शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४२२ नवे रुग्ण सापडले; ३८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 21:26 IST

ठाणे शहरात ३९८ रुग्ण आज आढळून आले आहेत. आता या शहरात ४० हजार ४९२ बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे: जिल्ह्यात शनिवारीही एक हजार ४२२ रुग्ण नव्याने सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ९० हजार ४८३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज ३८ मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ८१६ झाली आहे.  ठाणे शहरात ३९८ रुग्ण आज आढळून आले आहेत. आता या शहरात ४० हजार ४९२ बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत एक हजार ६१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात ३३४ रुग्णांची वाढ झाली असून सहा मृत्यू आज झाले आहेत. या शहरात आतापर्यंत ४५ हजार ८७६ बाधीत झाले. तर, आजपर्यंत ८९५ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

उल्हासनगर महापालिका परिसरात ३० बाधितांसह एकाच्या मृत्यू ची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधीत रुग्ण नऊ हजार ५९९ झाले आहे. तरी, आजपर्यंत ३१५ मृत्यू झाले आहेत. भिवंडीला आज ३३ बधीत आढळून आले असून  एकाचा ही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ३९३ असून मृतांची संख्या ३२२ आहे. मीरा भाईंदरमध्ये १३९ रुग्णांची तर, सहा मृत्यूची नोंद केली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या २० हजार २७६ झाली असून मृतांची संख्या ६२९ वर गेली आहे. 

अंबरनाथमध्ये ३६ रुग्णांची नव्याने वाढ. तर, आज एकाचा मृत्यू झाला आहे. आत बाधितांची संख्या सहा हजार ७२७ झाली आहे. तर, मृतांची संख्या २४१ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत सहा हजार ६६६ झाली आहे. या शहरात आजही मृत्यू नाही. आतापर्यंत ७७ ही मृत्यूची संख्या कायम आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात ११६ रुग्णांची वाढ झाली आणि दहा मृत्यू झाले आहेत. आता बाधीत १५ हजार ३३८ आणि मृत्यू ४६५ झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे