शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

CoronaVirus News: मुंबईजवळच्या 'या' शहरानं करून दाखवलं! कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी १३० दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:26 IST

परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश

भिवंडी : राज्यात कोरोना परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नसतानाही भिवंडीतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल १३० दिवसांवर पोहोचला आहे. शहरातील कोरोनाची परिस्थिती निवळण्यात प्रशासनासोबत नागरिक, पोलीस, सेवाभावी संस्था, खाजगी डॉक्टर संघटना या सर्वांचे प्रयत्न कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.कोरोनाची परिस्थिती बिकट झाल्याने सुरुवातीला रुग्णांसाठी रुग्णालय व रुग्णवाहिका मिळण्यासाठी पावले उचलली गेली. नंतर, आयजीएम या पालिकेच्या कोविड रुग्णालयात आॅक्सिजन टँकची उभारणी करून सर्व बेड आॅक्सिजनलाइनने जोडले गेले, तर शहरातील दोन सांस्कृतिक सभागृहांत पालिकेच्या वतीने तब्बल २६० आॅक्सिजन बेडची व्यवस्था केली. शहरात सुरू केलेल्या ३० मोहल्ला क्लिनिक, शिक्षक, पालिका कर्मचारी यांच्या ४७८ पथकांकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात अनेक संशयित रुग्ण आढळल्यानंतर त्यांची तपासणी केली. त्यांच्या निकटवर्तीयांना आरोग्य विभागाने अलगीकरण केल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनास यश आले. सध्या शहरात कोविड रुग्णालयातील ९० टक्के बेड रिकामे असून शहरात ९०० आॅक्सिजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे, असे डॉ. आशिया यांनी सांगितले.भिवंडीतील परिस्थिती आटोक्यात आणण्याबाबत मालेगाव पॅटर्न अथवा मालेगाव काढा यांचा सहभाग किती होता, असे विचारल्यावर आयुक्त म्हणाले की, कोरोनाला अटकाव केवळ प्रशासन करू शकत नाही. राज्य, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत असताना सर्वांचे सहकार्य मिळाले.महापालिका कर्मचारी यांनी घेतलेली दिवसरात्र मेहनत या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून कोरोना परिस्थिती आटोक्यात आणली, असे त्यांनी सांगितले. खाजगी रुग्णालये आर्थिक पिळवणूक करत असल्याची राज्यात ओरड होत आहे. मात्र, आयुक्तांनी शहरातील सहा खाजगी कोविड रुग्णालयांतील रुग्णांकडून वसूल केलेल्या बिलाची चौकशी टास्क फोर्सतर्फे केली. संबंधित रुग्णालयांकडून खुलासा मागविल्यानंतर अनावश्यक असलेल्या बिलांचा परतावा संबंधित रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना देण्याबाबत कारवाई केली, असे डॉ. आशिया यांनी सांगितले.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के; मृत्युदरही सव्वादोन टक्क्यांपेक्षा कमीशहरात कोरोना रुग्णांची संख्या सात हजार ११४ पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर, मृत्युुदर सव्वादोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र, चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असून लॉकडाऊन काळात वाढ झाली होती. त्याचा ताण आरोग्य सुविधेवर पडला होता. आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी उपाययोजना राबवत एक विशेष आराखडा तयार केला. त्यानुसार, काम केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले.शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या सात हजार ११४ पेक्षा जास्त असून त्यापैकी सहा हजार ३७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, १५४ जणांचा मृत्यू झाला. तसेच ५८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी फक्त ७० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना सौम्य व अतिसौम्य स्वरूपाची लक्षणेआहेत. तर, ८७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घटठाणे, कल्याण, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ आदी पालिकांपेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शहरात जास्त आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने आरोग्य विभागावरील ताण कमी झाला, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या