शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

CoronaVirus : कोरोनामुळे दहशत आम्ही माणसे नाहीत का? बँक कर्मचाऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 01:15 IST

Coronavirus: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. बँका मात्र सुरूच आहेत. आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बँका सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे.

ठाणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. आता सर्वच व्यवहार आॅनलाइन झालेले आहेत. अत्यावश्यक सेवेत कुठेही बँक कर्मचाºयांचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय संचारबंदीमुळे बँकांकडे ग्राहक फिरकतही नाहीत. त्यामुळे बँकाच्या मुख्य शाखावगळता इतर शाखा बंद करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक बँकांकडून करण्यात आली आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. बँका मात्र सुरूच आहेत. आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बँका सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे. मात्र २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउन झाल्यानंतर आता बँका तरी का सुरूठेवायच्या, असा सवाल बँक कर्मचाºयांमधून उपस्थित होत आहे. अत्यावश्यक सेवा देणाºया सर्वांचेच कौतुक झाले. मात्र बँक कर्मचाºयांचा साधा उल्लेख कोणत्याही नेत्याने अथवा मंत्र्यांने केलेला नाही. असे असले तरी आजही बँका सुरूआहेत. परंतु संचारबंदी लागू झाल्याने बँकेत ग्राहक येताना दिसत नाही. ग्राहकांची संख्या पूर्णत: रोडावली आहे. बँकेत काम करणारे अनेक कर्मचारी लांबून येतात. मात्र रेल्वे सेवा बंद असल्याने अनेक कर्मचाºयांना कामावर येणे शक्य होत नाही. परंतु आता कामावर न गेल्यामुळे आमचा पगार तर कापला जाणार नाही ना, अशी शंकाही अनेक कर्मचाºयांच्या मनात येत आहे. आम्ही पण माणसे आहोत, आमचाही कुठेतरी विचार व्हावा, अशी मागणी कर्मचाºयांकडून केली जात आहे. त्यातही आता अर्थमंत्र्यांनी पुढील तीन महिने बँकेचे हप्तेदेखील घेऊ नका, असे सांगितले आहे. त्यामुळे बँकेत ग्राहक येतील असे कुठेही दिसत नाही. दुसरीकडे संचारबंदी असल्याने पोलीस रस्त्यावर येणाºया प्रत्येकाला मार देत आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये एका बँकेत परदेशातून आलेली एक व्यक्ती पासबुकची एन्ट्री करायला गेली होती. ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यामुळे बँकेतील इतर कर्मचाºयांचीदेखील तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही बँक १० दिवस बंद ठेवण्यात आली होती.आधुनिक युगात बहुतांश व्यवहार हे आॅनलाइन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे अशा भीषण परिस्थितीत बँक सुरू असणे अपेक्षित नाही. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर आमच्या मागणीचा विचार व्हावा, अशी मागणी बँक कर्मचाºयांनी केली आहे. बँक बंद ठेवण्याची मागणी जरी आमची असली तरी एटीएममध्ये पैसे पुरविण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत. आठवड्यातील दोन दिवस त्या पद्धतीचे नियोजन करण्याची तयारीदेखील अनेक कर्मचाºयांनी दाखविली आहे. आपल्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.यासंदर्भात मी अर्थमंत्र्यांशी मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्यापही त्यावर योग्य ती कार्यवाही झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँक कर्मचाºयांनाही या आजाराचा धोका आहे. त्यामुळे आमच्या मागणीचग विचार व्हावा, हीच इच्छा आहे.- राजेश मतकरी,युनियन बँकेचे पदाधिकारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbankबँक