शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे फुल उत्पादक पुन्हा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:12 IST

मार्केट बंदची शेतकऱ्यांना चिंता

- संजय नेवे/राहुल वाडेकरविक्रमगड : गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे रात्रीत होत्याचे नव्हते झाले. संचारबंदी लागू झाल्याने अनेकांचे हाल होऊन सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. त्यात फुलशेती पूर्णपणे संपुष्टात आली. विक्रमगड तालुक्यातील मोगरा उत्पादित करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले होते. या वर्षी जोमाने पुन्हा फुलशेतीतून उत्पादन काढण्याच्या तयारीत असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नसले तरी ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध आणले आहेत.तालुक्यातून मोगरा, सोनचाफा ८० टक्के दादर फुलमार्केट तर २० टक्के नाशिक फुल मार्केटला जात असतो. त्यात ऐन लग्नसराईच्या काळात दादर व नाशिक येथील व्यापाऱ्यांनी तीन दिवस  फुले आणू नये, अशा सूचना दिल्याने येथील फुल उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी, उपराले, देहर्जा अशा अनेक गावात मोगरा व सोनचाफा लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मोगऱ्याचे दररोज साधारण ५ ते १५ किलो उत्पन्न अनेकांना मिळते, ज्यात प्रतिकिलो २०० ते ४०० इतका दर मिळत असतो.  तालुक्यातून रोज अंदाजे दोन टन फुले दादर व नाशिक फुलमार्केटला जात असतात, तर सोनचाफा रोज २५ ते  ३५ हजार फुले रोज दादर व इतर फुल मार्केटला जात असतात. सोनचाफाचा बाजारभाव सध्या शेकडा ६५ रुपये असा आहे. दादर व नाशिक या ठिकाणी मोगऱ्याला मागणी असून मोगऱ्यामुळे आदिवासी लोकांच्या जीवनात सुगंध दरवळला होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोगरा दारात लावल्याने स्थलांतर थांबले. ज्यामुळे आदिवासी माणूस स्थिरावला होता. त्याचबरोबर या मोगऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाब आणि सोनचाफ्याची देखील लागवड करण्यात आली आहे. त्यापासून देखील चांगले उत्पन्न हे शेतकरी घेत होते. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या होणारी कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्थिरावली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने फुलशेतीवर गदा येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे व लॉकडाऊनमुळे फुलशेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले. तालुक्यातील विविध गावात मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडू, कागडा फुलाचे उत्पादन शेतकरी घेतात. विक्रमगड तालुक्यातून ही फुले दादर, कल्याण, सुरत, नासिक, पालघर बाजारपेठेत पाठवली जातात. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे तालुक्यातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वर्षी पुन्हा कडक निर्बंध लादल्याने दादर व नाशिक येथील व्यापाऱ्यांनी तीन दिवस फुले आणू नयेत असे सांगण्यात आल्याने उत्पादन झालेल्या फुलांचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे.     - शिवम मेहता, मोगरा व सोनचाफा उत्पादक शेतकरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या