शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

CoronaVirus News: कोरोनाला १0५ गावांनी वेशीवरच रोखले!; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८0 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:13 IST

२0९ ग्रामपंचायती एक महिन्यापासून कोरोनामुक्त, घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यावर भर

- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्हा परिषदेच्या निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गुरवली प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, त्याच दिवशी मुरबाड आणि त्यानंतर भिवंडी तालुक्यांतील बोरिवली येथे रुग्ण आढळला. मात्र, जिल्ह्यातील १0५ ग्रामपंचायती व त्यातील गावपाड्यांनी आतापर्यंत कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही. एवढेच नव्हे, तर ४३0 ग्रामपंचायतींपैकी २0९ ग्रामपंचायती एक महिन्यापासून कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८0 टक्क्यांवर पोहोचले आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत सात हजार ६८२ रुग्ण आढळून आले. त्यापैकी आतापर्यंत सहा हजार १७९ रुग्ण बरे (८0 टक्के) झाले. जिल्हा परिषदेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात २२७ जणांचा मृत्यू (२.९५ टक्के) झाला आहे. जिल्ह्यात एक हजार १२७ प्रतिबंधात्मक क्षेत्र असून, सध्या केवळ ३४५ प्रतिबंधात्मक क्षेत्र सुरू आहेत. जिल्ह्यातील ७८२ प्रतिबंधात्मक क्षेत्रातील कुटुंबांना गृहभेटी देऊन त्यांचे ६९ टक्के आरोग्य सर्वेक्षण केले आहे. आजपर्यंत तीन लाख ७0 हजार ७७३ जणांचे आरोग्य सर्वेक्षण करून त्यांना कोरोना नसल्याची खात्री केली आहे. सर्दी, खोकला, ताप, डोके दुखणे आदी आजार आहे की कसे, आदींची या सर्वेक्षणात पाहणी केल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.वासिंद, अघई, शेंद्रूण, टेंभा या शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायती हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या आहेत. याप्रमाणेच मुरबाडच्या म्हसा, सरळगावचाही समावेश आहे. कल्याणमधील निळजे, दहागाव या ग्रामपंचायतीही हॉटस्पॉट आहेत. भिवंडी तालुक्यातील खारबाव, कोन, दिवा-अंजूर, अनगाव आणि अंबरनाथच्या बदलापूर आणि वांगणी आदी ठिकाणांना हॉटस्पॉट घोषित केले आहेत. या कालावधीत ग्रामीण हायरिक्स म्हणजे अतिजोखमीचे २१ हजार ४२0 रुग्ण, तर कमी जोखमीचे ११ हजार १00 अशा ३२ हजार ५२0 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासाठी १५ हजार ७१४ जणांना विलगीकरण कक्षात ठेवावे लागले. यामधील पाच हजार ९४७ जणांचे संस्थात्मक कक्षात विलगीकरण केले होते. यासाठी भिवंडीला टाटा आमंत्रात १७२ बेड, सोनवळीला ३0 आणि अंबरनाथला ३0 बेड राखीव आहेत. मुरबाडला कुडवली येथे १० बेड, शहापूरला जोंधळे कॉलेजला १00 बेड राखीव आहेत.कोरोनामुक्त गावेकानविंदे, कळमगाव, कुकाबे, साजिवली, सापगाव या शहापूर तालुक्यातील आदिवासी गावांसह कल्याण तालुक्यातील उशीद गावात एकही रु ग्ण नाही. मुरबाड तालुक्यातील म्हसा, तुळई, धसई, शिवळे, देवपे या गावांसह भिवंडीतील ब्राह्मणगाव आणि दुधणी ही गावे कोरोनामुक्त आहेत.आरोग्य केंद्र-उपकेंद्रांकडून शुश्रूषाजिल्ह्यात ३३ आरोग्य केंद्रे आहेत. आतापर्यंत नऊ हजार ५६७ जणांना घरी, तर पाच हजार ९४७ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले होते. या १५ हजार ७१४ जणांवर आरोग्य यंत्रणेने अतिशय जोखमीच्या काळातही बारकाईने लक्ष ठेवून त्यांची काळजी घेतली आहे.घरोघरी भेट देऊन आॅक्सिजनतपासणीजिल्ह्यातील ८0९ गावे, पाडे आणि दुर्गम भागांत अंगणवाडीसेविका, मदतनीस आणि आशावर्कर घरोघरी जाऊन प्रत्येक सदस्याची स्क्र ीन टेस्टिंग आणि आॅक्सिजनतपासणी करत आहेत. गृहभेटीद्वारे तीन लाख ७0 हजार ७७३ जणांचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले आहे.नेमकेकाय केले?सुरुवातीच्या काळातच गावकऱ्यांनी बाहेरील भाजीपाल्यासह इतर वस्तूही घेण्यास प्रतिबंध केला.बाहेरगावचे नातेवाईक व इतर पाहुण्यांनादेखील कोणत्याही कामासाठी गावात न येण्याची विनंती केली.गावातून बाहेर गेलेली व्यक्ती घरी आल्यावर घराबाहेरच अंघोळ करते. तिचे कपडेही बाहेरच ठेवले जातात.बाहेर जाताना तोंडाला मास्क किंवा रु माल बांधण्याचा नियम गावकरी कटाक्षाने पाळतात.बियाणे, खतखरेदीसाठी प्रत्येकाने बाहेर पडण्याऐवजी चारपाच शेतकरी मिळून ही खरेदी करण्यात आली.बियाणे, खते अथवा बाहेरून आणलेली कोणतीही वस्तू दोन दिवस घराबाहेरच एकीकडे ठेवली जाते.बाहेरची व्यक्ती घरी आलीच, तर तिने वापरलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले जाते.अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय गावकरी गावाबाहेर पडलेच नाही.गावातील लहान मुले आणि वृद्ध नागरिकांची विशेषकरून काळजी घेण्यात आली.शहरांशी कमी संपर्क आणि वैयक्तिक काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न.२0९ ग्रा.पं. निर्धोकग्रामीण, दुर्गम भागात उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८0 टक्के आहे. मृत्युदर २.९५ टक्के आहे. १,१२७ प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ३,७0,७७३ जणांचे सर्वेक्षण केले आहे. ४३0 ग्रामपंचायतीपैकी २0९ ग्रामपंचायती व पाडे कोरोनामुक्त झाले आहेत. या गावपाड्यांमध्ये २८ दिवसांत एकही रु ग्ण आढळला नाही.- हिरालाल सोनवणे,सीईओ, जिल्हा परिषदनियमित धूरफवारणीदेवपे येथे क्वारंटाइन सेंटर आहे. मात्र, गावात नियमित स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा आणि वेळोवेळी धूरफवारणी केल्याने गावात एकही रुग्ण नाही. प्रत्येक ग्रामस्थाला मास्क वापरण्याची सक्ती आहे.- संगीता वडवले, सरपंच, देवपेकडक गावबंदीलॉकडाऊनदरम्यान कडक गावबंदी लागू केली. याशिवाय सामाजिक अंतर, मास्क वापरण्याचीही सक्ती केली. सतत हात धुणे तसेच गावातील स्वच्छता, औषधफवारणी या उपाययोजनांकडे लक्ष केंद्रित केले.- प्रवीण भोईर, सरपंच, उशीदअनोळखींना प्रवेशबंदीगाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रथम गावबंदी मोहीम राबवली. कुणाला बाहेर जावे लागलेच, तर त्याच्या प्रवासाची नोंद घेतली जात असे. गावात अनोळखी व्यक्तीला प्रवेश नाकारला.- प्रमोद शिंगोळे, सरपंच, दहीगावफेरीवाल्यांना मनाईबिरवाडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत साजिवली, कुकांबे व बारा पाडे आहेत. येथे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे. बाहेरील फेरीवाल्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.- बाळू वेहळे, सरपंच, बिरवाडीमोफत मास्कवाटपकोरोनाचे संक्र मण होऊ नये म्हणून रस्ते प्रथम बंद केले. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी व्यापारीवर्गाला विश्वासात घेतले. वेळोवेळी धूरफवारणीकरून घरोघरी सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप केले.- ताराबाई कथोरे, सरपंच, म्हसा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या