शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Coronavirus: वीज ग्राहकांकडून ‘महावितरण’ची सावकारी वसुली; सर्वसामान्यांना बसला शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:23 IST

तिप्पट, चौपट रकमेच्या बिलांमुळे जिल्ह्यात सर्वत्र आक्रोश

ठाणे : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेकांच्या पगारात मोठी कपात झाली आहे. तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्वातून सावरत असतानाच ‘महावितरण’ने ग्राहकांना भरमसाट रकमेची बिले पाठवून शॉक दिला आहे. राज्य सरकार बँका, शाळा, महाविद्यालये आदींसह इतर संस्थांना पुढील किमान तीन महिने कोणत्याही प्रकारची व्याज अथवा फी आकारणी करु नका, असे सांगत असताना सरकारी कंपनी असलेल्या ‘महावितरण’कडून सावकारी वसुली का सुरु आहे, असा सवाल संतप्त वीज ग्राहकांनी केला आहे.

ठाण्यासह संपूर्ण महाराष्टÑात सध्या महावितरणच्या वाढीव बिलांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. घरी नसूनही विजेचे बिल एवढे आलेच कसे, सरासरी बिल भरले असतांनाही आता एवढे बिल कसे, वीजदरवाढ झाली तरी एवढे बिल येऊच कसे शकते, अशा तक्रारी नागरिकांकडून सुरु झाल्या आहेत. मार्च महिन्याच्या अखेरपासून कोरोनामुळे संपूर्णपणे लॉकडाऊन सुरु होता. तो जून महिन्यात काहीसा शिथिल करण्यात आला. या तीन महिन्यांच्या काळात सर्वसामान्यांनी रोजगार गमावले आहेत. काहींच्या पगारात कपात झाली आहे. अनेकांच्या डोक्यावर विविध प्रकारची कर्ज आहेत. ती कशी फेडायची, याची चिंता त्यांना सतावत असतांना जून महिन्यात आलेल्या बिलांमुळे सर्वांचीच झोप उडाली आहे.

ज्या ग्राहकाला महिन्याचे १,५०० रुपयांच्या आसपास बिल येत होते, त्यांना आता पाच हजारांच्या घरात बिले धाडली आहेत. ज्या घरात वीज वापर जास्त असल्याने पाच हजारांचे बिल येत होते, त्यांना चक्क १५ हजारांचे बिल आले आहे. काही उद्योजक , व्यापारी यांना १५ ते २५ लाखांची बिले आली आहेत.

अनेकांची दुकाने, कारखाने लॉकडाऊनमुळे बंद होती. कामगारांना घरी बसून त्यांनी वेतन दिले. त्यात आता अचानक मोठमोठ्या रकमेची बिले आल्याने उद्योजक, व्यापारी हबकले आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली व इतर भागातही महावितरणविरोधात आंदोलने सुरू झाली आहेत.

या संदर्भात ‘महावितरण’च्या तज्ज्ञ अभ्यासकांना विचारले असता, नागरिकांना आलेले बिल हे नियमानुसारच आले असल्याचे त्यांनी सांगितले. घरगुती विजेचा वापर वाढला असून सरासरी बिल आकारतांना ते नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यानुसार आकारण्यात आले आहे. परंतु, त्यामुळे ते कमी दिसत आहे, वास्तविक मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा जास्त होता. सर्वचजण घरी होते, त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे, तसेच वीजदरात वाढ झाल्याने हे बिल ग्राहकांना आले आहे. परंतु, एखाद्या प्रकरणात कोणाला जास्त बिल दिले गेले असेल, तर त्यासाठी दाद मागण्याची व्यवस्था ‘महावितरण’ने उपलब्ध केली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.‘महावितरण’कडून नियमानुसारच बिलांची आकारणी झालेली आहे. यापूर्वी जेव्हा संपूर्ण उद्योग, व्यवसाय सुरु होते, त्यावेळेस २१ हजार मेगावॅट युनिट विजेचा वापर होता. तर, लॉकडाऊनच्या काळात व्यापार, उद्योग बंद असतानाही वीजवापर कमी झालेला नाही, तो १४ हजार मेगावॅटपर्यंत झाला आहे. त्यामुळे निश्चितच घरगुती विजेचा वापर या काळात वाढला आहे. ज्यांना वाटत असेल की, आम्हाला जास्त रकमेची बिले आली आहेत, त्यांच्यासाठी एक लिंक महावितरणने देऊ केली आहे, त्यावर ते आपल्या बिलाची खातरजमा करूशकतात.- अनिल कांबळे, मुख्य माहिती व जनसंपर्क अधिकारी, महावितरण‘महावितरण’कडून नियमानुसारच बिलांची आकारणी झालेली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये विजेचा वापर निश्चितच वाढला आहे. त्यामुळे आलेले बिल हे योग्य आहे. त्यामुळे वाढीव पैसे ग्राहकांना भरावेच लागणार आहेत. दोन कोटी ८० लाख लोकांना ‘महावितरण’ फसवत नाही. चूक झाली नसेल असे माझे म्हणणे नाही. परंतु, यातून कोणाला दोष देणे योग्य नाही. १०० युनिट ऐवजी २५० युनिट कसे वाढले, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्याचे उत्तर वापर वाढला हेच आहे. - अशोक पेंडसे, वीजविषयक अभ्यासक

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज