शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

CoronaVirus News: कारवाईच्या बडग्यानंतरही नागरिकांचा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:04 IST

मास्क न लावण्याकडे कल : १४ लाख ५२ हजारांचा दंड वसूल

कल्याण : सद्य:स्थितीला अनलॉकमध्ये सर्वच ठिकाणी बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाले असताना सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेहऱ्यावर मास्क, रूमाल, कापड परिधान करणे बंधनकारक केले आहे. पण, बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे केडीएमसीच्या दैनंदिन कारवाईवरून स्पष्ट होत आहे. १४ दिवसांत तब्बल दोन हजार ९०५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण १४ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शनिवारपर्यंत ही रुग्णसंख्या ४३ हजारांहून अधिक झाली आहे. ३८ हजार ८७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असले, तरी कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी आतापर्यंत ८४४ जणांचा मृत्यू ओढवला आहे. सध्याच्या अनलॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत असून त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. सोशल डिस्टन्सचेही तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या अनलॉकमध्ये जूनमध्ये आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी परिपत्रक काढून दुकानदार आणि नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना केल्या आहेत.तसेच मास्क वापरण्यासंदर्भातल्या राज्य सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी महापालिका क्षेत्रातील दहाही प्रभागांत प्रभागक्षेत्र अधिकारी यांचे पथक आणि पोलिसांच्या सहकार्याने कारवाई सुरू आहे. जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहºयावर मास्क, रूमाल, कापड परिधान करणार नाहीत, अशांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. एप्रिल ते ९ सप्टेंबरपर्यंत प्रशासनाने केलेल्या कारवाईत पाच लाखांचा दंड वसूल केला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या