शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाण्यात रुग्णांचा मृत्युदर पाच टक्क्यांनी वाढला, महापालिका आकडे लपवित असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 00:10 IST

CoronaVirus News: महापालिकेच्या जवाहरबाग स्मशानभूमीत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेह जाळले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, तर इतर दोन स्मशानभूमीतही रोज ८ ते १० मृतदेह येत असल्याची माहिती स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांनी दिली.

- अजित मांडके

ठाणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आता मृत्युदरही वाढला आहे. यापूर्वी मृत्युदर दोन टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३  टक्क्यांच्या घरात गेला आहे.  परंतु, महापालिकेच्या दप्तरी मात्र रोज ५ ते सात जणांचेच मृत्यू होत असल्याची आकडेवारी दिली जात आहे. महापालिकेच्या जवाहरबाग स्मशानभूमीत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेह जाळले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, तर इतर दोन स्मशानभूमीतही रोज ८ ते १० मृतदेह येत असल्याची माहिती स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांनी दिली. त्यामुळे महापालिका पुन्हा मृत्यूंचा आकडा लपविते काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. गेल्या दोन दिवसांत ३५ मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. परंतु महापालिकेने तो फेटाळला आहे. पालिका हद्दीत आतापर्यंत ९५ हजार ७३७ रुग्ण आढळले आहेत, तर ७८ हजार ४६२ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एक हजार ४४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. यापूर्वी महापालिका हद्दीत मृत्युदर हा दोन टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्क्यांच्या घरात गेला आहे. परंतु, हा आकडा केवळ महापालिकेच्या दप्तरी आहे. प्रत्यक्षात पालिका हद्दीत रोजच्या रोज मृत्यूंचा आकडा वाढत आहे. स्मशानभूमीतील कामगारांशी चर्चा केली असता, जेव्हापासून शहरात कोरोना वाढत आहे, तेव्हापासून आमचादेखील ताण वाढला असल्याचे ते सांगतात. परंतु त्यांनादेखील ही माहिती उघड न करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ठाणे  महापालिकेच्या एकट्या जवाहर बाग स्मशानभूमीत रविवारी सुमारे २० मृतांवर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली, तर मागील काही दिवसांत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेहांना अग्नि देण्याचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले. जवाहर बाग स्मशानभूमीत चार गॅस शवदाहिनी आहेत त्यामुळे येथे सध्या येथे येणाऱ्या  मृतदेहांमुळे येथील कर्मचाऱ्यांवरील ताणदेखील वाढल्याचे दिसत आहे, तर उर्वरित वागळे आणि कळव्याच्या स्मशानभूमीतही रोजच्या रोज ८ ते १० कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रोजच्या रोज सरासरी आकडा जरी काढला १५ ते २० मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. परंतु, महापालिकेच्या दप्तरी रोज ५ ते ७च मृत्यू दाखविले जात आहेत. त्यामुळे महापालिका कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू लपवित आहे का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. यापूर्वीदेखील मागील वर्षी अशाच प्रकारे पालिकेने मृत्यू लपविल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे आता किती मृत्यू महापालिका लपविते आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शनिवारी एका दिवसात ग्लोबल रुग्णालयात सुमारे २० मृत्यू झाले असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. परंतु, पालिकेने हा दावा फेटाळला आहे. येथील रुग्णालयात दाखल एका रुग्णाने त्याच्या नजरेसमोरच आठ मृतदेह नेतांना पाहिले असल्याने त्याने ही माहिती दिली. परंतु, तसे काहीच झालेले नसल्याचा दावा महापालिकेने केला. 

सव्वापाच तासांनंतर मिळाली रुग्णवाहिका ठाण्यात एका खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा पहाटे मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून नातेवाइकांनी शववाहिनी मिळावी यासाठी फोन केला. तब्बल सव्वापाच तासानंतर ती मिळाली. त्यानंतर स्मशानभूमीत नेल्यानंतर एक तास त्यांना थांबावे लागले. त्यातही शववाहिनी मिळावी यासाठी संपर्क साधल्यानंतर आधी शासकीय रुग्णालयातील मृतदेह न्यायचे आहेत, त्यानंतर तुमच्याकडे येऊ, असे उत्तर रुग्णांच्या नातेवाइकांना मिळाले होते. 

महापालिकेकडून मृत्यूंचा आकडा लपविला जात नाही. महापालिकेकडे जेवढी नोंदणी होत आहे, तेवढेच दाखविले जात आहे.- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे