शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

CoronaVirus News : कोरोनामुळे यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:08 IST

कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर गर्दी, समूह टाळावाच लागेल, हे लक्षात घेत दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचे महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने ठरवले आहे.

स्रेहा पावसकरठाणे : राज्यात गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले जात आहे. सोबतच दहीहंडी उत्सव साजरा न करण्याची गोविंदा पथकांची मानसिकता दिसत आहे. मोठ्या समूहाशिवाय दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकत नाही आणि कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर गर्दी, समूह टाळावाच लागेल, हे लक्षात घेत दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचे महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने ठरवले आहे.गणेशोत्सवाइतकाच महत्त्वाचा दुसरा सण म्हणजे दहीहंडी. दहीहंडी उत्सवासाठी अनेक गोविंदा पथके साधारण महिनाभर आधीपासून सराव सुरु करतात. दुसरीकडे आयोजकही मोठ्या प्रमाणात आयोजन करुन थरांसाठी बक्षिसे जाहीर करतात. गेल्या काही वर्षात ठाण्यात तर लाखोंच्या हंड्या उभारल्या जाऊ लागल्या आणि त्या फोडून लाखमोलाचे लोणी खाण्यासाठी गोविंदा पथके सकाळीच ठाण्यात दाखल होत होती.ठिकठिकाणच्या हंड्या फोडण्यासाठी आणि बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. मात्र यंदा कोरोनामुळे समूह एकत्र येईल अशा कार्यक्रमांना बंदी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे. अशातच गर्दीशिवाय हा उत्सव होऊच शकत नाही, हे लक्षात घेत गोविंदा पथकांनी यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याची भूमिका घेतलेली आहे. ठाणे, मुंबई, नवीमुंबई, पालघर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, मीराभार्इंदर अशा शहरात मिळून जवळपास ८००-९०० गोविंदा पथके आहेत. या सर्वच पथकांनी उत्सव न करण्याचे ठरवले असून तसे समन्वय समितीला कळवले आहे.यानुसार समितीनेही उत्सव रद्द करण्याचे ठरवले आहे. केवळ कृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी रात्री कृष्णजन्मसोहळा अगदी मोजक्या माणसांमध्ये आणि सोशल डिस्टन्स ठेवत करावा असे समितीने सर्व पथकांना कळवले आहे.>गर्दी आणि समूहाशिवाय दहीहंडी उत्सव साजरा होऊच शकत नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढत असताना हा उत्सव कोणीही साजरा करूच शकत नाही. आम्ही गोविंदा पथकांकडून याबाबत मत मागविले होते आणि जवळपास सर्व मंडळांनी यंदा उत्सव साजरा न करण्याची भूमिका मांडली आहे. त्यानुसार, केवळ कृष्णजन्मोत्सव सोशल डिस्टन्स ठेवत साजरा करण्याचे आम्ही त्यांना सुचविले आहे आणि दहीहंडी उत्सव रद्द करणार आहे. येत्या दोन दिवसांत तसे अधिकृतरीत्या जाहीर केले जाणार आहे.- समीर पेंढारे, उपाध्यक्ष,महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समिती