शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ठाणे जिल्हयात दिवसभरात दोन हजार १५० बाधीतांसह सर्वाधिक ५४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:40 IST

गेल्या २४ तासांमध्ये ठाणे जिल्हयात दोन हजार १५० नवीन कोरोना बाधित रु ग्णांची वाढ झाली. तर ५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५५ हजार ३०४ तर मृतांची संख्या एक हजार ६१६ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा सर्वाधिक ६६१ इतक्या विक्रमी रुग्णांची नोंदठाणे महानगर पालिकेच्या परिसरात बाधितांची ४१७ तर नऊ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी देखिल कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली. गेल्या २४ तासांमध्ये जिल्हयात दोन हजार १५० नवीन कोरोना बाधित रु ग्णांची वाढ झाली. तर ५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५५ हजार ३०४ तर मृतांची संख्या एक हजार ६१६ इतकी झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात रविवारी देखिल सर्वाधिक ६६१ इतक्या विक्रमी रुग्णांची नोंद झाली. तर आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बाधितांची १२ हजार ८१३ तर मृतांची संख्या १८९ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महानगर पालिकेच्या परिसरात बाधितांची ४१७ तर नऊ जणांच्या मृत्यूमुळे याठिकाणी बाधितांची १३ हजार ३४२ तर, मृतांची संख्या ५०८ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात नविन ३१३ रुग्ण दाखल झाले. तर ११ जणाचा मृत्यू झाला. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या नऊ हजार ४४५ तर मृतांची संख्या ३०३ इतकी झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ११९ रु ग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची पाच हजार ५६८ तर मृतांची संख्या १९१ झाली. भिवंडी निजामपूर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ७९ बाधितांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ही दोन हजार ७८२ च्या घरात गेली असून मृतांची संख्याही १४६ च्या घरात पोहचली आहे. उल्हासनगरमध्ये रविवारी २८६ नविन रुग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची चार हजार २०० तर मृतांची संख्या ६७ झाली आहे. अंबरनाथमध्ये तब्बल १०० नविन रुग्ण दाखल झाले असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी आता बाधितांची संख्या दोन हजार ६७४ तर मृतांची संख्या १०५ इतकी झाली. त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये ४१ रु ग्ण नव्याने नोंदविले गेले. याठिकाणी एकूण बाधितांची संख्या आता एक हजार ३९३ झाली असून सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृतांची संख्या ही २० आहे. तर ठाणे ग्रामीण भागात शनिवारप्रमाणेच रविवारी देखिल १३४ नवे रुग्ण दाखल झाले. तर पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार २७ इतकी झाली असून मृतांची संख्या आता ८७ च्या घरात पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस