शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

coronavirus: लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांमध्ये घट, सर्वच शहरांत सकारात्मक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:41 IST

कोरोनाच्या वाढत्या संख्येला प्रतिबंध यावा, यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा-भार्इंदर या प्रमुख महापालिका क्षेत्रांसह ग्रामीण भागांतदेखील १० दिवसांची टाळेबंदी घेण्यात आली.

ठाणे  - ठाणे जिल्ह्यात जुलै महिना उजाडताच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले. या वाढत्या संख्येला प्रतिबंध यावा, यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा-भार्इंदर या प्रमुख महापालिका क्षेत्रांसह ग्रामीण भागांतदेखील १० दिवसांची टाळेबंदी घेण्यात आली. तिचा सकारात्मक परिणाम म्हणून जुलै महिन्यात दोन हजारांच्या घरात पोहोचलेली बाधितांची संख्या पुन्हा एक हजाराच्या आसपास येऊन पोहोचली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर, दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर जून महिन्यात तीमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली. त्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. त्यावेळी ४०० ते एक हजारांच्या आत रुग्णसंख्या होती. मात्र, जुलै महिन्यात टाळेबंदी आणखी शिथिल केल्याने रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून आले.२ जुलै रोजी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होऊन एक हजाराच्या आसपास असलेली बाधितांची संख्या थेट एक हजार ९२१ वर पोहोचली. तर, ३ जुलै रोजी तीत वाढ होऊन तिने दोन हजार २७ चा उच्चांक गाठला. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावर व महापालिका प्रशासनांवर चिंतेचे सावट निर्माण झाले. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येबाबत जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांशी चर्चा करून अटकाव आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देतानाच त्यांची झाडाझडतीदेखील घेतली. यानंतर मात्र जिल्ह्यातील सहा महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रात काही ठिकाणी १ जुलैपासून, तर काही ठिकाणी २ जुलैपासून ते १२ जुलैपर्यंत टाळेबंदी लागू केली.या टाळेबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त अन्य एकही दुकान खुले ठेवण्यात येणार नसल्याचे फर्मान महापालिकांनी काढले आहे. त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम आता पाहायला मिळत आहे.कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांची संख्या आटोक्यातकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात जुलै महिना उजाडताच रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्य्याचे पाहायला मिळाले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या थेट ५०० ते ५६० पर्यंत गेली. मात्र, आता टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम होऊन आता ती २०० ते ३०० च्या आसपास येऊन पोहोचली आहे. इतर शहरांतही हा आलेख घटत आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे