शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

CoronaVirus: अवघ्या चार दिवसांत भाज्यांचे दर कडाडले; मार्केटमध्ये गर्दी, ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 13:34 IST

तर इतर भाज्यांचे भावही दुप्पट, तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे. असे असताना नागरिक मात्र पुढील 10 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करीत होते.

ठाणे  : अनलॉक दोन जाहीर झाल्यानंतर ठाणे महापालिकेने मात्र संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी भाजी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु यावेळी भाजीचे दर अचानक कडाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 20 रुपयांची कोथिंबिरीची जुडी 80 रुपये झाल्याचे दिसून आले. तर इतर भाज्यांचे भावही दुप्पट, तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे. असे असताना नागरिक मात्र पुढील 10 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करीत होते.तर ट्रान्सपोर्ट आणि हमालांचे दर वाढल्यानेच भाजीचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परंतु पुढील 10 दिवस लॉकडाऊन असल्याने विक्रेते हे ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. पुढील 10 दिवस संपूर्ण ठाणे  शहर लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकर नागरिकांनी पुन्हा एकदा जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. परंतु भाज्यांचे वाढलेले दर पाहून त्यांची आज झोपच उडाल्याचे दिसून आली. प्रत्येक भाजीचे दर हे दुप्पट, तिप्पट झाल्याने ग्राहक हवालदिल झाल्याचे दिसत होते. आधीच तीन महिन्यांनंतर कामाला कुठे सुरुवात झाली होती, पगार कमी झाले आहेत, काहींच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. अशातच आता विविध वस्तुंच्या वाढत्या दरांमुळे नागरीक हैराण झाले आहे. चार दिवसापूर्वी भाजी खरेदी करताना 20 रुपये असलेले दर 40 ते 80च्या घरात गेलेच कसे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आधीच खाण्याचे आबाळ सुरू असताना आता भाज्याही कडाडल्या तर खायचे काय, जगायचे कसे असा सवाल नागरिक करीत आहेत.भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत, सर्वच भाज्यांचे दर वाढलेले आहेत, व्यापाऱ्यांवर कोणाचे कंट्रोल नाही, शासनाकडे वाढणा:या दरांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे त्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.(प्रकाश ताम्हाणे  - ग्राहक, ठाणेकर)रोजपेक्षा जास्तीचे दर आकारले जात आहेत, गुरुवार पासून बंद ठेवण्यात येणार असल्यानेच विक्रेते लुट करीत आहेत. परंतु त्याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.(प्रतिभा माने - गृहिणी, ठाणेकर)पुढील 10 दिवस लॉकडाऊन होणार म्हणून आम्ही भाज्यांचे दर वाढवलेले नाहीत. उलट ट्रान्सपोर्ट आणि हमालांचे दर हे दुप्पट, तिप्पट झाल्यानेच आम्हाला नाईलाज आहे. त्यामुळेच भाज्यांचे दर वाढलेले आहेत.(भाजी विक्रेते - जांभळीनाका मार्केट)आजचे भाज्यांचे दरभाजी                           पूर्वी         आताकोबी                      30 रुपये   50 रुपयेशिमला मिर्ची            50          80टॉमेटो                    30          80भेंडी                      40          60गवार                     60          80कोथिंबीर                20          80शेपु                       30         40काकडी                 20         40मेथी                      20         40पालक                   10         20