शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: परराज्यात विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ३५ बसेसवर ठाणे आरटीओची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:15 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना सर्रास परराज्यात वाहतूक करणाºया तब्बल ३५ खासगी बसेसवर ठाणे आरटीओच्या भरारी पथकाने कारवाई केली. या बसेस जप्त करण्यात आल्या असून बसमधील प्रवाशांना मात्र क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सोशल डिस्टन्सिंगसह अनेक नियम धाब्यावर बसने नेपाळला जाणा-या ४४ प्रवाशांनाही घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना मुंबई, ठाण्यातून परराज्यांत तसेच नेपाळकडे जाणा-या एका बसला ४४ प्रवाशांसह ठाणे प्रादेशिक परिवहनच्या भरारी पथकाने रविवारी पडघा येथे पकडले. याशिवाय, गेल्या तीन दिवसांत आरटीओने ठाण्यातून परराज्यात जाणारी आणि येणारी अशी ३५ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहिर केलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करुन परप्रांतीय प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मोटार वाहन निरीक्षक उमेश देवरे, सपना जमदाडे आणि विजय शिंदे आदींच्या पथकाने पडघा टोल नाका, घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल चेक पोस्ट आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दापचरी चेक पोस्ट आदी ठिकाणी १९ ते २१ जून या तीन दिवसांमध्ये ही कारवाई केली.१ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी परराज्यात किंवा जिल्ह्यात जाण्यासाठी ईपास काढणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे हे अत्यावश्यक करण्यात आले आहे. तरीही नियम धाब्यावर बसवत या प्रवाशांची वाहतूक परराज्यातून आलेल्या नऊ तर परराज्यात जाणाºया २६ अशा ३५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. पडघा टोल नाका येथे २१ जून रोजी पकडलेल्या एका बसमध्ये तर चक्क २३ ऐवजी ४४ प्रवासी प्रवास करीत असल्याचे आढळले. यातील प्रवासी शहापूरमार्गे नेपाळकडे जात होते. ही बस आता जप्त करण्यात आली असून सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशा तीन बस याच मार्गावर पकडण्यात आल्या. या बस चालकांकडे ईपास नव्हते. शिवाय, परमिट आणि इतर महत्वाची कागदपत्रेही नव्हती. अशाच प्रकारे गेल्या तीन दिवसांमध्ये दापचेरी चेक पोस्ट येथे १३, घोडबंदर नाका येथे ११ आणि पडघा टोल नाका येथे ११ अशा ३५ बसेस या मार्गावरुन जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पथकाने १९ जून रोजी १० बसेसवर, २० जून रोजी ११ आणि २१ जून रोजी १४ बसेसवर कारवाई केली. यातील सर्व प्रवाशांना ३० दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाईक यांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीस