शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

उल्हास नदी पूर नियंत्रण रेषेच्या फेर सर्वेक्षणाचा खर्च पालिकेवर

By पंकज पाटील | Updated: March 28, 2023 18:36 IST

बदलापूर : जलसंपदा विभागाने आखणी केलेली उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा सदोष असल्याचा आक्षेप घेत पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण ...

बदलापूर : जलसंपदा विभागाने आखणी केलेली उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा सदोष असल्याचा आक्षेप घेत पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. उल्हास नदी पूरनियंत्रण रेषेबाबत ज्या-ज्या भागातील तक्रार असेल, त्याठिकाणी नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र त्यानंतरही जलसंपदा विभागाने याबाबत कानावर हात ठेवत फेर सर्वेक्षण व त्यासाठी होणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर ढकलली आहे.

सुमारे दोन वर्षांपासून उल्हास नदीच्या पूरनियंत्रण रेषेचा मुद्दा बदलापुरात चर्चेत आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने ११ जून २०२० रोजी उल्हासनदीची पूरनियंत्रण रेषा अंतिम करून ती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने अंतिम केलेल्या पूरनियंत्रण रेषेत बांधकामांना परवानग्या नसणार आहेत. बदलापूरातील खरवई, मांजर्ली, वालीवली, सोनिवली, एरंजाड, बदलापूर गाव, हेंद्रेपाडा, बॅरेज रोड, रमेशवाडी, सानेवाडी, स्टेशन परिसर, शनीनगर, मोहनानंदनगर,आदी भागातील शेकडो एकर जमीन या पूर नियंत्रण रेषेत आली आहे.

ही संपूर्ण जमीन पुररेषेमुळे बाधित होणार असल्याने या भागात यापुढे कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी मिळणार नसल्याने या भागातील विकास ठप्प होणार आहे. त्यामुळे या पूर रेषेचा बांधकाम व्यावसायिक, लहान,मोठे भूखंड धारक तसेच ज्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत,अशा शेकडो जमीन धारकांना बसणार आहे. जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने पूरनियंत्रण रेषा आखली असल्याचा आरोप केला जात आहे. सदरची पूर नियंत्रण रेषा गावाच्या चावडीवर, नगर पालिकेच्या स्तरावर किंवा नदी किनाऱ्यालगतच्या कोणत्याही गावामध्ये प्रसिद्ध करण्यात आली नाही.

 याच गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांनी फेर संरक्षणाचे आदेश दिले होते. पूररेषा आखणी जलसंपदा विभागाने यापूर्वीच शासनाचे प्रचलित नियम,धोरण वापरुन केली असल्याने, पुनःश्च त्याच नियमांवर आधारित पूररेषेचे फेरसर्वेक्षण जलसंपदा विभागामार्फत केल्यास सदर आखणी सारखीच येण्याची शक्यता आहे. असे कारण देत जलसंपदा विभागाने सदर अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यास नकार दिला आहे. मात्र संबंधित नगरपालिका व नागरिकांची मागणी विचारात घेवून उल्हास नदीच्या पूररेषेची पडताळणी करण्याची गरज असल्यास सदर काम आयआयटी रुरकी या संस्थेकडून करण्यात यावे. तसेच सदर कामासाठी लागणारा खर्च फेरसर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घेण्यात यावा, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :badlapurबदलापूर