शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीरायांच्या अवहेलनेने देश दुभंगेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:42 IST

जे मारुतीराय सेवाभाव, शक्ती, युक्तीचे प्रणेते आहे, साहित्यिक आहे, गुप्तचर आहे, ज्यांच्या ठायी व्यापकता आहे, ज्यांना अष्टसिद्धी प्राप्त असूनही ते केवळ लंगोटधारी आहे, कोणताही स्वार्थ, गर्व वा अहंकार ज्यांच्या अंगी नाही, त्यांचे हे आदर्श जगासमोर मांडण्याऐवजी आजकाल कोणीही उठतो आणि मारुतीरायांचे नाव घेऊन त्यांना जातीधर्मात वाटू पाहत आहे.

जे मारुतीराय सेवाभाव, शक्ती, युक्तीचे प्रणेते आहे, साहित्यिक आहे, गुप्तचर आहे, ज्यांच्या ठायी व्यापकता आहे, ज्यांना अष्टसिद्धी प्राप्त असूनही ते केवळ लंगोटधारी आहे, कोणताही स्वार्थ, गर्व वा अहंकार ज्यांच्या अंगी नाही, त्यांचे हे आदर्श जगासमोर मांडण्याऐवजी आजकाल कोणीही उठतो आणि मारुतीरायांचे नाव घेऊन त्यांना जातीधर्मात वाटू पाहत आहे. ज्यांचा मारुतीरायांविषयी तिळमात्र अभ्यास नाही, अशा या प्रवृत्ती त्यांच्यांविषयी रोजरोज नवनवी कोणताही आधार नसलेली बाष्कळ भाष्ये करून देशाला संकटात टाकत आहेत. या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मारुतीरायांच्या काळातील जातीधर्माचा भेदभाव नसलेले, सर्वांना स्वाभिमान आणि आनंदाने भयमुक्त वातावरणात राहता येईल, असे रामराज्य छत्रपती शिवरायांना अभिप्रेत होते. महात्मा गांधींना अभिप्रेत होते. आजपर्यंतचा इतिहास आहे की, ज्याज्या वेळी राम, हनुमानांसारख्या आपल्या देवता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रभृतींना जातीधर्मात वाटण्याचा प्रयत्न केला आहे, तशी लेबल चिकटवण्याचा प्रयत्न झाला, त्यात्या वेळी देश दुभंगला आहे. यामुळे अशा वाचाळवीरांनी आपल्या स्वार्थासाठी मारुतीरायांना जातीधर्मात वाटण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्याने सातासमुद्रापार कीर्ती असलेल्या हिंदू धर्मास आपण कमी लेखतोय, हे त्यांनी लक्षात घ्यावे. कारण, जिथे राम आहे, तिथे हनुमान आहे. जिथे हनुमान आहे, तिथेच राम आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

शंकर गायकरगेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित होते, असे वक्तव्य केले. त्याचा वाद शमतो न् शमतो तोच रामभक्त हनुमानांना देशातील अनेक नेत्यांनी विशेषत: सत्ताधारी भाजपातील वाचाळवीरांंनी वेगवेगळ्या जातीधर्मांत वाटण्याचा प्रयत्न केला. यात भाजपाचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान मुस्लिम होते, असा दावा केला, तर योगी यांच्या कॅबिनेटमधील मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण यांनी हनुमान हे जाट समाजाचे होते, असा शोध लावला. यानंतर, दुसरे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी हनुमान हे खेळाडू होते, असे म्हटले आहे, तर अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमान आदिवासी असून वानर हे त्यांचे गोत्र आहे, असे म्हटले आहे. ज्या हनुमानांची रामभक्त म्हणून देशविदेशांत पूजा केली जाते, गावागावांत ज्यांची मंदिरे आहेत, त्या हनुमानांविषयी अशी वाचाळ वक्तव्यं या नेत्यांनी केल्याने देशभरात हनुमानभक्तांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे हनुमान नक्की कोण होते, त्यांचे कार्य काय होते, याविषयी हनुमानभक्त आणि नाशिक येथे अंजनीपर्वतावर प.पू. शांतिगिरी महाराजांच्या मदतीने खरे हनुमान कोण होते, त्यांचे कार्य किती महान होते, याच्या इत्थंभूत माहितीचा ध्यास घेतलेले तसेच धार्मिकस्थळाबरोबरच पर्यटनस्थळ विकसित व्हावे, यासाठी झटत असलेल्या गायकर यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.कोणताही स्वार्थ नसलेले विरक्त सेवेचे प्रतीक म्हणजे हनुमान. सेवा हाच ज्यांचा धर्म होता, ज्यांच्या सेवेत व्यापकता होती, शक्ती होती, पाण्यासारखा नितळपणा होता, कर्तव्यनिष्ठा होती, ती सेवा म्हणजे हनुमान होय.ज्यांना रामाला पाहायचे आहे, त्यांना हनुमानांना जाणून घेतल्याशिवाय राम भेटणार नाही. कारण, म्हणतात ना,दुनिया चले ना रामविना, राम चले ना हनुमानविना, हनुमान चले ना रामविना... असे हे राम-हनुमान यांचे अलौकिक नाते आहे.कारण, हनुमानांची रामभक्ती व्यापक होती, निरंक होती. पाण्यासारखी नितळ, स्वच्छ होती. जो रंग त्यात मिसळला, तो रंग त्यांच्या सेवावृत्तीत अन् रामभक्तीत होता. म्हणून, मारुतीरायांकडे विज्ञान, ज्ञान, बल, प्रचंड पुरुषार्थ होता. ते साहित्यिक होते. गुप्तचर होते. अष्टसिद्धी त्यांना प्राप्त होती. ते चिरंजीव आहेत. तरीही, त्यांचे राहणीमान साधे होते. म्हणूनच, ते लंगोटधारी होते. कोणताही अहंकार, गर्व त्यांच्याकडे नव्हता. म्हणूनच, अयोध्येतील ८० टक्के मंदिरांत मारुतीरायांची पूजा केली जाते. टीकाकारांनी त्यांच्या या गुणांचा प्रसार करायला हवा.सर्जिकल स्ट्राइकचे प्रणेते हनुमानआज सगळीकडे सर्जिकल स्ट्राइकचा गवगवा होता. परंतु, तो करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, सर्जिकल स्टाइकचे जनक मारुतीराय होते. समुद्रावरून उडी मारून ते लंकेत गेले. माता सीतांच्या ठावठिकाण्याविषयी कोणतीही माहिती नसताना केवळ आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर ते लंकेत गेले. माता सीतांचा शोध लावला. मात्र, ते आज्ञाधारक होते. यामुळेच सीतांच्या आज्ञेशिवाय त्यांनी अशोकवाटिकेतील एकाही फळाला हात लावला नाही. ते मॅनेजमेंट गुरूही होते. कारण, नंतर ते रावणाला भेटले. प्रभू रामचंद्रांचा निरोप दिला. नंतर, रावणाच्या मालकीच्या कापडी चिंध्या, तेलही त्याचेच, लंकाही त्याचीच. शेपटी केवळ मारुतीरायांची होती. ती रावणाने पेटवताच त्यांनी लंकादहन केले. नंतर, वेळेतच माता सीतांना भेटून ओळख म्हणून दागिना घेऊन पुन्हा प्रभू रामचंद्रांकडे पोहोचले. यात त्यांनी स्वत:च्या मालकीचे काहीही नसताना, स्वत:स कोणतीही इजा होऊ न देता खºया अर्थाने सर्जिकल स्ट्राइक केलाच. शिवाय, मॅनेजमेंट कसे असते, याचे दर्शनही घडवले. याचा प्रचार या वाचाळवीरांनी करायला हवा. उगाच त्यांना जातीधर्मात वाटू नये.

छत्रपती शिवरायांचे आदर्श मारुतीरायछत्रपती शिवरायांचे आदर्श हे मारुतीराय होते. समर्थ रामदासांनी मारुतीरायांना अभिप्रेत असे रामराज्य शिवरायांकडून स्थापन करून घेतले. हनुमानांची पूजा करून त्यांचे गुण आत्मसात करून केवळ शिवरायच नव्हे, तर संभाजी महाराजांनीही जातीधर्माचा भेदभाव न करणारे राज्य केले. समर्थ ज्यावेळी पंढरपूरला गेले, तेव्हा त्यांनी विठ्ठलाला प्रश्न केले की, हे विठ्ठला, तुझे धनुष्य कुठे आहे, शरयू कुठे आहे, तुला समाजाची चिंता नाही, मोगलांच्या जुलमी राजवटीपासून त्यांना कोण वाचवेल. नंतर, शिवराज्याचा म्हणजेच राज्यात रामराज्याचा जन्म झाला. त्या राज्यात शिवरायांकडे कोणताही स्वार्थ नव्हता. सेवाभाव होता. शिवराय पराक्रमी असूनही त्यांच्याकडे अहंकार नव्हता. तोच कित्ता पुढे संभाजी महाराजांनी गिरवला.

कारण, त्यांचा आदर्श समर्थ रामदासांनी सांगितलेले मारुतीराय होते. रावणविजयानंतर झालेल्या समारंभात सर्वांनीच हनुमानाचे कौतुक केले. नंतर, प्रभू रामचंद्रांनी सैन्यातील प्रत्येकाला काहीना काही भेटवस्तू दिली. त्यावेळी मारुतीरायांना माता सीतांनी आपली किमती माळ दिली. परंतु, मारुतीरायांनी तिचा एकेक मणी तोडून पाहिला. हे पाहून बिभीषणाने त्यांना संतापून विचारले की, हे काय करत आहात. तेव्हा मारुतीराय म्हणाले की, युद्धात मी नि:स्वार्थ भावनेने माझे काम केले. माझे कौतुक करून तुम्ही माझा व माझ्या सेवेचा अपमान करत आहात. प्रभू रामचंद्रांशिवाय मी नाही. म्हणून, मी या माळेतील मण्यांमध्ये रामसीता आहेत की नाही, ते पाहत आहे. तेव्हा, बिभीषण म्हणाले की, तुझ्यात राम आहेत का, तेव्हा मारुतीरायांनी छाती चिरून रामसीतेचे दर्शन घडवले. हेच रामराज्य आज हवे आहे. परंतु, दुर्दैवाने त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या मारुतीरायांना काही लोक जातीधर्मात वाटत आहेत. ते देशाच्या एकात्मतेला धोक्यात आणणारे आहे.

(लेखक : बजरंग दलाचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे क्षेत्रमंत्री आहेत.)(शब्दांकन : नारायण जाधव)