शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कल्याण-डोंबिवलीत दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:10 IST

हंड्यांना मागणीच नाही; कुंभारांमध्ये चिंतेचे वातावरण

कल्याण : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दहीहंडीच्या उत्सवाला सरकारी यंत्रणांकडून परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे दहीहंडीसाठी लागणारी हंडी तयार करणारे शहरातील कुंभारवाड्यातील कुंभार यंदा चिंतातुर आहेत. यंदा हंडीची विक्री होईल का, असा प्रश्न त्यांना पडला आहे.कोरोना रोखण्यात अद्याप सरकारी व आरोग्य यंत्रणेला यश आलेले नाही. सध्या लॉकडाऊन शिथिल केले असले, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. श्रावणात विविध सणांची रेलचेल असते. त्याचबरोबर गणेशोत्सवाचीही चर्चा सुरू झाली आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी गाड्या सोडा, दुकानदारांसाठी असलेला सम-विषम तारखेचा नियम रद्द करा, अशा विविध मागण्या विविध स्तरांतून केल्या जात आहेत. मात्र, कुंभारांसाठी कोणी काही बोलण्यास तयार नाही.गणेशमूर्ती तसेच दहीहंडीसाठी हंड्या, नवरात्रासाठी गरबा, पणत्या तयार करण्यात कल्याणमधील कुंभारवाड्याचे नाव प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीला काही अंशी मागणी असली, तरी मोठ्या मूर्ती तयार करण्यात आलेल्या नाहीत. गणेशोत्सवापूर्वी १२ आॅगस्टला दहीहंडी आहे. मात्र, हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यास सरकारी यंत्रणांकडून परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे यंदा तयार केलेल्या हंड्या पडून राहणार आहेत. हंडीला मागणीच नसल्याचे कुंभारवाड्यातील कारागीर धनाजी कुंभार यांनी सांगितले.दरवर्षी मोठ्या स्वरूपात सार्वजनिक ठिकाणी व गल्लीबोळांतील बालगोपाळ मित्र मंडळांकडून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी लहान, मोठी हंडी बांधली जाते. गेल्या वर्षी ५०० हंड्या विकल्या गेल्या होत्या. यंदा हंडीची एकही आॅर्डर नाही. त्यामुळे तयार केलेल्या हंडीचे करायचे काय, असा प्रश्न कुंभारवाड्यातील कारागिरांना सतावत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या