शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांमध्ये घट, सर्वच शहरांत सकारात्मक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:41 IST

कोरोनाच्या वाढत्या संख्येला प्रतिबंध यावा, यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा-भार्इंदर या प्रमुख महापालिका क्षेत्रांसह ग्रामीण भागांतदेखील १० दिवसांची टाळेबंदी घेण्यात आली.

ठाणे  - ठाणे जिल्ह्यात जुलै महिना उजाडताच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले. या वाढत्या संख्येला प्रतिबंध यावा, यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा-भार्इंदर या प्रमुख महापालिका क्षेत्रांसह ग्रामीण भागांतदेखील १० दिवसांची टाळेबंदी घेण्यात आली. तिचा सकारात्मक परिणाम म्हणून जुलै महिन्यात दोन हजारांच्या घरात पोहोचलेली बाधितांची संख्या पुन्हा एक हजाराच्या आसपास येऊन पोहोचली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर, दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर जून महिन्यात तीमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली. त्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. त्यावेळी ४०० ते एक हजारांच्या आत रुग्णसंख्या होती. मात्र, जुलै महिन्यात टाळेबंदी आणखी शिथिल केल्याने रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून आले.२ जुलै रोजी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होऊन एक हजाराच्या आसपास असलेली बाधितांची संख्या थेट एक हजार ९२१ वर पोहोचली. तर, ३ जुलै रोजी तीत वाढ होऊन तिने दोन हजार २७ चा उच्चांक गाठला. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावर व महापालिका प्रशासनांवर चिंतेचे सावट निर्माण झाले. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येबाबत जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांशी चर्चा करून अटकाव आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देतानाच त्यांची झाडाझडतीदेखील घेतली. यानंतर मात्र जिल्ह्यातील सहा महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रात काही ठिकाणी १ जुलैपासून, तर काही ठिकाणी २ जुलैपासून ते १२ जुलैपर्यंत टाळेबंदी लागू केली.या टाळेबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त अन्य एकही दुकान खुले ठेवण्यात येणार नसल्याचे फर्मान महापालिकांनी काढले आहे. त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम आता पाहायला मिळत आहे.कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांची संख्या आटोक्यातकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात जुलै महिना उजाडताच रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्य्याचे पाहायला मिळाले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या थेट ५०० ते ५६० पर्यंत गेली. मात्र, आता टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम होऊन आता ती २०० ते ३०० च्या आसपास येऊन पोहोचली आहे. इतर शहरांतही हा आलेख घटत आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे