शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

कोरोनामुळे त्या जोडप्यांचे घरीच केले शुभमंगल सावधान, मास्क घालून विवाह सोहळ्याच्या विधी केल्या पूर्ण

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 5, 2020 15:29 IST

राज संघवी आणि रुषाली बाफना या दोघांचा विवाह सोहळा कोरोनामुळे घरगुती पद्धतीने करण्यात आला .

ठळक मुद्देकोरोनामुळे दोघांचा घरगुतीच विवाह सोहळा पडला पारमास्क घालून विवाहाच्या विधी केल्या पूर्णथाळी वाजवून खिडकीत येऊन रहिवाशांनी केले स्वागत

ठाणे : कोरोनामुळे अनेक वागदत्त वधू वराना आपला विवाह पुढे ढकलावा लागला आहे. परंतु संघवी आणि बाफना कुटुंबाने आपल्या मुलांचा विवाह रद्द न करता ठरल्या तारखेला त्यांनी घरीच शुभमंगल सावधान केले. ठाण्याचा वर आणि मुंबईची वधू यांचा घरगूती विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. विशेष म्हणजे विवाह सोहळा दरम्यान दोघांनी मास्क घातले होते. 

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केले असून सरकारने निर्बंध मात्र कायम ठेवले आहेत. एप्रिल - मे महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त असतात तसेच, मुलांना शाळेला सुट्टी देखील असते. त्यामुळे अनेक जण या कालावधीत आपल्या विवाहाची तारीख ठरवितात. अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांची लग्न या उन्हाळी सुट्टीत करण्याचे ठरविले होते. परंतु लॉकडाऊन जाहीर झाले आणि विवाह ठरलेल्या वधू वराना आपल्या विवाहाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. सहा महिन्याआधीच लग्न ठरलेल्या संघवी आणि बाफना कुटुंबाने मात्र ना विवाह सोहळा रद्द केला ना तो पुढे ढकलला. त्यांनी ठरल्या तारखेला हा सोहळा पार पडला पण तो ही फक्त घरगुती पद्धतीने. ठाण्याचा राज संघवी आणि रुषाली बाफना यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या संमतीने ठरला होता. त्यांनी 2 मे 2020 ही लग्नाची तारीख ठरवली होती. त्यांचे लग्न खोपोली येथे डेस्टिनेशन वेडिंग पद्धतीने करण्याचे योजिले होते. त्यादृष्टीने त्यांनी लग्नाची सगळी तयारी केली, नातेवाईकांना व्हाट्सऍपद्वारे आमंत्रणही देण्यात आले. परंतु दुर्दैवाने भारतावर कोरोनाचे संकट आले. त्यानंतर सरकारला लॉकडाऊन जाहीर करावे लागले. लॉकडाऊनचा कालावधी वाढतच गेला. नातेवाईकांनी लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता पण आम्ही दोन्ही कुटुंबांनी घरातच लग्न पार पाडण्याचा निर्णय घेतला असे राजचे वडील महेंद्र संघवी यांनी सांगितले. ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला विवाह करण्याचे पक्के झाल्यावर महेंद्र यांनी पोलिसांना ऑनलाइन अर्ज दिला त्यावेळी सुरुवातीला पोलिसांनी देखील लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला परंतु आम्हीही त्यांना लॉकडाऊनचे नियम आम्ही मोडणार नाही, तुम्ही सांगाल तितकेच लोक सोबत नेऊ असे म्हटल्यावर त्यांनी इथून तीन लोकांनी जाण्याची परवानगी दिली असे ते अधिक माहिती देताना म्हणाले. राज, त्याचे वडील आणि आई सोबत निघाले. लग्नाचे कपडे त्यांच्याकडे आले नव्हते म्हणून घरात उपलब्ध असलेल्या कपड्यातच ते निघाले. बाफना कुटुंबातील रुषाली, तिचे आई वडील असे तीन, संघवी कुटुंबातील तीन आणि एक भटजी अशा केवळ सात जणांच्या उपस्थितीत मुंबईतील बाफना कुटुंबाच्या राहत्या घरी हा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशिर्वाद या नववधू वरांनी व्हिडीओ कॉल द्वारा घेतले तर दोघेही जण राहत असलेल्या सोसायटीनी थाळी वाजवून त्यांचे स्वागत केले. बाफना कुटुंबाकडे जेवण झाल्यावर संघवी कुटुंब आपल्या सुनेला घेऊन घरी आले आणि पारंपरिक पद्धतीने तिचा गृहप्रवेश करून घेतला. माझ्या मुलाचे लग्न साध्या पद्धतीने करण्याची इच्छा असल्याने तसा प्रस्ताव आमच्या व्याहींसमोर मी सहा महिन्यांपूर्वीच ठेवला होता पण त्यांना मात्र धामधुमीत लग्न करायचे होते आणि शेवटी कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच लग्न करावे लागले. माझ्या दुसऱ्या मुलाचे लग्नही मी अशाच पद्धतीने करणार असे महेंद्र यांनी सांगितले. लग्नात वायफळ खर्च न करता अगदी सध्या पद्धतीने लग्न करा असा संदेश ही संघवी कुटूंबाने दिला.

टॅग्स :thaneठाणेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSocialसामाजिक