शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नगरसेवकांचे ते टॅब धूळखात; ५४ लाखांचा खर्चही वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:05 IST

गेल्या टर्ममध्ये आणि अवघे चार ते पाच महिनेच नगरसेवकांच्या हाती टॅब दिसले होते. नंतर नवीन बॉडी आल्यानंतर ते पालिकेच्या दप्तरी धूळखात पडले आहेत.

ठाणे : स्मार्ट सिटीबरोबर नगरसेवकांनाही स्मार्ट बनवण्यासाठी पालिका प्रशासनाने त्यांच्या हाती टॅब दिले होते. परंतु, गेल्या टर्ममध्ये आणि अवघे चार ते पाच महिनेच नगरसेवकांच्या हाती टॅब दिसले होते. नंतर नवीन बॉडी आल्यानंतर ते पालिकेच्या दप्तरी धूळखात पडले आहेत. त्यातील अनेक टॅब बंदही असून त्यावर केलेला ५४ लाखांचा खर्चही वाया गेला आहे. शिवाय, पेपरलेस महासभा करण्याच्या पालिकेच्या धोरणाचेही बारा वाजले आहेत.त्या टॅबचा वापर आजही होऊ न शकल्याने त्यांचे करायचे काय, असा प्रश्न पालिकेला सतावू लागला आहे. २०१५ च्या मध्यंतरी ठाणे महापालिकेने महासभा आणि स्थायी समितीवर कागदांच्या माध्यमातून होणारा खर्च टाळण्यासाठी टॅबची संकल्पना पुढे आणली होती. त्यानुसार, १३५ नगरसेवकांसाठी टॅब वितरित करण्यात आले. त्यातील १२ नगरसेवकांनी ते नाकारले आहेत. ते कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षणही नगरसेवकांना दिले. सुरुवातीला नवीन म्हणून काही नगरसेविका महासभेला टॅब आणत होत्या. त्यानंतर, २०१६ मध्ये महासभेतच उशिरा गोषवारे मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महासभेपासून टॅबवर गोषवारे उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. ते नगरसेवकांना टॅबवर पाठवलेसुद्धा होते. परंतु, अनेकांना त्याचा वापरच करता न आल्याने पालिकेला नाइलाजास्तव पुन्हा हातातच गोषवारे द्यावे लागले. २०१७ मध्ये ठामपाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व नगरसेवकांकडील टॅब पालिकेने जमा करून घेतले.पालिकेचा प्रयोग अपयशीदोन वर्षे उलटूनही नगरसेवकांच्या हाती पुन्हा टॅब आलेले नाहीत. सध्या ते पालिकेत धूळखात पडून असून यातील अनेक टॅब बंद झाले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. एकूणच नगरसेवकांना स्मार्ट करण्याचा पालिकेचा प्रयोग सपशेल अपयशी ठरला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका