शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

CoronaVirus: अवघ्या चार दिवसांत भाज्यांचे दर कडाडले; मार्केटमध्ये गर्दी, ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 13:34 IST

तर इतर भाज्यांचे भावही दुप्पट, तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे. असे असताना नागरिक मात्र पुढील 10 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करीत होते.

ठाणे  : अनलॉक दोन जाहीर झाल्यानंतर ठाणे महापालिकेने मात्र संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी भाजी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु यावेळी भाजीचे दर अचानक कडाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 20 रुपयांची कोथिंबिरीची जुडी 80 रुपये झाल्याचे दिसून आले. तर इतर भाज्यांचे भावही दुप्पट, तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे. असे असताना नागरिक मात्र पुढील 10 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करीत होते.तर ट्रान्सपोर्ट आणि हमालांचे दर वाढल्यानेच भाजीचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परंतु पुढील 10 दिवस लॉकडाऊन असल्याने विक्रेते हे ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. पुढील 10 दिवस संपूर्ण ठाणे  शहर लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकर नागरिकांनी पुन्हा एकदा जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. परंतु भाज्यांचे वाढलेले दर पाहून त्यांची आज झोपच उडाल्याचे दिसून आली. प्रत्येक भाजीचे दर हे दुप्पट, तिप्पट झाल्याने ग्राहक हवालदिल झाल्याचे दिसत होते. आधीच तीन महिन्यांनंतर कामाला कुठे सुरुवात झाली होती, पगार कमी झाले आहेत, काहींच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. अशातच आता विविध वस्तुंच्या वाढत्या दरांमुळे नागरीक हैराण झाले आहे. चार दिवसापूर्वी भाजी खरेदी करताना 20 रुपये असलेले दर 40 ते 80च्या घरात गेलेच कसे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आधीच खाण्याचे आबाळ सुरू असताना आता भाज्याही कडाडल्या तर खायचे काय, जगायचे कसे असा सवाल नागरिक करीत आहेत.भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत, सर्वच भाज्यांचे दर वाढलेले आहेत, व्यापाऱ्यांवर कोणाचे कंट्रोल नाही, शासनाकडे वाढणा:या दरांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे त्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.(प्रकाश ताम्हाणे  - ग्राहक, ठाणेकर)रोजपेक्षा जास्तीचे दर आकारले जात आहेत, गुरुवार पासून बंद ठेवण्यात येणार असल्यानेच विक्रेते लुट करीत आहेत. परंतु त्याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.(प्रतिभा माने - गृहिणी, ठाणेकर)पुढील 10 दिवस लॉकडाऊन होणार म्हणून आम्ही भाज्यांचे दर वाढवलेले नाहीत. उलट ट्रान्सपोर्ट आणि हमालांचे दर हे दुप्पट, तिप्पट झाल्यानेच आम्हाला नाईलाज आहे. त्यामुळेच भाज्यांचे दर वाढलेले आहेत.(भाजी विक्रेते - जांभळीनाका मार्केट)आजचे भाज्यांचे दरभाजी                           पूर्वी         आताकोबी                      30 रुपये   50 रुपयेशिमला मिर्ची            50          80टॉमेटो                    30          80भेंडी                      40          60गवार                     60          80कोथिंबीर                20          80शेपु                       30         40काकडी                 20         40मेथी                      20         40पालक                   10         20