शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीरायांच्या अवहेलनेने देश दुभंगेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:42 IST

जे मारुतीराय सेवाभाव, शक्ती, युक्तीचे प्रणेते आहे, साहित्यिक आहे, गुप्तचर आहे, ज्यांच्या ठायी व्यापकता आहे, ज्यांना अष्टसिद्धी प्राप्त असूनही ते केवळ लंगोटधारी आहे, कोणताही स्वार्थ, गर्व वा अहंकार ज्यांच्या अंगी नाही, त्यांचे हे आदर्श जगासमोर मांडण्याऐवजी आजकाल कोणीही उठतो आणि मारुतीरायांचे नाव घेऊन त्यांना जातीधर्मात वाटू पाहत आहे.

जे मारुतीराय सेवाभाव, शक्ती, युक्तीचे प्रणेते आहे, साहित्यिक आहे, गुप्तचर आहे, ज्यांच्या ठायी व्यापकता आहे, ज्यांना अष्टसिद्धी प्राप्त असूनही ते केवळ लंगोटधारी आहे, कोणताही स्वार्थ, गर्व वा अहंकार ज्यांच्या अंगी नाही, त्यांचे हे आदर्श जगासमोर मांडण्याऐवजी आजकाल कोणीही उठतो आणि मारुतीरायांचे नाव घेऊन त्यांना जातीधर्मात वाटू पाहत आहे. ज्यांचा मारुतीरायांविषयी तिळमात्र अभ्यास नाही, अशा या प्रवृत्ती त्यांच्यांविषयी रोजरोज नवनवी कोणताही आधार नसलेली बाष्कळ भाष्ये करून देशाला संकटात टाकत आहेत. या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मारुतीरायांच्या काळातील जातीधर्माचा भेदभाव नसलेले, सर्वांना स्वाभिमान आणि आनंदाने भयमुक्त वातावरणात राहता येईल, असे रामराज्य छत्रपती शिवरायांना अभिप्रेत होते. महात्मा गांधींना अभिप्रेत होते. आजपर्यंतचा इतिहास आहे की, ज्याज्या वेळी राम, हनुमानांसारख्या आपल्या देवता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रभृतींना जातीधर्मात वाटण्याचा प्रयत्न केला आहे, तशी लेबल चिकटवण्याचा प्रयत्न झाला, त्यात्या वेळी देश दुभंगला आहे. यामुळे अशा वाचाळवीरांनी आपल्या स्वार्थासाठी मारुतीरायांना जातीधर्मात वाटण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्याने सातासमुद्रापार कीर्ती असलेल्या हिंदू धर्मास आपण कमी लेखतोय, हे त्यांनी लक्षात घ्यावे. कारण, जिथे राम आहे, तिथे हनुमान आहे. जिथे हनुमान आहे, तिथेच राम आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

शंकर गायकरगेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित होते, असे वक्तव्य केले. त्याचा वाद शमतो न् शमतो तोच रामभक्त हनुमानांना देशातील अनेक नेत्यांनी विशेषत: सत्ताधारी भाजपातील वाचाळवीरांंनी वेगवेगळ्या जातीधर्मांत वाटण्याचा प्रयत्न केला. यात भाजपाचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान मुस्लिम होते, असा दावा केला, तर योगी यांच्या कॅबिनेटमधील मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण यांनी हनुमान हे जाट समाजाचे होते, असा शोध लावला. यानंतर, दुसरे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी हनुमान हे खेळाडू होते, असे म्हटले आहे, तर अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमान आदिवासी असून वानर हे त्यांचे गोत्र आहे, असे म्हटले आहे. ज्या हनुमानांची रामभक्त म्हणून देशविदेशांत पूजा केली जाते, गावागावांत ज्यांची मंदिरे आहेत, त्या हनुमानांविषयी अशी वाचाळ वक्तव्यं या नेत्यांनी केल्याने देशभरात हनुमानभक्तांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे हनुमान नक्की कोण होते, त्यांचे कार्य काय होते, याविषयी हनुमानभक्त आणि नाशिक येथे अंजनीपर्वतावर प.पू. शांतिगिरी महाराजांच्या मदतीने खरे हनुमान कोण होते, त्यांचे कार्य किती महान होते, याच्या इत्थंभूत माहितीचा ध्यास घेतलेले तसेच धार्मिकस्थळाबरोबरच पर्यटनस्थळ विकसित व्हावे, यासाठी झटत असलेल्या गायकर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.कोणताही स्वार्थ नसलेले विरक्त सेवेचे प्रतीक म्हणजे हनुमान. सेवा हाच ज्यांचा धर्म होता, ज्यांच्या सेवेत व्यापकता होती, शक्ती होती, पाण्यासारखा नितळपणा होता, कर्तव्यनिष्ठा होती, ती सेवा म्हणजे हनुमान होय.ज्यांना रामाला पाहायचे आहे, त्यांना हनुमानांना जाणून घेतल्याशिवाय राम भेटणार नाही. कारण, म्हणतात ना,दुनिया चले ना रामविना, राम चले ना हनुमानविना, हनुमान चले ना रामविना... असे हे राम-हनुमान यांचे अलौकिक नाते आहे.कारण, हनुमानांची रामभक्ती व्यापक होती, निरंक होती. पाण्यासारखी नितळ, स्वच्छ होती. जो रंग त्यात मिसळला, तो रंग त्यांच्या सेवावृत्तीत अन् रामभक्तीत होता. म्हणून, मारुतीरायांकडे विज्ञान, ज्ञान, बल, प्रचंड पुरुषार्थ होता. ते साहित्यिक होते. गुप्तचर होते. अष्टसिद्धी त्यांना प्राप्त होती. ते चिरंजीव आहेत. तरीही, त्यांचे राहणीमान साधे होते. म्हणूनच, ते लंगोटधारी होते. कोणताही अहंकार, गर्व त्यांच्याकडे नव्हता. म्हणूनच, अयोध्येतील ८० टक्के मंदिरांत मारुतीरायांची पूजा केली जाते. टीकाकारांनी त्यांच्या या गुणांचा प्रसार करायला हवा.सर्जिकल स्ट्राइकचे प्रणेते हनुमानआज सगळीकडे सर्जिकल स्ट्राइकचा गवगवा होता. परंतु, तो करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, सर्जिकल स्टाइकचे जनक मारुतीराय होते. समुद्रावरून उडी मारून ते लंकेत गेले. माता सीतांच्या ठावठिकाण्याविषयी कोणतीही माहिती नसताना केवळ आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर ते लंकेत गेले. माता सीतांचा शोध लावला. मात्र, ते आज्ञाधारक होते. यामुळेच सीतांच्या आज्ञेशिवाय त्यांनी अशोकवाटिकेतील एकाही फळाला हात लावला नाही. ते मॅनेजमेंट गुरूही होते. कारण, नंतर ते रावणाला भेटले. प्रभू रामचंद्रांचा निरोप दिला. नंतर, रावणाच्या मालकीच्या कापडी चिंध्या, तेलही त्याचेच, लंकाही त्याचीच. शेपटी केवळ मारुतीरायांची होती. ती रावणाने पेटवताच त्यांनी लंकादहन केले. नंतर, वेळेतच माता सीतांना भेटून ओळख म्हणून दागिना घेऊन पुन्हा प्रभू रामचंद्रांकडे पोहोचले. यात त्यांनी स्वत:च्या मालकीचे काहीही नसताना, स्वत:स कोणतीही इजा होऊ न देता खºया अर्थाने सर्जिकल स्ट्राइक केलाच. शिवाय, मॅनेजमेंट कसे असते, याचे दर्शनही घडवले. याचा प्रचार या वाचाळवीरांनी करायला हवा. उगाच त्यांना जातीधर्मात वाटू नये.

छत्रपती शिवरायांचे आदर्श मारुतीरायछत्रपती शिवरायांचे आदर्श हे मारुतीराय होते. समर्थ रामदासांनी मारुतीरायांना अभिप्रेत असे रामराज्य शिवरायांकडून स्थापन करून घेतले. हनुमानांची पूजा करून त्यांचे गुण आत्मसात करून केवळ शिवरायच नव्हे, तर संभाजी महाराजांनीही जातीधर्माचा भेदभाव न करणारे राज्य केले. समर्थ ज्यावेळी पंढरपूरला गेले, तेव्हा त्यांनी विठ्ठलाला प्रश्न केले की, हे विठ्ठला, तुझे धनुष्य कुठे आहे, शरयू कुठे आहे, तुला समाजाची चिंता नाही, मोगलांच्या जुलमी राजवटीपासून त्यांना कोण वाचवेल. नंतर, शिवराज्याचा म्हणजेच राज्यात रामराज्याचा जन्म झाला. त्या राज्यात शिवरायांकडे कोणताही स्वार्थ नव्हता. सेवाभाव होता. शिवराय पराक्रमी असूनही त्यांच्याकडे अहंकार नव्हता. तोच कित्ता पुढे संभाजी महाराजांनी गिरवला.

कारण, त्यांचा आदर्श समर्थ रामदासांनी सांगितलेले मारुतीराय होते. रावणविजयानंतर झालेल्या समारंभात सर्वांनीच हनुमानाचे कौतुक केले. नंतर, प्रभू रामचंद्रांनी सैन्यातील प्रत्येकाला काहीना काही भेटवस्तू दिली. त्यावेळी मारुतीरायांना माता सीतांनी आपली किमती माळ दिली. परंतु, मारुतीरायांनी तिचा एकेक मणी तोडून पाहिला. हे पाहून बिभीषणाने त्यांना संतापून विचारले की, हे काय करत आहात. तेव्हा मारुतीराय म्हणाले की, युद्धात मी नि:स्वार्थ भावनेने माझे काम केले. माझे कौतुक करून तुम्ही माझा व माझ्या सेवेचा अपमान करत आहात. प्रभू रामचंद्रांशिवाय मी नाही. म्हणून, मी या माळेतील मण्यांमध्ये रामसीता आहेत की नाही, ते पाहत आहे. तेव्हा, बिभीषण म्हणाले की, तुझ्यात राम आहेत का, तेव्हा मारुतीरायांनी छाती चिरून रामसीतेचे दर्शन घडवले. हेच रामराज्य आज हवे आहे. परंतु, दुर्दैवाने त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या मारुतीरायांना काही लोक जातीधर्मात वाटत आहेत. ते देशाच्या एकात्मतेला धोक्यात आणणारे आहे.

(लेखक : बजरंग दलाचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे क्षेत्रमंत्री आहेत.)(शब्दांकन : नारायण जाधव)