शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

उल्हास नदी पूर नियंत्रण रेषेच्या फेर सर्वेक्षणाचा खर्च पालिकेवर

By पंकज पाटील | Updated: March 28, 2023 18:36 IST

बदलापूर : जलसंपदा विभागाने आखणी केलेली उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा सदोष असल्याचा आक्षेप घेत पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण ...

बदलापूर : जलसंपदा विभागाने आखणी केलेली उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा सदोष असल्याचा आक्षेप घेत पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. उल्हास नदी पूरनियंत्रण रेषेबाबत ज्या-ज्या भागातील तक्रार असेल, त्याठिकाणी नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र त्यानंतरही जलसंपदा विभागाने याबाबत कानावर हात ठेवत फेर सर्वेक्षण व त्यासाठी होणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर ढकलली आहे.

सुमारे दोन वर्षांपासून उल्हास नदीच्या पूरनियंत्रण रेषेचा मुद्दा बदलापुरात चर्चेत आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने ११ जून २०२० रोजी उल्हासनदीची पूरनियंत्रण रेषा अंतिम करून ती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने अंतिम केलेल्या पूरनियंत्रण रेषेत बांधकामांना परवानग्या नसणार आहेत. बदलापूरातील खरवई, मांजर्ली, वालीवली, सोनिवली, एरंजाड, बदलापूर गाव, हेंद्रेपाडा, बॅरेज रोड, रमेशवाडी, सानेवाडी, स्टेशन परिसर, शनीनगर, मोहनानंदनगर,आदी भागातील शेकडो एकर जमीन या पूर नियंत्रण रेषेत आली आहे.

ही संपूर्ण जमीन पुररेषेमुळे बाधित होणार असल्याने या भागात यापुढे कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी मिळणार नसल्याने या भागातील विकास ठप्प होणार आहे. त्यामुळे या पूर रेषेचा बांधकाम व्यावसायिक, लहान,मोठे भूखंड धारक तसेच ज्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत,अशा शेकडो जमीन धारकांना बसणार आहे. जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने पूरनियंत्रण रेषा आखली असल्याचा आरोप केला जात आहे. सदरची पूर नियंत्रण रेषा गावाच्या चावडीवर, नगर पालिकेच्या स्तरावर किंवा नदी किनाऱ्यालगतच्या कोणत्याही गावामध्ये प्रसिद्ध करण्यात आली नाही.

 याच गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांनी फेर संरक्षणाचे आदेश दिले होते. पूररेषा आखणी जलसंपदा विभागाने यापूर्वीच शासनाचे प्रचलित नियम,धोरण वापरुन केली असल्याने, पुनःश्च त्याच नियमांवर आधारित पूररेषेचे फेरसर्वेक्षण जलसंपदा विभागामार्फत केल्यास सदर आखणी सारखीच येण्याची शक्यता आहे. असे कारण देत जलसंपदा विभागाने सदर अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यास नकार दिला आहे. मात्र संबंधित नगरपालिका व नागरिकांची मागणी विचारात घेवून उल्हास नदीच्या पूररेषेची पडताळणी करण्याची गरज असल्यास सदर काम आयआयटी रुरकी या संस्थेकडून करण्यात यावे. तसेच सदर कामासाठी लागणारा खर्च फेरसर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घेण्यात यावा, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :badlapurबदलापूर