शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जातोय : सयाजी शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:06 IST

कोरोनाबद्दल भीती तयार केली जात आहे असे स्पष्ट मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकोरोनाबद्दल भीती तयार केली जातेय : सयाजी शिंदेसयाजी शिंदे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवादकोरोनामुळे मानवी जीवनात सगळे बदलेल असे काही नाही : सयाजी शिंदे

ठाणे : कोरोनाला विनाकारण खूप महत्त्व दिले गेले. एवढे जीवघेणे किंवा कोरोनामुळे मानवाने सगळे बदलावे असे काही नाही. कोरोना कधी आला आणि कधी गेला हे कित्येकांना माहीत पण नसेल. आता स्वतःवरच विश्वास राहिलेला नाही. हात पण दर पाच मिनिटांनी धुवावे लागतात अशी खंत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

     आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आयोजित संवाद मनांचा या कार्यक्रमात शिंदे यांची मुलखात ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी घेतली. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाचा बाऊ केला गेलाय. त्या बद्दल भीती तयार केली आहे. कोरोनाने धडा दिला की, गर्दी करू नये, प्रतिकार शक्ती वाढवावी, विकासाच्या नावाखाली गुदमरून जाणे याला आळा बसला हे कोरोनाचे वैशिष्ट्य आहे. झाडांना प्राधान्य मिळेल. आपल्याला अन्न, ऑक्सिजन लागते ती जादू फक्त झाडांमध्ये आहे. खरी क्रिएटीव्हीटी ही जमिनीत, झाडांत आहे मग इतर क्रिएटीव्हीटीला महत्त्व येईल. माझ्या 5 कविता, पाच चित्रपट नसली तरी चालेल पण माझी स्वतःची पाच झाडे असावी जी 500 वर्षे जगतील आणि माझ्या पुढच्या पिढीला जगवतील. शेती या विषयाला हात घालत सयाजी शिंदे म्हणाले की, शेतकऱ्याला कळत नाही की त्याला कमी किंमत दिली जाते. 50 ते 60 वर्षे शेती केलेल्या शेतकऱ्याला विद्यापीठातुन शेतीची पदवी घेतलेला मुलगा शेती कशी करावी हे शिकविणार का ? शेतकऱ्याला खुप साखळ्यांमध्ये अडकवले गेले आहे अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. खरं तर शहरे दरिद्री आणि गावे श्रीमंत आहेत पण सगळ्यांनाच शहराची ओढ लागली आहे. कृत्रिम उपाय करून माणसाने स्वतःची जीवनशैली बदलली खरी पण त्यांनतर पुन्हा नैसर्गिक उपायांकडे वळत आहे. कोरोनानंतर जगण्याच्या मुळाकडे सर्वांना जावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. आपली प्रतिकार शक्ती कमी होते कारण आपण पैसे देऊन सुख सोयीच्या मागे लागलो आहोत. माणसाने अनावश्यकपणे स्वतःच्या  गरज वाढविल्या आहेत. जितक्या गरजा वाढल्या तितकी औषधे ही वाढली. कोरोनामुळे माणसाला निसर्गाचे महत्त्व कळेल. आता आदिवासींकडून शिकण्याची,  त्यांना महत्त्व देण्याची गरज लागणार आहे असेही ते म्हणाले. मनोरंजन क्षेत्राला प्राधान्य राहणार नाही यावर मत व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, या क्षेत्रात पुढील काही काळ बराच बदल असेल. नाट्यगृहात एकत्र येणे हे कमी होईल. हे क्षेत्र काही काळ बदलले असेल. शूटिंगसाठी डॉक्टर हे पात्र निवडले जाईल जे तपासणी करेल. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ व इतर मान्यवरही सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcollegeमहाविद्यालय