शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

Coronavirus News: कोरोनाच्या संकटातही साडेपाचशे कर्मचाऱ्यांना सहा महिने वेळेवर वेतन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 23:28 IST

कोरोनासारख्या जागतिक साथीच्या आजारांवरही नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे जिल्हा हिवताप निर्मूलन विभागातील कर्मचारी अगदी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. तरीही, या कर्मचा-यांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेळेवर वेतन दिले जात नसल्यामुळे कर्मचाºयांमध्ये कमालीचे संतापाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देखरे कोविड योद्धेच उपेक्षित हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्याला असाही ताप

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळ्याच्या काळात उद्भवणा-या हिवताप आणि कावीळसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हिवताप निर्मूलन विभागाकडून केले जाते. त्यात सध्या कोरोनासारख्या जागतिक साथीच्या आजारांवरही नियंत्रण मिळविण्यासाठी या विभागातील कर्मचारी अगदी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. तरीही, या कर्मचाºयांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेळेवर वेतन दिले जात नसल्यामुळे कर्मचाºयांमध्ये कमालीचे संतापाचे वातावरण आहे. कोरोनामध्ये काम करूनही वेतन विलंबाने का दिले जाते, असा सवालही आता या कर्मचा-यांकडून उपस्थित केला जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी विविध उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने आरोग्य विभागासह विविध विभागांतील कर्मचारीदेखील या युद्धात सहभागी केले आहेत. त्यानुसार, कोरोनाबाधित रु ग्णांना विलगीकरण कक्षात नेणे, त्यांचा अहवाल अद्ययावत करणे आदी महत्त्वाची कामे या कर्मचा-यांवर सोपविण्यात आली आहेत. त्यात पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी याच विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे यंदा या विभागातील कर्मचा-यांना दोन आजारांशी लढा द्यावा लागत आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ५०० ते ५५० हिवताप निर्मूलन विभागातील कर्मचारी जीवाची पर्वा न करता तसेच आपल्या कुटुंबीयांपासून लांब राहून कर्तव्य बजावत आहेत. तरीही, या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. एकीकडे कोविड योद्धे म्हणून काम करायचे? मग, त्यांचे वेतन वेळेवर का नको द्यायला, असा सवालही हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संतोष भोईर यांनी जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे केला आहे. 

‘‘अगदी अलीकडेच जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये कर्मचा-यांची कार्यालयीन संख्याही कमी आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बरीच कामे करावी लागतात. पण, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.’’डॉ. महेश नगरे, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी, ठाणे

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस