ठाणे : ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीच्या निजामउद्दीन येथील मरकज कार्यक्र मास हजेरी लावलेल्या २१ परदेशी व ४ स्थानिक अशा २५ जणांचा १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर गुरुवारी गुन्हे दाखल करून अटक केली. त्यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात वेगळे दोन गुन्हे दाखल असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. मात्र, त्यांना भारत सोडून जाण्यास मनाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात १३ बांग्लादेशी आणि आठ मलेशियन नागरिकांचा समावेश आहे. १ एप्रिल रोजी मुंब्य्रातील तन्वीर उलूम मदरसा ट्रस्ट व सिमला पार्क, अलनदीउल फलाद येथून २१ परदेशी व ४ भारतीय नागरिक सापडले होते.
CoronaVirus: ठाण्यात २१ परदेशी नागरिकांसह ४ तबलिगींना मुंब्य्रातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 02:34 IST