शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: उपचाराविना दोघांनी गमावले प्राण; अंबरनाथमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 02:00 IST

उपचाराविना मृत्यू पावणाºया रुग्णांची संख्या अंबरनाथ पालिका क्षेत्रात वाढत असताना आता पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांचाही मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली आहे.

अंबरनाथ : नगरपालिकेने उभारलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दोन कोरोना संशयित रुग्णांचा उपचाराविना मृत्यू झाला आहे. या रुग्णांची कोरोना चाचणी केल्यावर त्यांना महात्मा गांधी विद्यालयात ठेवले होते. त्यातील एकाची प्रकृती शुक्रवारी रात्री बिघडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर झाल्याने शनिवारी त्याला छाया रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

उपचाराविना मृत्यू पावणाºया रुग्णांची संख्या अंबरनाथ पालिका क्षेत्रात वाढत असताना आता पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांचाही मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली आहे. शुक्रवारी रात्री महात्मा गांधी विद्यालयातील सेंटरमध्ये डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. त्यात दोन संशयित गंभीर असल्याने त्यांना छाया रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर रात्री ११ वाजता याच सेंटरमध्ये एका रुग्णाला त्रास जाणवू लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी सेंटरमध्ये गोंधळ घातला. या मृत्यूला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकाराला १२ तास उलटत नाही, तोच दुसºया एका रुग्णाला शनिवारी सकाळी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्याला छाया रूग्णालयात नेल्यानंतर त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या १२ तासांत क्वारंटाइन सेंटरमधील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने छाया रुग्णालय व पालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.तपासले तेव्हा ‘त्या’ रुग्णाला त्रास नव्हताशुक्रवारी मृत पावलेल्या व्यक्तीची डॉक्टरांनी तपासणी केली होती. मात्र, त्याला त्या क्षणाला कोणताही त्रास जाणवला नव्हता. अवघ्या दोन तासांत त्याची प्रकृती बिघडली. उपचारासाठी दाखल करण्याआधी त्यांचा मृत्यू ओढवला, तर शनिवारी ज्या रुग्णाची प्रकृती बिघडली, त्याला उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, उपचार सुरू असताना मृत्यू झाला, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस