शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

Coronavirus: परराज्यांतून परतणाऱ्यांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष; मराठी एकीकरण समितीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 02:10 IST

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने शहरातील कामगार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आपल्या मूळ गावी परतले.

मीरा रोड : कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्यावर गावाला गेलेले कामगार पुन्हा परतू लागले आहेत. परंतु परराज्यातून परतलेल्यांची नोंदणी केली जात नसून कोरोनाच्या अनुषंगानेही त्यांची नोंद होत नसल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने शहरातील कामगार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आपल्या मूळ गावी परतले. सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये परतणाऱ्यांची होती. परंतु परराज्यातील मूळगावी महाराष्ट्राच्या तुलनेत हाताला काम व उत्पन्न नसल्याने कामगार व कुटुंब पुन्हा परतू लागले आहेत. मीरा- भार्इंदरमधील लहान- मोठे उद्योग पुन्हा सुरू होऊ लागले असून अन्य लहान व्यवसाय सुरु होत आहेत. मूळ गावी परत जाण्यासाठी राज्य सरकारने कामगारांची रेल्वे व बसने मोफत प्रवासाची सोय केली होती. शिवाय असंख्य जण पायी वा टेम्पोमधून जात होते. पण आता अनेकजण पुन्हा मिळेल त्या मार्गाने रोजगारासाठी शहरात येत असताना त्यांची कोणतीच नोंदणी केली जात नाही. अशा लोकांना अलगीकरणात ठेवले जात नाही. कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेतली जात नाही असे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले. परराज्यातून पोटापाण्यासाठी येणाºया लोकांची नोंदणी करणे कायद्याने आवश्यक आहे. गृहमंत्र्यांनीही बाहेरून येणाºया कामगारांची नोंदणी केली जाईल म्हटले होते. परंतु पोलीस व पालिका नोंदणी करत नसल्याने पुन्हा बजबजपुरी माजेल. स्थानिकांना रोजगार मिळणार नाही अशी भीतीही व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरण