शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Coronavirus : कच्चा माल येणे बंद, अंबरनाथ एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 02:14 IST

अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो.

अंबरनाथ : अंबरनाथमधील औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने कच्च्या मालाअभावी बंद करण्याची वेळ आली आहे. तीन महिन्यांपासून कच्चा माल भारतात येत नसल्याने हे कारखाने बंद करावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा रासायनिक कारखान्यांना बसत आहे.अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो. मात्र, तीन महिन्यांपासून कच्चा माल भारतात येत नसल्याने या कंपन्यांना प्रक्रिया करण्यासाठी साधनसामग्री कमी पडत आहे. त्यातच कच्चा माल येत नसल्याने हे कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती इतर कारखान्यांच्या बाबतीतही घडत आहे. एमआयडीसी भागातील अनेक कारखाने हे परदेशातून येणाºया कच्च्या मालावर अवलंबून आहेत.मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे सर्व व्यापार ठप्प झाल्याने त्याचा फटका औद्योगिक वसाहतीला बसला आहे. कंपनीमध्ये काम करण्यासाठी साधन नसल्याने कामगारांवर बसून राहण्याची वेळ येत आहे. तसेच तयार झालेला मालही परदेशात जात नसल्याने मोठ्या प्रमाणात तयार माल पडून आहे. गेल्या महिनाभरापासून औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनही मंदावले आहे. आता अनेक कारखान्यांना आपल्या कामगारांना सक्तीची सुटी देण्याची वेळ आली आहे.अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनीही या परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. अंबरनाथमधील अनेक कारखानदारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम केवळ उत्पादनावरच नव्हे तर कामगारांच्या रोजगारावरही पडणार आहे.रिक्षा राहणार बंदअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने, रिक्षा उद्यापासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी पालिकेच्या सभागृहात बैठक झाली त्यात हा निर्णय झाला. रिक्षामधून संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत पूर्व भागात पाच आणि पश्चिम भागात पाच रिक्षा सुरु ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथMIDCएमआयडीसी