शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

CoronaVirus News: कोरोना महामारीत लिंबू, संत्री, मोसंबीचा राेगप्रतिकारकशक्तीचा उतारा महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 00:02 IST

वाढत्या मागणीमुळे दर वाढले : ‘क’ जीवनसत्त्व ठरते शरीराला पाेषक

- मुरलीधर भवारकल्याण : कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, त्यावर सगळ्य़ात महत्त्वाचा उतारा हा लिंबू, संत्री आणि मोसंबीचा मानला जात आहे. त्यामुळे लिंबू, संत्री, मोसंबीला बाजारात जास्त मागणी आहे. यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारण त्यात क जीवनसत्त्व जास्त आहे. ते शरीराला लाभदायक ठरते. कोरोनावर अद्याप ठोस औषध बाजारात उपलब्ध नाही. कोरोनाची लस बाजारात उपलब्ध झाली आहे. मात्र, लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सगळ्य़ांसाठी सुरू नाही. महापालिकेच्या रुग्णालयातून लसीकरण मोफत केले जात आहे, तर खासगी रुग्णालयात लसीसाठी २५० रुपये मोजावे लागतात. कोरोनाची लस बाजारात येण्यापूर्वी अनेक गोष्टी सुचविल्या जात होत्या. त्यात कोणत्या फळांचे सेवन करावे, असे सांगितले जात होते. ज्याची रोगप्रतिकारशक्ती जास्त त्यांना कोरोनाची लागण लवकर होत नाही. ती झाल्यास रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्यास रुग्ण कोरोनावर मात करून त्यातून बरा होतो. अनेकांच्या सेवनात क जीवनसत्त्वाचा अभाव असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी दिसून येते. त्यांची इम्युनिटी पॉवर कमी असते. आहारशास्त्रज्ञांच्या मते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात समप्रमाणात क जीवनसत्त्व असलेल्या फळांचे नियमित सेवन केल्यास ती वाढते. त्यामुळे आजही सकाळीच व्यायामाला जाणारे लोक ज्यूस सेंटरमध्ये लिंबू सरबत आणि मोसंबी आणि संत्र्यांचा ज्यूस पिण्यास पसंती देताना दिसून येत आहेत. अनेक ज्यूस सेंटरचालकांनी कोरोनाकाळात या तीन ज्यूसला प्राधान्य दिले आहे. ग्राहकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्यूस सेंटरचालकांनीही चंग बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या कोरोनाचा कहर वाढत असल्याने मैदानानजीक असलेल्या ज्यूस सेंटरचा ग्राहक कमी झाला आहे. फळांशी संबंधित दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. त्यामुळे फळांची खरेदी वाढली आहे.आवक कुठून होते संत्री मोसंबीची आवक अमरावती, नागपूर येथून होते, तर लिंबू हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून जास्त प्रमाणातून बाजारात येतो. सध्या कोरोनाकाळात शेतमाल वाहतुकीस मुभा असली तरी माल कमी येत आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे.तज्ज्ञ काय म्हणतात... क जीवनसत्त्वाची फळे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, हे खरे आहे. मात्र, त्यांच्या सेवनामुळे कोरोनावर मात करता येईल, याचा दावा करता येत नाही. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोना रोखण्यासाठी ती कदाचित उपयुक्त पडू शकते. शंभर टक्के उपयुक्त पडेल, असा दावा करता येत नाही. मात्र, कोरोना आला म्हणून क जीवनसत्त्वाच्या फळांच्या सेवनाचा अतिरेक करून चालणार नाही. काही प्रमाणातच त्यांचे सेवन केले जावे.- डॉ. प्रा. उदयकुमार पाध्ये, आहारतज्ज्ञनियमित क जीवनसत्त्वाचे सेवन करतो. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेवन करीत आहे. केवळ क जीवनसत्त्वाची फळे खात नाही. त्यासोबत नियमित व्यायामही करतो.-राजू शेट्टी२. मला कोरोना झाला होता. त्यावेळी मला डॉक्टरांनी  क जीवनसत्त्व असलेली फळे खाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मोसंबी आणि संत्री ही फळे मी खाल्ली. मला लवकर तंदुरुस्त होण्यास त्यामुळे मदत झाली. -सोपन वरगडे दर का वाढले : कोरोनामुळे लिंबू, मोसंबी आणि संत्री यांचे दर वाढलेले आहेत. बाजारात लिंबू आणि मोसंबी मिळत आहे. मात्र, संत्रीची आवक जास्त नाही. संत्रीची आवक कमी असल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. जवळपास ३० ते ४० टक्के दरवाढ झालेली दिसून येत आहे. फळे    जानेवारी    फेब्रुवारी    मार्च    एप्रिललिंबू    १०,     १५,     २०,     ४० रुपये.मोसंबी    ४०,     ४५,     ५०,     ६० रुपये.संत्री    ८०,     १००,     १२०,     २४० रुपये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या