शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडणारे मित्रही असतात, पण हे तेवढ्यापुरतंच; मोहन भागवतांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 11:05 IST

आर्थिक परिस्थितीबाबत केलेल्या विधानातून शिवसेनेला कानपिचक्या

ठाणे : एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रसिद्ध नव्हता. आता काळ बदलला आहे. देशातील परिस्थिती बदलली, त्यामुळे जे खरे मित्र असतात ते टिकतात, मात्र परिस्थितीनुसार मित्र बदलतात. आपली परिस्थिती चांगली म्हणून येणारे जसे मित्र असतात, तसे परिस्थिती चांगली नाही, म्हणून सोडून जाणारे मित्रही असतात; परंतु हे तेवढ्या पुरते असते, हे लक्षात ठेवा, असे सूचक उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी ठाण्यात काढले. भागवत हे आर्थिक परिस्थितीबाबत बोलत असले तरी त्यांची विधाने हा भाजपचा एकेकाळचा मित्र असलेल्या शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला व इशाराही होता. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे श्रोत्यांमध्ये बसून भागवत यांचे हे विचारधन गोळा करीत होते.

पैसा असो की सत्ता ती जितकी एका हातात केंद्रित होईल, तितकी त्याबद्दलची निश्चिंतता होते. केंद्रीकरणाने वाईटच होईल असे नाही, चांगलेही होऊ शकते, ते पैसा व सत्ता कुणाच्या हातात आहे, त्यावरही अवंलबून असते; परंतु आपल्याकडे सगळ्या गोष्टींचे विकेंद्रीकरण करण्याची परंपरा आहे. अर्थशक्तीकरिता सहकार हाही उपाय आहे. धनाची शक्ती हळूहळू सर्वसामान्यांच्या हातात येण्यासाठीची सहकार ही चळवळ आहे; परंतु संघाचे स्वयंसेवक ‘विनासहकार नवी उद्धार, विनासंस्कार नही सहकार’ यावर विश्वास ठेवतात, असे भागवत म्हणाले.  

टीजेएसबी सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समांरभासाठी भागवत ठाण्यात आले होते. कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, उपाध्यक्ष शरद गांगल, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे हे उपस्थित होते. ते म्हणाले, संघाचे स्वंयसेवक सहकार क्षेत्रात बँकिंग  व्यवसाय म्हणून आले नाहीत. सेवा म्हणून उतरले. भारतात सहकार हा खूप जुना आहे, सहकार भारतीयांच्या रक्तात आहे. अर्थ हा पुरुषार्थ आहे. आपण लक्ष्मीपूजन करणारे लोक आहोत. पैसा समाज चालावा म्हणून मिळवायचा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघthaneठाणेShiv Senaशिवसेना