शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जातोय : सयाजी शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:06 IST

कोरोनाबद्दल भीती तयार केली जात आहे असे स्पष्ट मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकोरोनाबद्दल भीती तयार केली जातेय : सयाजी शिंदेसयाजी शिंदे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवादकोरोनामुळे मानवी जीवनात सगळे बदलेल असे काही नाही : सयाजी शिंदे

ठाणे : कोरोनाला विनाकारण खूप महत्त्व दिले गेले. एवढे जीवघेणे किंवा कोरोनामुळे मानवाने सगळे बदलावे असे काही नाही. कोरोना कधी आला आणि कधी गेला हे कित्येकांना माहीत पण नसेल. आता स्वतःवरच विश्वास राहिलेला नाही. हात पण दर पाच मिनिटांनी धुवावे लागतात अशी खंत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

     आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आयोजित संवाद मनांचा या कार्यक्रमात शिंदे यांची मुलखात ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी घेतली. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाचा बाऊ केला गेलाय. त्या बद्दल भीती तयार केली आहे. कोरोनाने धडा दिला की, गर्दी करू नये, प्रतिकार शक्ती वाढवावी, विकासाच्या नावाखाली गुदमरून जाणे याला आळा बसला हे कोरोनाचे वैशिष्ट्य आहे. झाडांना प्राधान्य मिळेल. आपल्याला अन्न, ऑक्सिजन लागते ती जादू फक्त झाडांमध्ये आहे. खरी क्रिएटीव्हीटी ही जमिनीत, झाडांत आहे मग इतर क्रिएटीव्हीटीला महत्त्व येईल. माझ्या 5 कविता, पाच चित्रपट नसली तरी चालेल पण माझी स्वतःची पाच झाडे असावी जी 500 वर्षे जगतील आणि माझ्या पुढच्या पिढीला जगवतील. शेती या विषयाला हात घालत सयाजी शिंदे म्हणाले की, शेतकऱ्याला कळत नाही की त्याला कमी किंमत दिली जाते. 50 ते 60 वर्षे शेती केलेल्या शेतकऱ्याला विद्यापीठातुन शेतीची पदवी घेतलेला मुलगा शेती कशी करावी हे शिकविणार का ? शेतकऱ्याला खुप साखळ्यांमध्ये अडकवले गेले आहे अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. खरं तर शहरे दरिद्री आणि गावे श्रीमंत आहेत पण सगळ्यांनाच शहराची ओढ लागली आहे. कृत्रिम उपाय करून माणसाने स्वतःची जीवनशैली बदलली खरी पण त्यांनतर पुन्हा नैसर्गिक उपायांकडे वळत आहे. कोरोनानंतर जगण्याच्या मुळाकडे सर्वांना जावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. आपली प्रतिकार शक्ती कमी होते कारण आपण पैसे देऊन सुख सोयीच्या मागे लागलो आहोत. माणसाने अनावश्यकपणे स्वतःच्या  गरज वाढविल्या आहेत. जितक्या गरजा वाढल्या तितकी औषधे ही वाढली. कोरोनामुळे माणसाला निसर्गाचे महत्त्व कळेल. आता आदिवासींकडून शिकण्याची,  त्यांना महत्त्व देण्याची गरज लागणार आहे असेही ते म्हणाले. मनोरंजन क्षेत्राला प्राधान्य राहणार नाही यावर मत व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, या क्षेत्रात पुढील काही काळ बराच बदल असेल. नाट्यगृहात एकत्र येणे हे कमी होईल. हे क्षेत्र काही काळ बदलले असेल. शूटिंगसाठी डॉक्टर हे पात्र निवडले जाईल जे तपासणी करेल. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ व इतर मान्यवरही सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcollegeमहाविद्यालय