शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Coronavirus: भिवंडीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, शहर व ग्रामीण भागातील एकूण संख्या पोहोचली १२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:03 IST

Coronavirus: शहरात 6 आणि ग्रामीण भागात 6 अशी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे.

भिवंडीराज्यासह भिवंडीतही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी शहरातील वेताळपाडा येथे दोन महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असतांनाच आता शहरातील मानसरोवर येथे औरंगाबाद कन्नड येथून उपचारासाठी येऊन भावाकडे राहिलेल्या 51 वर्षीय इसमाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता हा रुग्ण राहत असलेला परिसर देखील सील करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. तसेच,  हा रुग्ण ज्या दवाखान्यात डायलेसिससाठी गेला होता,  तो दवाखाना देखील सील करण्यात येण्याची शक्यता आहे. याचबरोबर रुग्णाच्या घरातील 4 चार जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती देखील डॉ. धुळे यांनी दिली आहे.

दरम्यान आज (बुधवारी) आढळलेल्या या रुग्णामुळे आता भिवंडी शहरातील एकूण रुग्णांची संख्या 6 झाली आहे. तर भिवंडीतील ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. कशेळी येथील ठाणे मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डावकर यांनी दिली आहे.

कशेळीत राहणारे ठाणे मनपाच्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले होते. या कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या पाच जणांपैकी 91 वर्षीय आईसह सून व मुलगी या तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर मोठा मुलगा आणि पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी या दोन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ. डावकर यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या देखील आता 6 वर पोहोचली आहे.  

शहरात 6 आणि ग्रामीण भागात 6 अशी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने भिवंडीकरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर लॉकडाऊनच्या काळात चोख बंदोबस्त असतांनाही शहरामध्ये बाहेर गावातून नागरिक शहरात येतातच कसे असा प्रश्न दक्ष नागरिक विचारात आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBhiwandiभिवंडी