शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील ३१५ कोटींच्या विकासकामांना लागणार कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 01:52 IST

कोरोनाशी दोन हात करताना विकासकामे विसरा । जेमतेम १५५ कोटी रुपये मिळणार

सुरेश लोखंडे  

ठाणे : कोरोनामुळे जिल्ह्याच्या ४७० कोटींच्या विकास आराखड्यापैकी ३१५ कोटी विकास निधीत कपात करण्यात आली आहे. ही कपात ६७ टक्के इतकी असून एकूण मंजूर निधीपैकी केवळ ३३ टक्के म्हणजे १५५ कोटी रुपयेच यंदा विकासकामांवर खर्च होणार आहेत.उपलब्ध निधीपैकी १५ कोटी ४७ लाख रुपये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अलीकडेच प्राप्त झाले आहेत. उर्वरित अवघे १४० कोटी रुपये ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यातील विकासकामांवर खर्च करण्यास उपलब्ध होणार आहेत.

यंदा जिल्ह्याचा विकास आराखडा ४७० कोटी रुपयांचा होता. पण, कोरोनाच्या महामारीने तो पुरता कोलमडला आहे.राज्य शासनाने विकास आराखड्यातील मंजूर रकमेत ६७ टक्के कपात जाहीर केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासह विकासकामांची जुनी रखडलेली देणी देण्यात उपलब्ध रक्कम खर्च होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात कपातीनंतर उपलब्ध होणाऱ्या १५५ कोटी रुपयांतून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तब्बल ९८ कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. यंदा जिल्ह्यातील सर्वसाधारण विभागाच्या विकासकामांसाठी ३९५ कोटी तर आदिवासी उपयोजनांसाठी ७५ कोटी खर्च करण्याचे नियोजित करण्यात आले होते. पण, आता कपातीमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, ग्रामपंचायतींच्या जनसुविधांची कामे, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा, विशेष अनुदान, ऊर्जाविकास, जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण आणि साकवांची बांधकामे आदी कामे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचे बांधकाम, आरोग्य विभागाचे बांधकाम, औषध सामग्री खरेदी अशा विविध कामांवर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे विकासाला खीळ बसणार आहे.भिवंडी, उल्हासनगर महापालिकांना दिला निधीजिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १० टक्के निधीतून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्राधान्य दिले आहे. त्यातून भिवंडी-निजामपूर महापालिकेस एक कोटी २५ लाख तर, उल्हासनगर महापालिकेस एक कोटी ३० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयास १३ कोटी देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या