शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
3
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
4
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
5
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
6
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
7
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
8
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
9
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
10
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
11
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
12
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल
13
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
14
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
15
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
16
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
17
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
18
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
19
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
20
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

CoronaVirus News: कोरोना महामारीत लिंबू, संत्री, मोसंबीचा राेगप्रतिकारकशक्तीचा उतारा महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 00:02 IST

वाढत्या मागणीमुळे दर वाढले : ‘क’ जीवनसत्त्व ठरते शरीराला पाेषक

- मुरलीधर भवारकल्याण : कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, त्यावर सगळ्य़ात महत्त्वाचा उतारा हा लिंबू, संत्री आणि मोसंबीचा मानला जात आहे. त्यामुळे लिंबू, संत्री, मोसंबीला बाजारात जास्त मागणी आहे. यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारण त्यात क जीवनसत्त्व जास्त आहे. ते शरीराला लाभदायक ठरते. कोरोनावर अद्याप ठोस औषध बाजारात उपलब्ध नाही. कोरोनाची लस बाजारात उपलब्ध झाली आहे. मात्र, लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सगळ्य़ांसाठी सुरू नाही. महापालिकेच्या रुग्णालयातून लसीकरण मोफत केले जात आहे, तर खासगी रुग्णालयात लसीसाठी २५० रुपये मोजावे लागतात. कोरोनाची लस बाजारात येण्यापूर्वी अनेक गोष्टी सुचविल्या जात होत्या. त्यात कोणत्या फळांचे सेवन करावे, असे सांगितले जात होते. ज्याची रोगप्रतिकारशक्ती जास्त त्यांना कोरोनाची लागण लवकर होत नाही. ती झाल्यास रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्यास रुग्ण कोरोनावर मात करून त्यातून बरा होतो. अनेकांच्या सेवनात क जीवनसत्त्वाचा अभाव असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी दिसून येते. त्यांची इम्युनिटी पॉवर कमी असते. आहारशास्त्रज्ञांच्या मते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात समप्रमाणात क जीवनसत्त्व असलेल्या फळांचे नियमित सेवन केल्यास ती वाढते. त्यामुळे आजही सकाळीच व्यायामाला जाणारे लोक ज्यूस सेंटरमध्ये लिंबू सरबत आणि मोसंबी आणि संत्र्यांचा ज्यूस पिण्यास पसंती देताना दिसून येत आहेत. अनेक ज्यूस सेंटरचालकांनी कोरोनाकाळात या तीन ज्यूसला प्राधान्य दिले आहे. ग्राहकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्यूस सेंटरचालकांनीही चंग बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या कोरोनाचा कहर वाढत असल्याने मैदानानजीक असलेल्या ज्यूस सेंटरचा ग्राहक कमी झाला आहे. फळांशी संबंधित दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. त्यामुळे फळांची खरेदी वाढली आहे.आवक कुठून होते संत्री मोसंबीची आवक अमरावती, नागपूर येथून होते, तर लिंबू हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून जास्त प्रमाणातून बाजारात येतो. सध्या कोरोनाकाळात शेतमाल वाहतुकीस मुभा असली तरी माल कमी येत आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे.तज्ज्ञ काय म्हणतात... क जीवनसत्त्वाची फळे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, हे खरे आहे. मात्र, त्यांच्या सेवनामुळे कोरोनावर मात करता येईल, याचा दावा करता येत नाही. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोना रोखण्यासाठी ती कदाचित उपयुक्त पडू शकते. शंभर टक्के उपयुक्त पडेल, असा दावा करता येत नाही. मात्र, कोरोना आला म्हणून क जीवनसत्त्वाच्या फळांच्या सेवनाचा अतिरेक करून चालणार नाही. काही प्रमाणातच त्यांचे सेवन केले जावे.- डॉ. प्रा. उदयकुमार पाध्ये, आहारतज्ज्ञनियमित क जीवनसत्त्वाचे सेवन करतो. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेवन करीत आहे. केवळ क जीवनसत्त्वाची फळे खात नाही. त्यासोबत नियमित व्यायामही करतो.-राजू शेट्टी२. मला कोरोना झाला होता. त्यावेळी मला डॉक्टरांनी  क जीवनसत्त्व असलेली फळे खाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मोसंबी आणि संत्री ही फळे मी खाल्ली. मला लवकर तंदुरुस्त होण्यास त्यामुळे मदत झाली. -सोपन वरगडे दर का वाढले : कोरोनामुळे लिंबू, मोसंबी आणि संत्री यांचे दर वाढलेले आहेत. बाजारात लिंबू आणि मोसंबी मिळत आहे. मात्र, संत्रीची आवक जास्त नाही. संत्रीची आवक कमी असल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. जवळपास ३० ते ४० टक्के दरवाढ झालेली दिसून येत आहे. फळे    जानेवारी    फेब्रुवारी    मार्च    एप्रिललिंबू    १०,     १५,     २०,     ४० रुपये.मोसंबी    ४०,     ४५,     ५०,     ६० रुपये.संत्री    ८०,     १००,     १२०,     २४० रुपये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या