शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भिवंडीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, शहर व ग्रामीण भागातील एकूण संख्या पोहोचली १२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:03 IST

Coronavirus: शहरात 6 आणि ग्रामीण भागात 6 अशी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे.

भिवंडीराज्यासह भिवंडीतही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी शहरातील वेताळपाडा येथे दोन महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असतांनाच आता शहरातील मानसरोवर येथे औरंगाबाद कन्नड येथून उपचारासाठी येऊन भावाकडे राहिलेल्या 51 वर्षीय इसमाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता हा रुग्ण राहत असलेला परिसर देखील सील करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. तसेच,  हा रुग्ण ज्या दवाखान्यात डायलेसिससाठी गेला होता,  तो दवाखाना देखील सील करण्यात येण्याची शक्यता आहे. याचबरोबर रुग्णाच्या घरातील 4 चार जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती देखील डॉ. धुळे यांनी दिली आहे.

दरम्यान आज (बुधवारी) आढळलेल्या या रुग्णामुळे आता भिवंडी शहरातील एकूण रुग्णांची संख्या 6 झाली आहे. तर भिवंडीतील ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. कशेळी येथील ठाणे मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डावकर यांनी दिली आहे.

कशेळीत राहणारे ठाणे मनपाच्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले होते. या कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या पाच जणांपैकी 91 वर्षीय आईसह सून व मुलगी या तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर मोठा मुलगा आणि पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी या दोन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ. डावकर यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या देखील आता 6 वर पोहोचली आहे.  

शहरात 6 आणि ग्रामीण भागात 6 अशी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने भिवंडीकरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर लॉकडाऊनच्या काळात चोख बंदोबस्त असतांनाही शहरामध्ये बाहेर गावातून नागरिक शहरात येतातच कसे असा प्रश्न दक्ष नागरिक विचारात आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBhiwandiभिवंडी