शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus News: जि.प. कर्मचाऱ्यांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:44 IST

इमारत ठरली धोकादायक; २२ कुटुंबे होणार बेघर

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी सुमारे २० वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारतीच्या स्ट्रक्चरल आॅडिटच्या अहवालात तिला धोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर प्रशासनाने तीत राहणाºया कर्मचाºयांच्या २० ते २२ कुटुुंबांना तत्काळ घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे त्यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून आता कोरोनाच्या संकटात जायचे कुठे, असा सवाल त्यांनी केला आहे.ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील श्रीनगर येथे जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांची अल्पबचत विकास इमारत आहे. तळ अधिक चार मजल्यांच्या दोन इमारती आहेत. या इमारतींत सुमारे २० ते २२ कुटुुंबे राहत असून ती अंदाजे १५ ते २० वर्षे जुनी आहे. या इमारतीत केवळ ठाणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी राहत नसून कोकण भवन, आरोग्य विभागातील कर्मचारी वास्तव्यास आहेत. या इमारतींना अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. या इमारतींत पाण्याची मुख्य समस्या येथील रहिवाशांना भेडसावत होती. तर, अनेकदा सांडपाणीमिश्रित पाणी येत असल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी संबंधित अधिकाºयांशी चर्चा करून पाणीप्रश्न सोडविला होता. तसेच इमारतींबाबत ज्या काही दुरुस्त्या आहेत, त्या दुरुस्त्यांच्या कामाच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या.त्यानुसार, ज्या रहिवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने ज्या दुरुस्त्या करणे आवश्यक होते, त्या केल्या होत्या. स्ट्रक्चरल आॅडिटनंतर घेतला निर्णयवारंवार या इमारतींतील रहिवाशांकडून नादुरुस्तीच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे वारंवारच्या या तक्रारींच्या अनुषंगाने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे आणि मुख्यालय शाखा अभियंता दत्तू गीते यांनी संपूर्ण इमारतींची पाहणी करून या इमारतींचे एप्रिल महिन्यात स्ट्रक्चरल आॅडिट केले.त्यात ही इमारत धोकादायक असून राहण्यास अयोग्य असल्याचे सिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेऊन रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यानुसार, ती रिक्त करून तिचे निर्लेखन करण्यात येणार आहे. तिच्या निर्लेखन प्रस्तावालादेखील महासभेने मंजुरी दिली आहे.