शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

कल्याणमध्ये मोफत रेशनिंग धान्य वाटपात भ्रष्टाचार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 12:00 IST

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा आरोप; घेतली रेशनिंग अधिका-यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना मोफत २५ किलो धान्य वाटप करण्याचे रेशनिंग दुकानचालकांना केंद्र, राज्य शासनाचे आदेश दिले आहेत. मात्र त्या धान्य वाटपामध्ये भ्रष्टाचार  झाला असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. २५ किलो ऐवजी अनेकांना अवघे १० किलोच धान्य मिळाले असून जे सुरु आहे ते योग्य नाही असे सांगून त्यांनी कल्याणमधील शिधावाटप अधिकारी एकनाथ पवार यांची भेट घेतली.

पवार यांनी सांगितले की, मोफत धान्य वाटपात कमी धान्य मिळाल्याच्या असंख्य तक्रारी आल्या असून जे सुरु आहे ते योग्य नाही. तसेच जे नाममात्र दरामध्ये १० किलो अन्नधान्य मिळणार आहे त्यामध्येही अवघे ४ किलोच काहींना धान्य मिळाल्याच्या तक्रारी नरेंद्र पवार यांच्याकडे नागरिकांनी केल्या. त्यानूसार खातरजमा करण्यासाठी पवार यांनी बुधवारी कल्याणमधील काही रेशनिंग दुकानांना भेट दिली. तेथे त्यांनी लाभार्थ्यांशी चर्चा केली, त्यानूसार सगळा गोंधळ त्यांच्या नीदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी थेट शिधावाटप अधिका-यांची भेट घेत घडला प्रकार त्यांच्या नीदर्शनास आणुन दिला. एकनाथ पवार यांनीही त्या तक्रारीची दखल घेत धान्य जे नियमानूसार आहे तसेच वितरीत व्हायला हवे, तसे नसेल होत तर मात्र संबंधितांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

पवार म्हणाले की, अटाळी गावामध्ये एका नगरसेवकाच्या नातेवाईकालाही असाच अनुभव आल्याचे ते म्हणाले. त्यांच्या रेशनकार्डवरचे धान्य देण्यास नकार देण्यात आला, जेव्हा आवाज उठवला तेव्हा धान्य देण्यात आले, पण अशा पद्धतीने धान्य वाटपाचे केंद्राचे आदेश असतांनाही खालच्या स्तरावर त्याची अंमलबजावणी पारदर्शी व्हायलाच हवी अशी मागणी पवार यांनी केली. शिधावाटप अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन  पाहणी करावी, तसेच संबंधितांना याचा जाब विचारावा, नागरिकांशी चर्चा करावी, त्यांचे गा-हाणे, तक्रारी ऐकून त्या तातडीने सोडवाव्यात. तसेच जे कोणी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करत असतील अशांवर कडक कारवाई करावी अशीही मागणी पवार यांनी केली.

ज्या उर्वरीत नागरिकांकडे केशरी रेशन कार्ड आहे अशांना मोफत धान्याचा लाभ तातडीने सुरु करण्यात यावा. त्यासाठी तर त्यांना कोणी परत पाठवू नये. त्यावर एकनाथ पवार यांनी तातडीने १ मे पासून सगळया केशरी कार्ड वाल्या नागरिकांनाही धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

नरेंद्र पवार हे काही जणांच्या तक्रारी घेऊन आले होते, त्यासंदर्भात वरिष्ठांना कळवले आहे. तसेच धान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्याचे वितरण जे पात्र लाभार्थी आहेत त्या सगळयांना देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. उर्वरीत केशरी कार्ड धारकांनाही १ मे पासून धान्य मिळण्याचे नियोजन सुरु आहे.

- एकनाथ पवार, शिधावाटप अधिकारी,कल्याण

टॅग्स :kalyanकल्याण