शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ, २०६४ नवे रुग्ण, मृतांची संख्या दीड हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 05:58 IST

ठाणे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५० हजार ९२०, तर मृतांची एक हजार ५०७ वर पोहोचली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ठाणे मीरा-भार्इंदरसह कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून टाळेबंदीत वाढ केली असताना, जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत २0६४ नवीन रु ग्णांची नोंद झाली तर ५३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५० हजार ९२०, तर मृतांची एक हजार ५०७ वर पोहोचली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात १० जुलै रोजी सर्वाधिक ६०६ रुग्ण नव्याने दाखल झाले, तर आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची ११ हजार ५३७ तर मृतांची संख्या १७२ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महापालिका परिसरात बाधितांची ४१६ तर १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या ठिकाणी बाधितांची १२ हजार ४६९ तर, मृतांची संख्या ४८२ इतकी झाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात नवे ३६१ रुग्ण दाखल झाले तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ८१९ तर, मृतांचा आकडा २८४ इतका झाला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये २३१ रुग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने या ठिकाणी बाधितांची पाच हजार २०६ तर मृतांची संख्या १७८ वर पोहोचली आहे. भिवंडी पालिका क्षेत्रात ५७ बाधित तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ६४० तर मृतांची संख्याही १४१ च्या घरात गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे