शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

कोरोनाने हिरावले अडीच हजार महिलांच्या कपाळावरील कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कोणाच्या घरातील कर्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कोणाच्या घरातील कर्ता पुरुष यात गेला तर कोणाच्या घरातील महिला, कोणाच्या घरातील ज्येष्ठ नागरिक हिरावले गेले; परंतु यामध्ये जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ७०० महिलांच्या कपाळावरील कुंकूही या कोरोनाने हिरावून गेले आहे. त्यामुळे या महिला निराधार झाल्या आहेत. त्यांच्या घरातील कमावता माणूसच गेल्याने आता घराचा गाडा कसा हाकायचा, असा पेच त्यांच्यासमोर ठाकला आहे; परंतु दुसरीकडे अशा निराधार महिलांचा सर्व्हे सध्या जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून सुरू झाला आहे. त्यानुसार शासनाच्या चार योजनांचा फायदा अशा महिलांना मिळावा यासाठी जिल्हा यंत्रणादेखील कामाला लागली आहे.

दीड वर्षापासून ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत नऊ हजार ५८८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेकांचे संसार कोरोनाने हिरावून घेतले आहेत. तर अनेकांचे अख्खे कुटुंबच संपवून टाकले आहे. तर काही घरातील महिलांचे कुंकूच या कोरोनाने हिरावल्याने आता जगायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. जिल्हा महिला बाल विकास विभाग धान्यांचे किट सध्या अशा निराधार महिलांना पुरवीत आहे; परंतु केवळ त्याच्यावर घरच्या सर्वच गरजा कशा भासणार, मुलांचे शिक्षण, घरभाडे, घरातील इतर खर्च कसे भागवायचे, अशा अनेक प्रश्नांनी या महिला भांबावून गेल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत, याची माहितीदेखील घेतली जात आहे; परंतु अद्यापही त्याची माहिती या महिलांपर्यंत पोहोचू शकलेली नाही.

जिल्ह्याच्या महिला बाल विकास विभागाने आता अशा महिलांचा सर्व्हे सुरू केला आहे. येत्या काही दिवसांत तो पूर्ण होणार आहे; परंतु अशा २ हजार ७०० च्या आसपास महिला असतील, असा अंदाज या विभागाने वर्तविला आहे. हा सर्व्हे करताना या महिला कोणत्या गटात मोडतात, त्यांची घरची परिस्थिती कशी आहे, सदरची महिला कामाला जाते का? आदींसह इतर माहिती या माध्यमातून घेतली जात असून त्यानंतर त्यांना चारपैकी कोणत्या योजनेचा फायदा देता येऊ शकणार आहे, हे निश्चित करून त्यानुसार गट तयार केले जाणार आहेत.

कोरोनाने २७०० महिलांना केले निराधार

जिल्ह्यात कोरोनाने अनेकांचे बळी आतापर्यंत गेले आहेत; परंतु यात दोन ७०० महिलांना कोरोनाने निराधार केले असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांचा सर्व्हे आता सुरू झाला आहे. तो येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तूर्तास या महिलांना धान्याचे किट दिले गेले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण

५,२१,२७५

बरे झालेले रुग्ण

५,०५,७५६

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण

५९३१

असा करा अर्ज

सध्या अशा निराधार महिलांचा सर्व्हे सुरू आहे. तो करताना त्या कोणत्या आर्थिक गटात मोडत आहे, याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार त्यांनी कोणत्या योजनेसाठी अर्ज करावा याची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, केंद्र शासनाची निराधार योजना आहे, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि आणखी एक योजना आहे, ज्यामध्ये साडेचार लाखांची मदत दिली जाऊ शकणार आहे. तसेच या योजनांचे निकष वेगवेगळे आहेत. त्या आधारावर अर्ज करून अशा महिलांना मदत दिली जाणार आहे.

सध्या अशा प्रकारच्या निराधार महिलांचा सर्व्हे सुरू आहे. येत्या काही दिवसांत तो पूर्ण होणार आहे. त्यानुसार महिलांचा आर्थिक निकषानुसार सर्व्हे करून कोणत्या योजनांचा लाभ कोणाला कसा देता येऊ शकतो, त्यानुसार या महिलांना मदत दिली जाणार आहे.

(महेंद्र गायकवाड - महिला बाल विकास अधिकारी - ठाणे जिल्हा)