शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

नगरसेवकांचे केरळ पूरग्रस्तांना एक महिन्याचे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:51 IST

केरळ पूरग्रस्तांसाठी पक्षाच्या नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय शिवसेनेने घेताच, इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही मानधन देण्याचे घोषित केले.

उल्हासनगर : केरळ पूरग्रस्तांसाठी पक्षाच्या नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय शिवसेनेने घेताच, इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही मानधन देण्याचे घोषित केले. आमदार ज्योती कलानी यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन देण्याचे जाहीर केले असून महापालिकाही आर्थिक मदत करणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले.शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी आदींनी केरळातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. त्यापाठोपाठ शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे व पक्षाचे गटनेते रमेश चव्हाण यांनी पक्षाच्या २५ नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन केरळ पूरग्रस्तांना देण्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. सोमवारी महासभा सुरू होताच, दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहून महासभा स्थगित करण्यात आली. यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. त्यापूर्वी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी केरळ पूरग्रस्तांना एका महिन्याचे मानधन देण्याचे पत्र पालिका सचिवाकडे दिले. महापालिकेकडून आर्थिक आणि इतर मदतही करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.प्रल्हाद म्हात्रेंचे एक लाखाचे अर्थसाहाय्यडोंबिवली : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी डोंबिवलीतील युवा युथ फाउंडेशनने सुमारे तीन टन विविध साहित्य जमा केले. हे धान्य, साहित्य केरळपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेचे शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी एक लाख रुपये रोख रक्कम दिली. दरम्यान, सोमवारी हे साहित्य रवाना झाले असून ते मंगळवारी केरळमध्ये पोहोचणार आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून युवा युथ फाउंडेशनने जीवनावश्यक वस्तू व सामान देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. फाउंडेशनने त्यासाठी ठाकुर्ली व डोंबिवली येथे दोन संकलन केंद्रे सुरू केली. नागरिकांनी शनिवार आणि रविवारी तेथे तीन टन सामान जमा केले. परंतु, ते केरळमध्ये पोहोचवण्यासाठी ९० हजार खर्च येणार होता. त्यासाठी निधी गोळा करण्याचा पेच युवकांसमोर होता. मात्र, म्हात्रे यांनी एक लाख रुपये देत फाउंडेशनला मदतीचा हात दिला. केरळची परिस्थिती कोणावरही येऊ शकते. त्यासाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. त्यातच आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून अर्थसाहाय्य केल्याचे म्हात्रे म्हणाले.भाजपातर्फे केरळला २५ लाखांची मदतडोंबिवली : केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून भाजपाच्या कल्याण जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. दरम्यान, चव्हाण यांनीही त्यांचे महिन्याचे दोन लाख १३ हजारांचे मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिल्याचे जाहीर केले.सावरकर रोड येथील चव्हाण यांच्या जाणता राजा कार्यालयात शुक्रवारी केरळ समाजासमवेत बैठक झाली. कल्याण-डोंबिवलीतील भाजपाचे नगरसेवक आणि आपण दिलेला निधी, असे एकूण २५ लाखांचे अर्थसाहाय्य केरळसाठी दिले जाणार आहे. डोंबिवलीतील नागरिकांनीही ‘सेवा भारती केरलम’ यांना साहाय्य करावे, असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनीही त्यांचे महिन्याचे एक लाखाचे मानधन केरळ सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरKerala Floodsकेरळ पूर