शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कोरोनामुळे त्या जोडप्यांचे घरीच केले शुभमंगल सावधान, मास्क घालून विवाह सोहळ्याच्या विधी केल्या पूर्ण

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 5, 2020 15:29 IST

राज संघवी आणि रुषाली बाफना या दोघांचा विवाह सोहळा कोरोनामुळे घरगुती पद्धतीने करण्यात आला .

ठळक मुद्देकोरोनामुळे दोघांचा घरगुतीच विवाह सोहळा पडला पारमास्क घालून विवाहाच्या विधी केल्या पूर्णथाळी वाजवून खिडकीत येऊन रहिवाशांनी केले स्वागत

ठाणे : कोरोनामुळे अनेक वागदत्त वधू वराना आपला विवाह पुढे ढकलावा लागला आहे. परंतु संघवी आणि बाफना कुटुंबाने आपल्या मुलांचा विवाह रद्द न करता ठरल्या तारखेला त्यांनी घरीच शुभमंगल सावधान केले. ठाण्याचा वर आणि मुंबईची वधू यांचा घरगूती विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. विशेष म्हणजे विवाह सोहळा दरम्यान दोघांनी मास्क घातले होते. 

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केले असून सरकारने निर्बंध मात्र कायम ठेवले आहेत. एप्रिल - मे महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त असतात तसेच, मुलांना शाळेला सुट्टी देखील असते. त्यामुळे अनेक जण या कालावधीत आपल्या विवाहाची तारीख ठरवितात. अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांची लग्न या उन्हाळी सुट्टीत करण्याचे ठरविले होते. परंतु लॉकडाऊन जाहीर झाले आणि विवाह ठरलेल्या वधू वराना आपल्या विवाहाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. सहा महिन्याआधीच लग्न ठरलेल्या संघवी आणि बाफना कुटुंबाने मात्र ना विवाह सोहळा रद्द केला ना तो पुढे ढकलला. त्यांनी ठरल्या तारखेला हा सोहळा पार पडला पण तो ही फक्त घरगुती पद्धतीने. ठाण्याचा राज संघवी आणि रुषाली बाफना यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या संमतीने ठरला होता. त्यांनी 2 मे 2020 ही लग्नाची तारीख ठरवली होती. त्यांचे लग्न खोपोली येथे डेस्टिनेशन वेडिंग पद्धतीने करण्याचे योजिले होते. त्यादृष्टीने त्यांनी लग्नाची सगळी तयारी केली, नातेवाईकांना व्हाट्सऍपद्वारे आमंत्रणही देण्यात आले. परंतु दुर्दैवाने भारतावर कोरोनाचे संकट आले. त्यानंतर सरकारला लॉकडाऊन जाहीर करावे लागले. लॉकडाऊनचा कालावधी वाढतच गेला. नातेवाईकांनी लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता पण आम्ही दोन्ही कुटुंबांनी घरातच लग्न पार पाडण्याचा निर्णय घेतला असे राजचे वडील महेंद्र संघवी यांनी सांगितले. ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला विवाह करण्याचे पक्के झाल्यावर महेंद्र यांनी पोलिसांना ऑनलाइन अर्ज दिला त्यावेळी सुरुवातीला पोलिसांनी देखील लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला परंतु आम्हीही त्यांना लॉकडाऊनचे नियम आम्ही मोडणार नाही, तुम्ही सांगाल तितकेच लोक सोबत नेऊ असे म्हटल्यावर त्यांनी इथून तीन लोकांनी जाण्याची परवानगी दिली असे ते अधिक माहिती देताना म्हणाले. राज, त्याचे वडील आणि आई सोबत निघाले. लग्नाचे कपडे त्यांच्याकडे आले नव्हते म्हणून घरात उपलब्ध असलेल्या कपड्यातच ते निघाले. बाफना कुटुंबातील रुषाली, तिचे आई वडील असे तीन, संघवी कुटुंबातील तीन आणि एक भटजी अशा केवळ सात जणांच्या उपस्थितीत मुंबईतील बाफना कुटुंबाच्या राहत्या घरी हा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशिर्वाद या नववधू वरांनी व्हिडीओ कॉल द्वारा घेतले तर दोघेही जण राहत असलेल्या सोसायटीनी थाळी वाजवून त्यांचे स्वागत केले. बाफना कुटुंबाकडे जेवण झाल्यावर संघवी कुटुंब आपल्या सुनेला घेऊन घरी आले आणि पारंपरिक पद्धतीने तिचा गृहप्रवेश करून घेतला. माझ्या मुलाचे लग्न साध्या पद्धतीने करण्याची इच्छा असल्याने तसा प्रस्ताव आमच्या व्याहींसमोर मी सहा महिन्यांपूर्वीच ठेवला होता पण त्यांना मात्र धामधुमीत लग्न करायचे होते आणि शेवटी कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच लग्न करावे लागले. माझ्या दुसऱ्या मुलाचे लग्नही मी अशाच पद्धतीने करणार असे महेंद्र यांनी सांगितले. लग्नात वायफळ खर्च न करता अगदी सध्या पद्धतीने लग्न करा असा संदेश ही संघवी कुटूंबाने दिला.

टॅग्स :thaneठाणेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSocialसामाजिक