शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडणारे मित्रही असतात, पण हे तेवढ्यापुरतंच; मोहन भागवतांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 11:05 IST

आर्थिक परिस्थितीबाबत केलेल्या विधानातून शिवसेनेला कानपिचक्या

ठाणे : एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रसिद्ध नव्हता. आता काळ बदलला आहे. देशातील परिस्थिती बदलली, त्यामुळे जे खरे मित्र असतात ते टिकतात, मात्र परिस्थितीनुसार मित्र बदलतात. आपली परिस्थिती चांगली म्हणून येणारे जसे मित्र असतात, तसे परिस्थिती चांगली नाही, म्हणून सोडून जाणारे मित्रही असतात; परंतु हे तेवढ्या पुरते असते, हे लक्षात ठेवा, असे सूचक उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी ठाण्यात काढले. भागवत हे आर्थिक परिस्थितीबाबत बोलत असले तरी त्यांची विधाने हा भाजपचा एकेकाळचा मित्र असलेल्या शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला व इशाराही होता. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे श्रोत्यांमध्ये बसून भागवत यांचे हे विचारधन गोळा करीत होते.

पैसा असो की सत्ता ती जितकी एका हातात केंद्रित होईल, तितकी त्याबद्दलची निश्चिंतता होते. केंद्रीकरणाने वाईटच होईल असे नाही, चांगलेही होऊ शकते, ते पैसा व सत्ता कुणाच्या हातात आहे, त्यावरही अवंलबून असते; परंतु आपल्याकडे सगळ्या गोष्टींचे विकेंद्रीकरण करण्याची परंपरा आहे. अर्थशक्तीकरिता सहकार हाही उपाय आहे. धनाची शक्ती हळूहळू सर्वसामान्यांच्या हातात येण्यासाठीची सहकार ही चळवळ आहे; परंतु संघाचे स्वयंसेवक ‘विनासहकार नवी उद्धार, विनासंस्कार नही सहकार’ यावर विश्वास ठेवतात, असे भागवत म्हणाले.  

टीजेएसबी सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समांरभासाठी भागवत ठाण्यात आले होते. कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, उपाध्यक्ष शरद गांगल, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे हे उपस्थित होते. ते म्हणाले, संघाचे स्वंयसेवक सहकार क्षेत्रात बँकिंग  व्यवसाय म्हणून आले नाहीत. सेवा म्हणून उतरले. भारतात सहकार हा खूप जुना आहे, सहकार भारतीयांच्या रक्तात आहे. अर्थ हा पुरुषार्थ आहे. आपण लक्ष्मीपूजन करणारे लोक आहोत. पैसा समाज चालावा म्हणून मिळवायचा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघthaneठाणेShiv Senaशिवसेना