शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

coronavirus: लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांमध्ये घट, सर्वच शहरांत सकारात्मक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:41 IST

कोरोनाच्या वाढत्या संख्येला प्रतिबंध यावा, यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा-भार्इंदर या प्रमुख महापालिका क्षेत्रांसह ग्रामीण भागांतदेखील १० दिवसांची टाळेबंदी घेण्यात आली.

ठाणे  - ठाणे जिल्ह्यात जुलै महिना उजाडताच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले. या वाढत्या संख्येला प्रतिबंध यावा, यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा-भार्इंदर या प्रमुख महापालिका क्षेत्रांसह ग्रामीण भागांतदेखील १० दिवसांची टाळेबंदी घेण्यात आली. तिचा सकारात्मक परिणाम म्हणून जुलै महिन्यात दोन हजारांच्या घरात पोहोचलेली बाधितांची संख्या पुन्हा एक हजाराच्या आसपास येऊन पोहोचली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर, दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर जून महिन्यात तीमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली. त्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. त्यावेळी ४०० ते एक हजारांच्या आत रुग्णसंख्या होती. मात्र, जुलै महिन्यात टाळेबंदी आणखी शिथिल केल्याने रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून आले.२ जुलै रोजी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होऊन एक हजाराच्या आसपास असलेली बाधितांची संख्या थेट एक हजार ९२१ वर पोहोचली. तर, ३ जुलै रोजी तीत वाढ होऊन तिने दोन हजार २७ चा उच्चांक गाठला. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावर व महापालिका प्रशासनांवर चिंतेचे सावट निर्माण झाले. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येबाबत जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांशी चर्चा करून अटकाव आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देतानाच त्यांची झाडाझडतीदेखील घेतली. यानंतर मात्र जिल्ह्यातील सहा महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रात काही ठिकाणी १ जुलैपासून, तर काही ठिकाणी २ जुलैपासून ते १२ जुलैपर्यंत टाळेबंदी लागू केली.या टाळेबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त अन्य एकही दुकान खुले ठेवण्यात येणार नसल्याचे फर्मान महापालिकांनी काढले आहे. त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम आता पाहायला मिळत आहे.कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांची संख्या आटोक्यातकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात जुलै महिना उजाडताच रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्य्याचे पाहायला मिळाले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या थेट ५०० ते ५६० पर्यंत गेली. मात्र, आता टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम होऊन आता ती २०० ते ३०० च्या आसपास येऊन पोहोचली आहे. इतर शहरांतही हा आलेख घटत आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे