शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

कोपर पुलाचे काम तीन महिन्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:32 IST

डोंबिवलीचा कोपर पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिक आणि वाहनचालक वाहतूककोंडीच्या चक्रात अडकले आहेत.

कल्याण : डोंबिवलीचा कोपर पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिक आणि वाहनचालक वाहतूककोंडीच्या चक्रात अडकले आहेत. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर विनीता राणे यांनी रेल्वेच्या डीआरएमसोबत चर्चा केली होती. या चर्चेअंती पुलाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा दावा स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. तसेच, हा पूल पूर्णत: तोडावा लागेल, असा गैरसमज पसरवला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोपर पूल रविवारपासून वाहतुकीसाठी बंद केला आहे. पर्यायी वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवली आहे. हा पूल अरुंद असल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. रेल्वेसोबत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी महापौर राणे यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.म्हात्रे म्हणाले की, पूल पूर्णपणे तोडावा लागणार असा गैरसमज पसरविला जात आहे. प्रत्यक्षात पुलावरचा स्लॅब तोडून तेथे नवा स्लॅब टाकायचा आहे. हे काम तीन महिन्यांत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला जाणार आहे. पुलावरील महावितरणच्या वीज वाहिन्या हटवण्यासाठी जो खर्च अपेक्षित आहे, तो जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केला जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत राज्यमंत्र्याची बैठक झाली होती. त्याचा अहवाल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सादर करत वीज वाहिन्या हटवण्याचा खर्च जिल्हाधिकारी कधी महापालिकेस देणार, असा सवाल केला. वीज वाहिन्या हटवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात होईल. मात्र, वीज वाहिन्या हटवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला नाही. महावितरण हे काम करणार नसेल तर त्यांच्याविरोधात कठोर पावले उचणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. राज्यमंत्र्यांनी रस्त्यासाठी ४०० कोटी मंजूर केले आहेत. त्यापैकी काही कोटी या कामासाठी वळवले जावेत. पुलासाठी आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुलाचे डिझाइन दहा दिवसांत अंतिम करण्यात येईल. निविदा प्रक्रिया न करताच हे काम केले जाणार आहे.>‘ठाकुर्ली रेल्वे फाटक सुरू करा’कल्याण : डोंबिवलीचा कोपर रेल्वे उड्डाणपूल रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, रेल्वेने पर्यायी वाहतुकीचा पर्याय दिलेला नाही. त्यांनी ही जबाबदारी महापालिका व वाहतूक पोलिसांवर ढकलली आहे. हा पूल बंद करण्याच्या हालचाली चार महिन्यांपूर्वीच सुरू झाल्या. त्याचवेळी ठाकुर्ली येथील बंद केलेले रेल्वे फटाक पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेनेने रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र, रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे, याकडे शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. कोपर उड्डाण पुलाच्या कामासंदर्भात रेल्वेने नियोजन केलेले नाही. रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेस नोटीस पाठवून आपण कसे नामानिराळे आहोत, याची प्रचिती दिली आहे. रेल्वे पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापलिकेने रेल्वेला आतापर्यंत चार कोटी ९५ लाख रुपये दिले आहेत. मग रेल्वे कसली देखभाल दुरुस्ती केली, असा सवाल शिवसेनेने केला होता. कोपर पूल बंद केल्याने वाहतूक आता ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून वळविली आहे. मात्र हा पूल वाहतुकीसाठी अरुंद आहे. डोंबिवली पश्चिमेतून पूर्वेला जाणाºया स्कूलबस व अन्य वाहने या पुलावरील वाहतूककोंडीत अडकण्याची भीती आहे. त्यामुळे येथील कोंडी टाळण्यासाठी रेल्वेने ठाकुर्ली येथील रेल्वे फाटक पुन्हा वाहतुकीसाठी खुले करावे. कोपर पुलाचे काम होईपर्यंत ही सुविधा द्यावी, असे मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, रेल्वेने त्याचा विचार केलेला नाही. त्यामुळे हे फाटक खुले करावे, अशी मागणी आता म्हात्रे यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.>दाव्याबाबत साशंकता : म्हात्रे यांनी तीन महिन्यात काम पूर्ण करण्याचा दावा केला असला तरी पुलाच्या कामाचे डिझाइन मंजूर होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा दावा कितपत खरा ठरणार, असा प्रश्न आहे. कारण, पत्री पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पत्री पुलाचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरू झाले. हे काम फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण होणार आहे, असे राज्य रस्तेविकास महामंडळाने सांगितले.