शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडणारे मित्रही असतात, पण हे तेवढ्यापुरतंच; मोहन भागवतांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 11:05 IST

आर्थिक परिस्थितीबाबत केलेल्या विधानातून शिवसेनेला कानपिचक्या

ठाणे : एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रसिद्ध नव्हता. आता काळ बदलला आहे. देशातील परिस्थिती बदलली, त्यामुळे जे खरे मित्र असतात ते टिकतात, मात्र परिस्थितीनुसार मित्र बदलतात. आपली परिस्थिती चांगली म्हणून येणारे जसे मित्र असतात, तसे परिस्थिती चांगली नाही, म्हणून सोडून जाणारे मित्रही असतात; परंतु हे तेवढ्या पुरते असते, हे लक्षात ठेवा, असे सूचक उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी ठाण्यात काढले. भागवत हे आर्थिक परिस्थितीबाबत बोलत असले तरी त्यांची विधाने हा भाजपचा एकेकाळचा मित्र असलेल्या शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला व इशाराही होता. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे श्रोत्यांमध्ये बसून भागवत यांचे हे विचारधन गोळा करीत होते.

पैसा असो की सत्ता ती जितकी एका हातात केंद्रित होईल, तितकी त्याबद्दलची निश्चिंतता होते. केंद्रीकरणाने वाईटच होईल असे नाही, चांगलेही होऊ शकते, ते पैसा व सत्ता कुणाच्या हातात आहे, त्यावरही अवंलबून असते; परंतु आपल्याकडे सगळ्या गोष्टींचे विकेंद्रीकरण करण्याची परंपरा आहे. अर्थशक्तीकरिता सहकार हाही उपाय आहे. धनाची शक्ती हळूहळू सर्वसामान्यांच्या हातात येण्यासाठीची सहकार ही चळवळ आहे; परंतु संघाचे स्वयंसेवक ‘विनासहकार नवी उद्धार, विनासंस्कार नही सहकार’ यावर विश्वास ठेवतात, असे भागवत म्हणाले.  

टीजेएसबी सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समांरभासाठी भागवत ठाण्यात आले होते. कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, उपाध्यक्ष शरद गांगल, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे हे उपस्थित होते. ते म्हणाले, संघाचे स्वंयसेवक सहकार क्षेत्रात बँकिंग  व्यवसाय म्हणून आले नाहीत. सेवा म्हणून उतरले. भारतात सहकार हा खूप जुना आहे, सहकार भारतीयांच्या रक्तात आहे. अर्थ हा पुरुषार्थ आहे. आपण लक्ष्मीपूजन करणारे लोक आहोत. पैसा समाज चालावा म्हणून मिळवायचा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघthaneठाणेShiv Senaशिवसेना