शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दिवा डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा खर्च २१८ कोटी ५० लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:34 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाने टोचले कान । कचऱ्याची लावणार शास्त्रोक्त विल्हेवाट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड आता शास्त्रोक्तपद्धतीने बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. मागील महासभेत चुकीचा प्रस्ताव आणला गेल्याने घनकचरा विभागाला लोकप्रतिनिधींनी चांगलेच झापले होते. त्यानंतर आता या प्रस्तावात बदल करून पुन्हा तो मंजुरीसाठी ठेवला आहे. विशेष म्हणजे महाराष्टÑ प्रदूषण नियत्रंण मंडळाने पालिकेचे कान टोचल्यानेच पालिकेला जाग आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीस बजावून हे डम्पिंग बंद न केल्यास ५० कोटी दंड आणि निगा-देखभालीचा प्रतीदीन ५ लाखांचा दंड लावण्याचा इशारा दिल्यानंतर पालिकेने ते बंद करण्यासाठीचा तब्बल २१८ कोटी ५० लाख खर्चाचा प्रस्ताव आणला आहे.

दिवा डम्पिंग बंद केल्यावर त्याठिकाणी खेळाचे मैदान किंवा उद्यान विकसित करण्याचा उद्देश महापालिकेचा आहे. त्यासाठीच आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन असा उल्लेख झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यामुळे आता प्रस्तावात बदल करून पालिकेने पुन्हा हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला आहे.

२३ लाख मेट्रिक टन कचºयाची लावणार विल्हेवाटदिवा प्रभाग समितीअंतर्गत यापूर्वी ४ ठिकाणी घनकचºयाची विल्हेवाट लावण्यात येत होती. यापैकी ३ ठिकाणच्या जागेची क्षमता संपली आहे. त्यामुळे सध्या एकाच जागेवर कचरा टाकला जात आहे. ज्या ठिकाणी कचरा टाकण्याचे काम बंद केले आहे, त्याठिकाणी आतापर्यंत २३ लाख मेट्रिक टन कचरा टाकला आहे. त्यातच हे डम्पिंग खाडीकिनारी असल्याने ते शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून त्याचा वापर पर्यावरणपुरक करण्याच्या दृष्टीने या तीन भूखंडांवर बायोमाइनिंग किंवा कॅपिंग करण्याचा पालिकेचा विचार आहे. ही जागा सीआरझेडने बाधीत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पालिकेचे कान टोचून नोटीस बजावली आहे. यामध्ये ५० कोटींंचा दंड आणि प्रतीदिन निगा देखभालीचा खर्च हा ५ लाख वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच पालिकेने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.कचºयाची पाच घटकांत विभागणीया ठिकाणी जुन्या कचºयावर प्रक्रिया केल्यानंतर संपूर्ण भूखंड हा पुनर्वापरासाठी उपलब्ध होणार आहे. बायोमाईमिंग पद्धती अंतर्गत जुन्या कचºयाची विभागणी पाच घटकांमध्ये करून त्यावर घटकनिहाय शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेल्या प्रत्येक घटकामधून उत्पन्न मिळू शकते असा दावा पालिकेने केला आहे. याच पद्धतीने प्रक्रिया केल्यास पाच वर्षांत संपूर्ण कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. परंतु, यासाठी २३ लाख मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी पाच वर्षांत तब्बल २१८ कोटी ५० लाखांचा खर्च प्रस्तावित केला आहे.महासभेच्या निर्णयाकडे लक्ष : मागील महासभेत या डम्पिंगवरून वादळ उठले होते. स्थानिक नगरसेवकाने थेट या जागेवर टीडीआर घोटाळ्याचा आरोप करून पालिकेवर टीका केली होती. तसेच पालिकेकडून केल्या जाणाºया खर्चावरदेखील आक्षेप घेतला होता. त्यामुळे आता १९ डिसेंबरच्या महासभेत लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.