शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Coronavirus: उपचाराविना दोघांनी गमावले प्राण; अंबरनाथमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 02:00 IST

उपचाराविना मृत्यू पावणाºया रुग्णांची संख्या अंबरनाथ पालिका क्षेत्रात वाढत असताना आता पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांचाही मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली आहे.

अंबरनाथ : नगरपालिकेने उभारलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दोन कोरोना संशयित रुग्णांचा उपचाराविना मृत्यू झाला आहे. या रुग्णांची कोरोना चाचणी केल्यावर त्यांना महात्मा गांधी विद्यालयात ठेवले होते. त्यातील एकाची प्रकृती शुक्रवारी रात्री बिघडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर झाल्याने शनिवारी त्याला छाया रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

उपचाराविना मृत्यू पावणाºया रुग्णांची संख्या अंबरनाथ पालिका क्षेत्रात वाढत असताना आता पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांचाही मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली आहे. शुक्रवारी रात्री महात्मा गांधी विद्यालयातील सेंटरमध्ये डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. त्यात दोन संशयित गंभीर असल्याने त्यांना छाया रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर रात्री ११ वाजता याच सेंटरमध्ये एका रुग्णाला त्रास जाणवू लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी सेंटरमध्ये गोंधळ घातला. या मृत्यूला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकाराला १२ तास उलटत नाही, तोच दुसºया एका रुग्णाला शनिवारी सकाळी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्याला छाया रूग्णालयात नेल्यानंतर त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या १२ तासांत क्वारंटाइन सेंटरमधील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने छाया रुग्णालय व पालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.तपासले तेव्हा ‘त्या’ रुग्णाला त्रास नव्हताशुक्रवारी मृत पावलेल्या व्यक्तीची डॉक्टरांनी तपासणी केली होती. मात्र, त्याला त्या क्षणाला कोणताही त्रास जाणवला नव्हता. अवघ्या दोन तासांत त्याची प्रकृती बिघडली. उपचारासाठी दाखल करण्याआधी त्यांचा मृत्यू ओढवला, तर शनिवारी ज्या रुग्णाची प्रकृती बिघडली, त्याला उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, उपचार सुरू असताना मृत्यू झाला, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस