शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १८०० पार; शहरात आढळले सर्वाधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 04:01 IST

कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत २७ नवे रुग्ण सापडले असून त्यामधील २० रुग्ण हे मुंबई, ठाणे आणि वाशी येथे कामाला जाणारे आहेत.

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल १५४ रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्याही एक हजार ८०९ इतकी झाली आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाला आहे. यात ठाणे महापालिकेने ६०० तर नवी मुंबईने ५०० च्या आकड्याची सीमारेषा पार केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५१ रुग्ण हे ठामपा कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे नवीन रुग्ण आढळला नाही.

ठाणे महापालिका हद्दीत सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी सापडलेल्या ५१ पैकी १५ रुग्ण हे लोकमान्यनगर -सावरकरनगर प्रभाग समितीमधील आहेत. त्या पाठोपाठ वागळे इस्टेट -१४ आणि दिवा येथील १२ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे ठामपामधील एकूण रुग्ण संख्या ६११ इतकी झाली आहे. तर कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत २७ नवे रुग्ण सापडले असून त्यामधील २० रुग्ण हे मुंबई, ठाणे आणि वाशी येथे कामाला जाणारे आहेत.

यामध्ये १७ पुरुष व १० महिला रुग्णांचा समावेश आहे. तसेच नवी मुंबईत रुग्ण संख्याही आता ५२७ वर पोहोचली आहे. भिवंडीत एक नवा रुग्ण सापडल्याने येथील संख्या ही २१ झाली आहे. बदलापुरात ४ रुग्ण मिळाल्याने येथील एकूण रुग्ण संख्या ४६ झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये २१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या २२३ झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ही ७ नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या ७२ वर पोहोचली आहे. तसेच अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे एकही नवा रुग्ण न मिळाल्याने रूग्णसंख्या अनुक्रमे १२ आणि १७ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस