शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Coronavirus News: ठाणे जिल्हयात दिवसभरात दोन हजार १५० बाधीतांसह सर्वाधिक ५४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:40 IST

गेल्या २४ तासांमध्ये ठाणे जिल्हयात दोन हजार १५० नवीन कोरोना बाधित रु ग्णांची वाढ झाली. तर ५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५५ हजार ३०४ तर मृतांची संख्या एक हजार ६१६ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा सर्वाधिक ६६१ इतक्या विक्रमी रुग्णांची नोंदठाणे महानगर पालिकेच्या परिसरात बाधितांची ४१७ तर नऊ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी देखिल कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली. गेल्या २४ तासांमध्ये जिल्हयात दोन हजार १५० नवीन कोरोना बाधित रु ग्णांची वाढ झाली. तर ५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५५ हजार ३०४ तर मृतांची संख्या एक हजार ६१६ इतकी झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात रविवारी देखिल सर्वाधिक ६६१ इतक्या विक्रमी रुग्णांची नोंद झाली. तर आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बाधितांची १२ हजार ८१३ तर मृतांची संख्या १८९ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महानगर पालिकेच्या परिसरात बाधितांची ४१७ तर नऊ जणांच्या मृत्यूमुळे याठिकाणी बाधितांची १३ हजार ३४२ तर, मृतांची संख्या ५०८ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात नविन ३१३ रुग्ण दाखल झाले. तर ११ जणाचा मृत्यू झाला. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या नऊ हजार ४४५ तर मृतांची संख्या ३०३ इतकी झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ११९ रु ग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची पाच हजार ५६८ तर मृतांची संख्या १९१ झाली. भिवंडी निजामपूर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ७९ बाधितांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ही दोन हजार ७८२ च्या घरात गेली असून मृतांची संख्याही १४६ च्या घरात पोहचली आहे. उल्हासनगरमध्ये रविवारी २८६ नविन रुग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची चार हजार २०० तर मृतांची संख्या ६७ झाली आहे. अंबरनाथमध्ये तब्बल १०० नविन रुग्ण दाखल झाले असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी आता बाधितांची संख्या दोन हजार ६७४ तर मृतांची संख्या १०५ इतकी झाली. त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये ४१ रु ग्ण नव्याने नोंदविले गेले. याठिकाणी एकूण बाधितांची संख्या आता एक हजार ३९३ झाली असून सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृतांची संख्या ही २० आहे. तर ठाणे ग्रामीण भागात शनिवारप्रमाणेच रविवारी देखिल १३४ नवे रुग्ण दाखल झाले. तर पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार २७ इतकी झाली असून मृतांची संख्या आता ८७ च्या घरात पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस