शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

Coronavirus : कच्चा माल येणे बंद, अंबरनाथ एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 02:14 IST

अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो.

अंबरनाथ : अंबरनाथमधील औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने कच्च्या मालाअभावी बंद करण्याची वेळ आली आहे. तीन महिन्यांपासून कच्चा माल भारतात येत नसल्याने हे कारखाने बंद करावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा रासायनिक कारखान्यांना बसत आहे.अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो. मात्र, तीन महिन्यांपासून कच्चा माल भारतात येत नसल्याने या कंपन्यांना प्रक्रिया करण्यासाठी साधनसामग्री कमी पडत आहे. त्यातच कच्चा माल येत नसल्याने हे कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती इतर कारखान्यांच्या बाबतीतही घडत आहे. एमआयडीसी भागातील अनेक कारखाने हे परदेशातून येणाºया कच्च्या मालावर अवलंबून आहेत.मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे सर्व व्यापार ठप्प झाल्याने त्याचा फटका औद्योगिक वसाहतीला बसला आहे. कंपनीमध्ये काम करण्यासाठी साधन नसल्याने कामगारांवर बसून राहण्याची वेळ येत आहे. तसेच तयार झालेला मालही परदेशात जात नसल्याने मोठ्या प्रमाणात तयार माल पडून आहे. गेल्या महिनाभरापासून औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनही मंदावले आहे. आता अनेक कारखान्यांना आपल्या कामगारांना सक्तीची सुटी देण्याची वेळ आली आहे.अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनीही या परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. अंबरनाथमधील अनेक कारखानदारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम केवळ उत्पादनावरच नव्हे तर कामगारांच्या रोजगारावरही पडणार आहे.रिक्षा राहणार बंदअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने, रिक्षा उद्यापासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी पालिकेच्या सभागृहात बैठक झाली त्यात हा निर्णय झाला. रिक्षामधून संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत पूर्व भागात पाच आणि पश्चिम भागात पाच रिक्षा सुरु ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथMIDCएमआयडीसी