढली आहे.

खून, चोऱ्या, दरोडे, विनयभंग, फसवणूक असे प्रकार वारंवार घडत आहेत. परंतु स्वतंत्र स्टेशन व वरिष्ठ दर्जाचे अधिकारी नसल्यामुळे अशा गुन्ह्यांची उकल होण्यास अचडण येत आहे. तरी तातडीने लक्ष घालून दिवा शहर व परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती करुन सहकार्य करावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांची गृहमंत्र्यांकडे केली आहे.तर याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे.

टॅग्स :MNSमनसे