शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जातोय : सयाजी शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:06 IST

कोरोनाबद्दल भीती तयार केली जात आहे असे स्पष्ट मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकोरोनाबद्दल भीती तयार केली जातेय : सयाजी शिंदेसयाजी शिंदे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवादकोरोनामुळे मानवी जीवनात सगळे बदलेल असे काही नाही : सयाजी शिंदे

ठाणे : कोरोनाला विनाकारण खूप महत्त्व दिले गेले. एवढे जीवघेणे किंवा कोरोनामुळे मानवाने सगळे बदलावे असे काही नाही. कोरोना कधी आला आणि कधी गेला हे कित्येकांना माहीत पण नसेल. आता स्वतःवरच विश्वास राहिलेला नाही. हात पण दर पाच मिनिटांनी धुवावे लागतात अशी खंत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

     आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आयोजित संवाद मनांचा या कार्यक्रमात शिंदे यांची मुलखात ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी घेतली. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाचा बाऊ केला गेलाय. त्या बद्दल भीती तयार केली आहे. कोरोनाने धडा दिला की, गर्दी करू नये, प्रतिकार शक्ती वाढवावी, विकासाच्या नावाखाली गुदमरून जाणे याला आळा बसला हे कोरोनाचे वैशिष्ट्य आहे. झाडांना प्राधान्य मिळेल. आपल्याला अन्न, ऑक्सिजन लागते ती जादू फक्त झाडांमध्ये आहे. खरी क्रिएटीव्हीटी ही जमिनीत, झाडांत आहे मग इतर क्रिएटीव्हीटीला महत्त्व येईल. माझ्या 5 कविता, पाच चित्रपट नसली तरी चालेल पण माझी स्वतःची पाच झाडे असावी जी 500 वर्षे जगतील आणि माझ्या पुढच्या पिढीला जगवतील. शेती या विषयाला हात घालत सयाजी शिंदे म्हणाले की, शेतकऱ्याला कळत नाही की त्याला कमी किंमत दिली जाते. 50 ते 60 वर्षे शेती केलेल्या शेतकऱ्याला विद्यापीठातुन शेतीची पदवी घेतलेला मुलगा शेती कशी करावी हे शिकविणार का ? शेतकऱ्याला खुप साखळ्यांमध्ये अडकवले गेले आहे अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. खरं तर शहरे दरिद्री आणि गावे श्रीमंत आहेत पण सगळ्यांनाच शहराची ओढ लागली आहे. कृत्रिम उपाय करून माणसाने स्वतःची जीवनशैली बदलली खरी पण त्यांनतर पुन्हा नैसर्गिक उपायांकडे वळत आहे. कोरोनानंतर जगण्याच्या मुळाकडे सर्वांना जावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. आपली प्रतिकार शक्ती कमी होते कारण आपण पैसे देऊन सुख सोयीच्या मागे लागलो आहोत. माणसाने अनावश्यकपणे स्वतःच्या  गरज वाढविल्या आहेत. जितक्या गरजा वाढल्या तितकी औषधे ही वाढली. कोरोनामुळे माणसाला निसर्गाचे महत्त्व कळेल. आता आदिवासींकडून शिकण्याची,  त्यांना महत्त्व देण्याची गरज लागणार आहे असेही ते म्हणाले. मनोरंजन क्षेत्राला प्राधान्य राहणार नाही यावर मत व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, या क्षेत्रात पुढील काही काळ बराच बदल असेल. नाट्यगृहात एकत्र येणे हे कमी होईल. हे क्षेत्र काही काळ बदलले असेल. शूटिंगसाठी डॉक्टर हे पात्र निवडले जाईल जे तपासणी करेल. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ व इतर मान्यवरही सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcollegeमहाविद्यालय