शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Coronavirus News: परराज्यात विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ३५ बसेसवर ठाणे आरटीओची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:15 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना सर्रास परराज्यात वाहतूक करणाºया तब्बल ३५ खासगी बसेसवर ठाणे आरटीओच्या भरारी पथकाने कारवाई केली. या बसेस जप्त करण्यात आल्या असून बसमधील प्रवाशांना मात्र क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सोशल डिस्टन्सिंगसह अनेक नियम धाब्यावर बसने नेपाळला जाणा-या ४४ प्रवाशांनाही घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून विनापरवाना मुंबई, ठाण्यातून परराज्यांत तसेच नेपाळकडे जाणा-या एका बसला ४४ प्रवाशांसह ठाणे प्रादेशिक परिवहनच्या भरारी पथकाने रविवारी पडघा येथे पकडले. याशिवाय, गेल्या तीन दिवसांत आरटीओने ठाण्यातून परराज्यात जाणारी आणि येणारी अशी ३५ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहिर केलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करुन परप्रांतीय प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मोटार वाहन निरीक्षक उमेश देवरे, सपना जमदाडे आणि विजय शिंदे आदींच्या पथकाने पडघा टोल नाका, घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल चेक पोस्ट आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दापचरी चेक पोस्ट आदी ठिकाणी १९ ते २१ जून या तीन दिवसांमध्ये ही कारवाई केली.१ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी परराज्यात किंवा जिल्ह्यात जाण्यासाठी ईपास काढणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे हे अत्यावश्यक करण्यात आले आहे. तरीही नियम धाब्यावर बसवत या प्रवाशांची वाहतूक परराज्यातून आलेल्या नऊ तर परराज्यात जाणाºया २६ अशा ३५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. पडघा टोल नाका येथे २१ जून रोजी पकडलेल्या एका बसमध्ये तर चक्क २३ ऐवजी ४४ प्रवासी प्रवास करीत असल्याचे आढळले. यातील प्रवासी शहापूरमार्गे नेपाळकडे जात होते. ही बस आता जप्त करण्यात आली असून सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशा तीन बस याच मार्गावर पकडण्यात आल्या. या बस चालकांकडे ईपास नव्हते. शिवाय, परमिट आणि इतर महत्वाची कागदपत्रेही नव्हती. अशाच प्रकारे गेल्या तीन दिवसांमध्ये दापचेरी चेक पोस्ट येथे १३, घोडबंदर नाका येथे ११ आणि पडघा टोल नाका येथे ११ अशा ३५ बसेस या मार्गावरुन जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पथकाने १९ जून रोजी १० बसेसवर, २० जून रोजी ११ आणि २१ जून रोजी १४ बसेसवर कारवाई केली. यातील सर्व प्रवाशांना ३० दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाईक यांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीस